एक्स्प्लोर

Prakash Ambedkar In Kolhapur : मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध, विधानसभेला ओबीसीकडे मोर्चा वळवला; प्रकाश आंबडेकर काय काय म्हणाले?

संविधान बचाव हा अजेंडा आम्ही सुरुवातीला घेतला होता. मात्र, त्यानंतर तो इंडिया आघाडीने घेतला. त्यामुळे मुस्लिम मते इंडिया आघाडीकडे वळली आणि आमच्या मतांमध्ये घट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या ( Maratha Reservation) बाबतीत टोलवाटोलवी सुरु आहे. मराठा आरक्षण बाबतीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मत स्पष्ट करावे तसेच भाजप आणि शिवसेनेने सुद्धा मत स्पष्ट करावे, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज कोल्हापूरमध्ये केली. आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं प्रकाश आंबेडकर आज कोल्हापूरमध्ये (Prakash Ambedkar In Kolhapur) पोहोचले. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी सत्ताधारी आणि विरोधकांवर तोफ डागली. ओबीसींचे 100 आमदार निवडून आले पाहिजेत असे आमचे मत आहे. आमची राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये आरक्षण बचाव यात्रा सुरु असल्याचे ते म्हणाले. संविधान बचाव हा अजेंडा आम्ही सुरुवातीला घेतला होता. मात्र, त्यानंतर तो इंडिया आघाडीने घेतला. त्यामुळे मुस्लिम मते इंडिया आघाडीकडे वळली आणि आमच्या मतांमध्ये घट झाल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला

सगेसोयरेला आमचा विरोध 

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी आक्रमक पवित्रा घेत सरकारला अल्टीमेटम दिला आहे. याबाबत बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, सगेसोयरे आरक्षणाला आमचा विरोध आहे. सुप्रीम कोर्टाने सगेसोयरेबाबत जे जजमेंट दिलं आहे त्यामध्ये सगेसोयरे आरक्षण नाकारलं असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. मराठा समाजाचे ओबीसी आरक्षण देखील टिकणार नाही, त्यामुळे योग्य सल्ला घेऊन हे केलं पाहिजे अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी बोलताना केली. प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणावर बोलताना काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजप शिवसेनेवर देखील हल्लाबोल केला. ते म्हणाले की काँग्रेस आणि राष्ट्रवादी केवळ मराठ्यांचा पक्ष राहिला आहे. मराठा आरक्षणावर भाजप आणि शिवसेना देखील भूमिका स्पष्ट करत नाही. भाजप झुंजी लावून कसे लढतात हे बघत बसला आहे, अशी टीका त्यांनी केली. 

आम्हाला दोन्हीकडून वाजवलं जाणार 

प्रकाश आंबेडकर पुढे म्हणाले की मी ज्या समाजाचा आहे त्याची मत मला कशी मिळतील याचा प्रत्येक जण विचार करत आहे. शांतता राखावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्यामुळे यात्रा झाल्यानंतर विधानसभेचे बघू असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्हाला दोन्हीकडून वाजवले जाणार असल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. हे म्हणतात ते आमचे नाहीत आणि दुसरे म्हणतात हे आमचे नाहीत. त्यामुळे आम्हाला दोन्हीकडून बाजूला जाणार हे आम्हाला माहित आहे. मला भाजपची बी टीम सुद्धा म्हणतात पण मला कोणी हरवलं? अशी विचारणा त्यांनी केली. मला भाजपने हरवलं मग कसं म्हणता? असा प्रश्न त्यांनी केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget