एक्स्प्लोर

मेळघाटात तणाव वाढला, दगडफेक प्रकरणी 5 संशयित ताब्यात

याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेनं दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनही दिलं आहे.

अमरावती :  मेळघाटातील सशस्त्र हल्लाप्रकरणात 5 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. वनविभाग आणि आकोट पोलिसांवर दोन दिवसांपूर्वी काही स्थानिकांकडून हल्ला करण्यात आला होता. दरम्यान याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई न केल्यास बेमुदत संपाचा इशारा राज्य वनरक्षक आणि वनपाल संघटनेनं दिला आहे. याप्रकरणी त्यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना निवेदनही दिलं आहे. या हल्ल्यात 50 वन कर्मचाऱ्यांसह 15 पोलीस जखमी झाले होते. दरम्यान, अमरावती जिल्हाधिकारी परिसरात आज तिसऱ्या दिवशीही जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मेळघाटच्या जंगलात आदिवासींची वनअधिकाऱ्यांसह पोलिसांवर दगडफेक अमरावतीतील मेळघाटच्या जंगलात पुनर्वसित आदिवासी आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांत टोकाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. सरकारनं पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याने संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी वन अधिकारी आणि पोलिसांवर तुफान दगडफेक केली होती. यावेळी गावकऱ्यांनी सरकारी गाड्यांचीही तोडफोड केली होती. गावकऱ्यांच्या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. केलपानी-धारगड-गुल्लरघाट येथील गावकऱ्यांनी कुऱ्हाडी, कोयता, लाल मिरची पावडर टाकून हल्ला चढवला होता. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडून या परिसरात कलम 144 लावण्यात आलं होतं. सरकारनं पुनर्वसित गावांत संपूर्ण सुविधा न पुरविल्याचा आदिवासी गावकऱ्यांचा आरोप आहे. मेळघाटच्या अकोट वन्यजीव विभागाअंतर्गत येणाऱ्या काही गावांचे 14 जानेवारी 2019 पासून पुनर्वसन झाले आहे.  मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पुनर्वसित गावांची शासनाकडून उपेक्षा झाल्याचा आदिवासींचा आरोप आहे. यामुळे संतप्त झालेल्या आदिवासींनी मेळघाटातील आपल्या मूळ गावाकडे कूच करत केलपानी, गुल्लरघाट आणि धारगड येथील गावकऱ्यांनी मूळ गावांमध्ये प्रवेश केला होता. याची माहिती मिळताच उपवनसंरक्षक अकोट आणि पोलीस अधिकारी आंदोलन करणाऱ्या गावकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी आणि ज्या आंदोलनकर्त्यांना जंगलाबाहेर काढण्यासाठी गेले होते. चर्चा शांततेत सुरु असताना काही आंदोलक हिंसक झाले आणि त्यांनी पोलीस आणि वनविभागच्या कर्मचाऱ्यांवर दगडफेक सुरु केली. तसेच विळा आणि कुऱ्हाडींच्या मदतीने हल्ला केला. या हल्ल्यात 50 वन कर्मचारी आणि 15 पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. यापैकी 3 कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर गावकऱ्यांनी शासनाच्या 15 गाड्यांची तोडफोड केली आणि जंगलाला देखील मोठ्या प्रमाणात आगी लावल्या होत्या.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
नांदेडमध्ये डबल बंडखोरी; भाजपकडून अमर राजूरकरांचा अर्ज; उमेदवारांना आमदार-खासदार-खासदारांच्या मुलांचं आव्हान
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले
पुण्यात विक्रम काकडेच राष्ट्रवादीचे उमेदवार, वळसे पाटलांनी स्पष्टच सांगितले; नाराजीबाबत जय पवारही बोलले

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेतून तब्बल 1 कोटी 25 लाख महिला अपात्र; सुप्रिया सुळेंनी दिली पोर्टलची आकडेवारी
West Bengal Cabinet Expansion: पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
पश्चिम बंगालमध्ये मंत्रिमंडळ विस्तार, 35 मंत्र्यांनी शपथ घेतली: अर्जुन सिंह, तापस रॉय मंत्री झाले; शुभेंदू मंत्रिमंडळात आता 41 मंत्री
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
धुमधडाक्यात लग्न, नवविवाहित जोडपे हेलिकॉप्टरने निघालं अन् क्षणार्धात कोसळलं, नवरदेव पायलटचा करुण अंत; पत्नी तब्बल सहा तास त्याच हेलिकॉप्टरच्या ढिगाऱ्यात
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
Vidhan Parishad Election: विधानपरिषदेच्या 17 जागांसाठी लढती ठरल्या, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी; सर्वच उमेदवारांची यादी
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
जेव्हा शिक्षणाला धंदा केलं जातं तेव्हा चूक सुधारली जात नाही उलट ती अधिक वाढते आणि याची अंतिम किंमत आपली मुलं मोजताहेत; राहुल गांधींचा हल्लाबोल, सरकारच्या कमाईचं 'गणित'ही सांगितलं
Share Market Crash : सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, निफ्टी 23400 च्या खाली, शेअर मार्केट क्रॅश, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
शेअर मार्केट क्रॅश, सेन्सेक्स 500 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 3.75 लाख कोटी स्वाहा...
Supreme Court on Neet Exam: सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
सर्वोच्च न्यायालय म्हणाले, 'नीट फेरपरीक्षा केवळ लेखी स्वरूपातच घेतली जाईल, परीक्षा यंत्रणा आधीच दबावात, सध्या परीक्षेची पद्धत बदलणे शक्य नाही'
Embed widget