एक्स्प्लोर
नेत्यांच्या राष्ट्रवादी सोडण्यावर अण्णा हजारे म्हणतात, 'जैसी करनी वैसी भरनी'
सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोकं पक्षात घ्यावी लागतात. तशी मंडळी भाजप घेत आहे. जनतेने यांचा निकाल लावावा, असेही अण्णा म्हणाले. भाजपची सुद्धा काही वर्षात अशीच अवस्था होईल. हे लोक यांना सोडून पळून जातील, असेही अण्णा हजारे म्हणाले.

अहमदनगर : राष्ट्रवादीतून अनेक लोक सोडून जात आहेत. याचं कारण म्हणजे शरद पवारांचं काम आहे. साखर कारखाने, बँका लुटून खाल्ल्याचा हा परिणाम असून 'जैसी करनी वैसी भरनी' असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. तर यावेळी त्यांनी भाजपवर देखील टीका करताना म्हटले की, सत्ता सांभाळण्यासाठी काही भ्रष्ट लोकं पक्षात घ्यावी लागतात. तशी मंडळी भाजप घेत आहे. जनतेने यांचा निकाल लावावा, असेही अण्णा म्हणाले. भाजपची सुद्धा काही वर्षात अशीच अवस्था होईल. हे लोक यांना सोडून पळून जातील, असेही अण्णा हजारे म्हणाले. दरम्याने अण्णा हजारे यांनी नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही निष्कलंक, भ्रष्टाचार मुक्त असल्याचं देखील म्हटलं आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधातील घोटाळ्यांची प्रकरणं गेल्या पाच वर्षांत माझ्याकडे आलीच नाहीत. मुख्यमंत्री मी जेव्हा फोन करेल तेव्हा प्रतिसाद देतात. ते माझं ऐकतात. म्हणून गेल्या पाच वर्षांत मी सरकारचा भ्रष्टाचाराविरोधात आंदोलने केली नाहीत, असे अण्णांनी सांगितले. केंद्र सरकारने लोकपाल कायदा आणला. राज्य सरकारने लोकायुक्त आणण्याची कारवाई सुरू केली. विद्यमान सरकार चांगलं काम करतेय मी चांगल्याला चांगलंच म्हणणार असल्याचं देखील ते म्हणाले. माझ्याकडं केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात कसलेच पुरावे येत नाहीत, त्यामुळं मी कोणाच्या विरोधात आंदोलन करू आणि का करू?, असेही ते म्हणाले. जळगाव घरकुल प्रकरणी प्रवीण चव्हाण, गेडाम आणि इशू सिंधू यांनी खूप अभ्यास केला आहे. त्यामुळे त्यांना डावलून दुसरा व्यक्ती देणे हे चुकीचे असल्याचे देखील ते म्हणाले. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे ते म्हणाले.
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र
महाराष्ट्र






















