एक्स्प्लोर

वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नाही: पोलीस

औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वत:च वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे.

औरंगाबाद: महाराष्ट्र बंददरम्यान झालेल्या हिंसाचाराला मराठा मोर्चा जबाबदार नाही, या दाव्याला आता पुष्टी मिळत आहे. कारण औरंगाबादचे पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी स्वत:च वाळूज एमआयडीसी तोडफोडीशी मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं सांगितलं आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते. मराठा आंदोलनात काही बाहेरचे लोक घुसले असल्याची तक्रार क्रांती चौक पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. मात्र हे लोक नेमक्या कुठल्या चळवळीशी संबंधित होते याबाबत तपासानंतरच सांगता येईल असंही चिरंजीव प्रसाद म्हणाले. 9 ऑगस्ट रोजी मराठा मोर्चाकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. त्यावेळी औरंगाबादेतील वाळूज एमआयडीसीत बंद कंपन्यांमध्ये घुसून मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली होती. मात्र ही तोडफोड मराठा मोर्चेकऱ्यांनी नाही तर बाहेरच्या व्यक्तींनी केल्याचा दावा मराठा मोर्चाच्या आयोजकांनी केला होता. तसंच त्याची सीआयडी चौकशी करण्याची मागणी केली होती. सध्या पोलिसांचं अटकसत्र सुरु असून, या तोडफोडप्रकरणी 53 जणांना अटक केली आहे. आधी अटक केलेल्या 37 जणांमध्ये 18 जण हे मराठा समाजाचे नसल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आता पोलिस आयुक्तांनी या तोडफोडीचा आणि मराठा मोर्चाचा संबंध नसल्याचं म्हटलं आहे. पोलिस आयुक्त काय म्हणाले? वाळूज एमआयडीसी तोडफोडप्रकरणी आम्ही गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये गंभीर कलमे लागली आहेत. आम्हाला जे व्हिडीओ मिळाले, कंपन्यांमधून मिळाले, काही व्हिडीओ आम्ही शूट केले, काही लोकांनी दिले, त्यानुसार आम्ही  53 लोकांना अटक केली आहे.  अजून अटकसत्र सुरुच आहे. तोडफोड करणारे मराठेतर होते का? आम्ही आरोपीकडे बघताना जात बघत नाही. परंतु आम्ही हे ठामपणे सांगतो की ते गुन्हेगार आहेत आणि त्यांचा मराठा चळवळीशी संबंध नाही. आतापर्यंतच्या तपासात एकदम क्लिअर झालं आहे की तोडफोड करणाऱ्यांचा आणि मराठा मोर्चाचा किंवा त्यांच्या समन्वयकांचा काहीही संबंध नाही. गुन्ह्याच्या उद्देशानेच त्यांनी ही तोडफोड केली आहे, असं पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं. मोर्चाआडून तोडफोड करण्याची काय कारणं आहेत? आम्ही कारणं शोधतोय. बहुतेक मुलं आहेत ते या किंवा अन्य कंपनीत तात्पुरते/हंगामी कर्मचारी म्हणून कामं केलं आहे, असं प्रसाद यांनी सांगितलं. मोर्चाआडून काही चळवळीचे लोक घुसले? क्रांती चौक परिसरात अशी एक तक्रार दाखल झाली. त्याअनुषंगाने गुन्हा दाखल झाला आहे. आम्ही विविध फुटेज आणि लोकांचे जबाब नोंदवत आहोत. क्रांती चौक परिसरात बऱ्याच समाजाचे बरेच लोक होते. त्यामुळे आताच बोलणं योग्य नाही. तपासाअंती कमेंट करणं उचित ठरेल, असं चिरंजीव प्रसाद यांनी सांगितलं. नवा व्हिडीओ वाळूजमध्ये झालेल्या विध्वंसाचा नवा व्हिडीओ माझाच्या हाती लागला आहे. वाळूजमधल्या एमआयडीसीमध्ये घुसलेल्या आंदोलकांनी अनेक मोठमोठ्या कंपन्यांमध्ये कसा धुडगूस घातला याचा पुरावा देणारा हा व्हीडिओ पोलिसांकडेही देण्यात आलेला आहे.  त्यामुळे त्यातल्या चेहऱ्यांना हेरून त्यांची धरपकड सुरु झालेली आहे. आमदार हर्षवर्धन जाधवांचा आरोप औरंगाबादमधील वाळूज औद्योगिक वसाहतीमधील तोडफोड लेबर कॉन्ट्रॅक्टर, सप्लाय चेनमधील लोक आणि परप्रांतियांनी केली असून, त्याचं बिल मराठा आंदोलकांवर फाडलं जातंय, असा आरोप आमदार हर्षवर्धन जाधव यांनी केला. तसेच, तोडफोड करणाऱ्या समाजकंटकांनी स्वतःचे प्रायव्हेट इश्यूज सेटल करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आमदार हर्षवर्धन जाधव काल जालना येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. वाळूज तोडफोड प्रकरण वाळूज एमआयडीसीतील 50 कंपन्यांचे पंचनामे पूर्ण झाले असून, 60 कोटींपेक्षा अधिकचे नुकसान झाले आहे. अनेक कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. या तोडफोड प्रकरणी आतापर्यंत 47 जणांना ताब्यात घेतलं असून, 37 जणांवर अटकेची कारवाई केली आहे. तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, मराठा मोर्चाची मागणी  वाळूज एमआयडीसीत ज्या कंपन्यांची तोडफोड झाली आहे, त्या कंपन्यांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी घ्यावं, आंदोलनात तोंड बांधून तोडफोड करण्यात आली. यापूर्वी कोणीही तोडफोड केली नाही, मग आताच का झाली? या तोडफोडीची सीआयडी चौकशी करा, अशी मागणी मराठा मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी केली. मराठा मोर्चा आयोजकांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेत, तोडफोडीच्या घटनेचा निषेध करत, सीआयडी चौकशीची मागणी केली. संबंधित बातम्या  वाळूज एमआयडीसीत तोडफोड करणारे 18 जण मराठेतर वाळूज MIDC तोडफोडीत परप्रांतियांचा हात : हर्षवर्धन जाधव वाळूज एमआयडीसी तोडफोडीचे पंचनामे, 60 कोटीचं नुकसान, धरपकड सुरुच
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
राज्यात उन्हाचा चटका कायम, तापमानाचा पारा 45 अंशावर, कोणत्या जिल्ह्यात किती तापमानाची नोंद? 
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 11 मे 2026 | सोमवार

