एक्स्प्लोर

Bhaje Village : इर्शाळवाडीच्या बातम्याच पाहणं बंद केलं; 34 वर्षांनंतर पुन्हा पुण्यातील भाजे गावातील गावकरी हळहळले

इर्शाळवाडीची दुर्घटना घडल्यानंतर पुण्यातील भाजे गावातील ग्रामस्थांचे डोळेही पाणावले आहेत. म्हणूनच इर्शाळवाडीच्या बातम्या पाहणं आणि वाचनं  त्यांनी बंद केलं.

Bhaje Village : इर्शाळवाडीची दुर्घटना घडल्यानंतर पुण्यातील भाजे गावातील ग्रामस्थांचे डोळेही पाणावले आहेत. म्हणूनच इर्शाळवाडीच्या बातम्या पाहणं आणि वाचनं  त्यांनी बंद केलं. 23 जुलै 1989 सालची घटना या सर्वांच्या नजरेसमोर येऊन उभी ठाकली आहे. त्या दिवशी हे गावही दरडी खाली गाडलं गेलं होतं. त्यात 39 जणांचे जीव गेले होते आणि शेकडो जनावरं ही दगावली होती. इर्शाळवाडीच्या दुर्घटनेनंतर या सगळ्या कटू आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना अश्रू अनावर झाले. 

पुणे जिल्ह्यातील भाजे हे गाव भाजे लेणी म्हणून देशभर ओळखलं जातं. इथं देशातील असंख्य इतिहास अभ्यासक अभ्यासासाठी येतात तर पर्यटक हा इतिहास अनुभवण्यासाठी इथं पोहचतात. मात्र या लेणींपर्यंत पोहचण्यासाठी त्यांना भाजे गावातूनच जावं लागतं. पण हे भाजे गाव पुनर्वसित आहे, याची फारशी कल्पना त्यापैकी अनेकांना नाही आहे. इर्शाळवाडी प्रमाणेच भाजे गावात 1989 साली दुर्घटना घडली होती. 

त्यावेळी याच गावातील रजनी खाटपे आणि मंगल खाटपे यांच्या कुटुंबातील आठ जणांचा मृत्यू झाला होता. त्यातमंगल खाटपे यांची मुलगी, सासू, सासरे, आज्जी सासू, नणंद, नंदावा, नंदेचा मुलगा, नंदेचे दिर असे आठ दगावले होते. त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील रजनी खाटपे आणि मंगल खाटपे हे दोघेच बचावले होते. अशा दुर्घटना झाल्या की त्यांच्याडोळ्यासमोर तोच दिवस पुन्हा उभा राहतो आणि अख्ख कुटुंब गमावल्याच्या आठवणी जाग्या होतात. 

सुरक्षितस्थळी आताच पुनर्वसन करायला हवं!

भाजे, माळीण, तळीये आणि इर्शाळवाडी सारखी वेळ आपल्यावर येऊन द्यायची नसेल तर डोंगराच्या पायथ्याला राहणाऱ्या गावांनी वेळीच पुनर्वसन करून घ्यायला हवं. दुसरीकडे सरकारने अशा दुर्घटना घडण्याची आणि त्यानंतर मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यातच धन्यता मानू नये. त्यांनी ही अशा धोकादायक गावांचं सुरक्षितस्थळी आत्ताच पुनर्वसन करायला हवं. तेंव्हाच भविष्यात अशा वेदनादायी घटना थांबतील आणि अनेकांचा जीवही वाचेल.

पसारवाडीच्या लोकांचा जीव टांगणीला!

त्यांच्याप्रमाणेच पुण्यातील माळीणला खेटून असणारी पसारवाडीने 20 जुलैची रात्र अक्षरशः जागून काढली होती. इर्शाळवाडीच्या दुर्घनेनंतर हे अख्ख गाव भीतीच्या सावटाखाली आलं होतं. माळीणच्या दुर्घनेनंतरच्या अहवालात पसारवाडी धोकादायक असल्याचं शासनाने जाहीर केलं होतं. आपल्यावर अशी वेळ येऊ नये, म्हणून इथल्या ग्रामस्थांनी पुनर्वसन करण्याची तयारी दर्शवली. ग्रामस्थांनी स्वतःची अडीच एकर जागा पुनर्वसनासाठी देऊ ही केली. मात्र गेली नऊ वर्ष इथलं पुनर्वसन रखंडलंय, परिणामी दोनशे लोकांना जीव मुठीत घेऊन जगावं लागत आहे.

हेही वाचा-

Pune News : घर देण्याच्या नावाखाली राज्यातील सात हजार पोलिसांची शेकडो कोटी रुपयांची फसवणूक

 
 
 
 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : राज्यातील सुपरफास्ट बातम्या : 03 October 2024 : 11 PM : ABP MajhaMarathi Bhasha Abhijat Darja : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, विधानसभेपूर्वी केंद्राचा मोठा निर्णयAjit Pawar : सटकण्याआधी दादांनी पत्रकारांना केलं सावधं? Spcial ReportMahayuti : छोट्यांना पंगतीत छोटीच जागा? छोट्यांचा आवाज महायुतील छोटा वाटतो का? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
मराठीसह 4 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा; या अगोदरच्या 6 भाषा कोणत्या?
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
अक्षय शिंदेनं पाणी मागितलं म्हणून बेड्या सोडल्या अन्..; जितेंद्र आव्हाडांचे पोलिसांना सवाल
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
गौरवास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा
Prataprao Chikhalikar : पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
पोस्ट टाकताना पात्रता आणि उंची तपासावी, ठाकरेंच्या उपशहरप्रमुखाचं कार्यकर्त्यांनी बोटं छाटल्यानंतर प्रतापराव चिखलीकरांची प्रतिक्रिया
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
आपल्या सेवेत 'छत्रपती भवन'; मनोज जरांगेंच्या नव्या कार्यालयाचं उद्घाटन, पाहा फोटो
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
तुम्हाला आयुष्मान कार्डचे 'हे' नियम माहीत असायलाच हवे; नाहीतर अडचणी वाढतील...
Sharad Pawar : शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका, भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
भेटीसाठी आलेल्या भाजप नेत्याने पक्ष प्रवेश उरकून टाकला, शरद पवारांचा साखरपट्ट्यात धमाका; सांगलीत 4 नेते भेटीसाठी पोहोचले
Sunil Tatkare : आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
आम्ही निवडणुकीसाठी हेलिकॉप्टर घेतलं, दुर्दैवाने ते आज माझ्या सोबत नाहीत; पुण्यातील घटनेनं सुनिल तटकरे हळहळले
Embed widget