एक्स्प्लोर

अयोध्या निकाल तथ्य-पुरावे नव्हे तर भावनेवर आधारलेला : प्रकाश आंबेडकर

उद्या अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा होत आहे. या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा अयोध्या खटल्याच्या निकालावर टीका केली आहे.

अकोला : अयोध्या निकाल तथ्य, पुराव्यांवर नाही तर भावनांवर देण्यात आला होता. त्यामुळेच म्हणून भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जातेय, अशी टीका वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. सोबतच अयोध्या हे बौद्ध संस्कृती जपणारं शहर होतं, असा दावा आंबेडकरांनी केला आहे. अयोध्येचा निकाल पुढच्या काळातही जगात भारतीयांवर संशय वाढविणारा असेल असं मत आंबेडकरांनी व्यक्त केलं आहे.

उद्या अयोध्येत राममंदिराच्या भूमिपूजनाचा भव्य सोहळा होत आहे. या भूमिपूजनाच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुन्हा एकदा अयोध्या खटल्याच्या निकालावर टीका केली आहे. पुरावे व इतिहासाच्या दृष्टिकोनातून अयोध्या हे बौद्धांचे सांस्कृतिक शहर असल्याचा दावा आंबेडकरांनी केला आहे. मात्र, अयोध्या निकाल देतांना भावनिकतेला महत्व दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हा निकाल तथ्यांवर नसून भावनिकतेवर देण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

पुढे बोलतांना आंबेडकर म्हणाले की, जगात भारतीयांकडे संशयीत नजरेने पाहिले जाते. मात्र, याबाबत कोणीही भारतीय स्वतःला विचारत नाही की आमच्यावर अत्याचार झालेले असताना आता जगही आमच्यावर अत्याचार करीत आहे. वैदिक धर्म मानणारे लोक हे दुसऱ्या धर्मावर अतिक्रमण करीत असल्याचा प्रकार अयोध्येत होत असल्याचं ते म्हणाले. हे सत्य भारतीय मानायला आजही तयार नसल्याचं आंबेडकर म्हणालेत.

 अयोध्या हे बौद्ध संस्कृती जपणारं शहर : आंबेडकर

अयोध्या हे बौद्ध संस्कृतीचं केंद्र असल्याचं सांगतांना त्यांनी 'राहुल संस्कृती' या इतिहासकाराचा दाखला दिला. राहुल यांच्यानुसार, अयोध्या ही बौद्ध सांस्कृतिक तसेच बौद्धांचे ज्ञानाचे केंद्र होते. अलाहाबाद उच्च न्यायालयात प्रकरण गेले तेव्हा हा निकाल तथ्यांवर नाही तर भावनांवर झाला. परिणामी निकाल राम मंदिराच्या बाजूने लागला. सर्वोच्च न्यायालयातही इतिहासाला आणि पुराव्यांना ग्राह्य धरण्यात आले नाही. अन त्यातूनच राम मंदिराच्या बाजूने निकाल दिला गेल्याचा आंबेडकर म्हणालेत. अलाहाबाद न्यायालयाने हे मान्य केले असते की, अयोध्या ही पूर्वी 'साकेत 'नावाने ओळखली जात होती. या ठिकाणी केलेल्या खोदकामात जे सापडले ते बौद्ध अवशेष आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहता राम मंदिर निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही राम मंदिराच्या बाजूने निकाल देतो, असे स्पष्ट न्यायालयाने सांगितले असते तर भारतीयांकडे ज्या संशयीत नजरेने पाहिले जाते ते दूर झाले असते. असं आंबेडकर म्हणालेत. "भारतीय आता आपल्याशी खरे बोलायला लागले आहे, असा निकाल त्या ठिकाणी लागला असता. मात्र, अलिकडचा निकाल पाहता आजही भारतीयांकडे संशयित नजरेने पाहिले जाईल", असेही शेवटी प्रकाश आंबेडकर म्हणालेत.

संबंधित बातम्या :

गेल्या सोळा वर्षांपासून पत्रकारितेत. लेखक, कवी. समाज माध्यमांद्वारे प्रभावी लेखन. 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Yavatmal News : केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी; अहिल्यानगरमध्ये कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंची घोषणा
Beed Crime Dhananjay Deshmukh: मोठी बातमी! अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
अंगरक्षकाची पिस्टल काढून धमकी दिली; दिवंगत सरपंच बंधू धनंजय देशमुखांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल
Vidhan Parishad Election 2026: पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!
पुणे, कोकण राष्ट्रवादीला, ठाणे, नाशिक शिवसेनेला; सोलापूरसह 11 जागा भाजपकडे; विधान परिषदेसाठी महायुतीचे अंतिम जागावाटप आले समोर, पाहा संपूर्ण यादी!

व्हिडीओ

Dattatray Bharne on Karjamafi : पुढच्या 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी;
Gopichand Padalkar On Jayant Patil : जयंत पाटलांची मोदींवर टीका, पडळकरांचं जशास तसं उत्तर!
Gold Import Modi Impact : सोन्याच्या वाढत्या दरांचा परिणाम, आयात-विक्रीत घट? | Special Report
Laxman Hake on Manoj Jarange : लक्ष्मण हाकेंनी दिला अल्टीमेटम; तर आम्ही ढेकळात आंदोलन करू!
Prajkta Tanpure Join BJP : भाजपमध्ये प्रवेश करताच तनपुरेंच्या कार्यालयातून शरद पवारांचे फोटो गायब

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada Lottery 2026 : म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
म्हाडाच्या मुंबईतील 2640 घरांच्या लॉटरीसाठी किती अर्ज आले? अनामत रक्कम किती जणांनी भरली? आकडेवारी समोर
Rule Change: LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
LPG ते पेट्रोल-डिझेलपर्यंत... उद्यापासून देशात बदलणार 'हे' पाच मोठे नियम; तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
Impact Player नियम काढा, एका गोलंदाजाला 5 ओव्हर द्या...; सचिन तेंडुलकरने IPL साठी सुचवले 3 नवीन नियम!
RCB vs GT IPL 2026 Final Rain Update : गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
गुजरातमध्ये तुफान पाऊस, हवामान खात्याकडून यलो अलर्ट; IPL च्या फायनलआधी क्रिकेटप्रेमींना धडकी भरवणारी अपडेट, सामना रद्द झाल तर...
Kalyan Banerjee Attack Allegation: कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
कल्याण बॅनर्जींच्या हल्ल्याच्या दाव्यावर भाजपची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, 'हा फक्त आणि फक्त ड्रामा...'
Yavatmal News : केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
केंद्रीय महामंडळावर नियुक्तीसाठी तब्बल 20 कोटी 50 लाख रुपयांची मागणी; भाजप समन्वयकाची आर्थिक फसवणूक, यवतमाळमध्ये तिघांवर गुन्हा दाखल
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
जीम बॉडी बनवणारे 150 'टर्मिन' इंजेक्शन्स जप्त; बुलेटसह दोन आरोपीही ताब्यात, पोलिसांकडून तरुणाईला आवाहन
Rohini Paradhye: रोहिणी पाराध्येपूर्वीही महाराष्ट्राने गमावले अनेक रिलस्टार्स; कुणाचा अपघात, तर कुणाचा...
रोहिणी पाराध्येपूर्वीही महाराष्ट्राने गमावले अनेक रिलस्टार्स; कुणाचा अपघात, तर कुणाचा...
Embed widget