व्हिडीओ

Sanjay Shirsat On Imtiyaz Jaleel : निदा खानला आश्रय प्रकरणाचा मास्टरमाईंड इम्तियाज जलील - शिरसाट
Kolhapur Fuel Issue : मोदींकडून पेट्रोल-डिझेल कमी वापरण्याचे आवाहन, कोल्हापूरकर म्हणाले...
Mateen Patel Case : मतीन पटेलांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू - महापौर संभाजीनगर
Nitesh Rane On Nida Khan Case : निदा खान हिला पाठिशी घालण्याचं काम MIM पक्षाकडून सुरु आहे
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
सोन्याचं आकर्षण महिलांना, मोदींच्या आवाहननंतर भरत गोगावलेंची मिश्कील प्रतिक्रिया, म्हणाले, मी हातातलं सोनं...
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
CM Vijay: मुख्यमंत्री बनताच विजयने सर्वांची मनं जिंकली; माजी CM स्टॅलिन यांच्या घरी जाऊन भेट, सत्कार, चर्चा
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
मुंबईत पोलिसांची मोठी कारवाई; दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात 12 जणांना अटक, 16 कोटींचे ड्रग्ज जप्त
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
'वर्क फ्रॉम होम'चा पर्याय स्वीकारा! पंतप्रधान मोदींनी असं का म्हटलं? केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
मोठी बातमी ! मुंबईकरांवर पाणीसंकट; जलाशयात घट, 15 मेपासून नळाला कमी पाणी येणार, 10 टक्के कपात
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
आगामी काळात मोठी महागाई, जितेंद्र आव्हाडांचे भाकीत; मोदींच्या आवाहनानंतर शिवसेना ठाकरेंच्या खासदारांचाही संताप
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
मंत्री बावनकुळेंनी शरद पवारांच्या आमदाराला पुढे बोलावलं; कार्यालयाचं उद्घाटन करायला लावलं, चर्चा तर होणारच
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
व्यापारी वर्षभर जगतील, पण कारागिरांनी कसे जगायचे? मोदींच्या आवाहनावर सोनं व्यापाऱ्यांचा सवाल, पुणेकरही नाराज
Embed widget