एक्स्प्लोर

Aamir Khan Majha Katta: आमिर खानचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा

आमिर खानने 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा करुन शेतकऱ्यांना एक प्रकारचे गिफ्ट दिले आहे. या शेतकरी गटाला तज्ञांचे मार्गदर्शन देखील देणार असल्याचे त्याने सांगितले.

Aamir Khan and Satyajit Bhatkal Majha Katta : शेतकऱ्यांनी गट शेती केल्यामुळे उत्पादन खर्च कमी येईल. तसेच शेतकऱ्यांच्या अनेक समस्या कमी होतील असे मत अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले. आपल्याला परिसंस्था तयार करायची आहे. शेतकऱ्यांना आणखी ज्ञानी करण्यासाठी काम करायचे असल्याचे त्याने सांगितले. यावेळी आमिर खानने 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा करुन शेतकऱ्यांना एक प्रकारचे गिफ्ट दिले आहे. या शेतकरी गटाला तज्ञांचे मार्गदर्शन देखील देणार असल्याचे त्याने सांगितले. आधी आम्ही पाणी जिरवले आहे, आता आम्हाला शिवार फुलवायचा असल्याचे तो म्हणाला. 

एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमाला दहा वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून एबीपी माझाने महाकट्ट्याचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील दहा दिग्गज मान्यवरांशी संवाद साधण्यात येणार आहे. यावेळी अभिनेता आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांच्याशी साधला. यावेळी त्यांनी शेतीसंदर्भात करत असलेल्या कामासंबंधीची भूमिका मांडली.

फक्त पाण्यावर थांबून चालणार नाही

मी गावात जन्मलो असतो तर आज मी वेगळा असलो असतो. फिल्म आणि शेती याचा जवळचा संबंध असल्याचे आमिर खानने सांगितले. शेतीमध्ये विविधता आहे. शेतकऱ्यांचे आणि आमच्या समस्या सारख्याच असल्याचे आमिरने सांगितले. चार वर्ष आम्ही पाणी आडवा पाणी जिरवा यावर काम केले. अनेक शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला. पाण्याची क्षमता खूप मोठ्या प्रमाणात वाढल्याचे आमिर खान याने सांगितले. या चार वर्षाच्या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले. मात्र, आता फक्त पाण्यावर काम करुन चालणार नाही तर मृदा संवर्धन, पिक पद्धती, पाण्याचा वापर कसा करायला हवा याबाबत काम करावे लागणार आहे. प्रथम आम्ही राज्यातील 3 तालुक्यात काम सुरु केले, त्यानंतर 30 आणि शेवटी 70 तालुक्यात काम केल्याचे आमिर खानने सांगितले. गेल्या चार वर्षाच्या काळात आम्हाला खूप काही शिकायला मिळाले आहे. 


Aamir Khan Majha Katta: आमिर खानचं शेतकऱ्यांना गिफ्ट, 'सत्यमेव जयते फार्मर कप' या स्पर्धेची घोषणा

कोरोना काळात पणती तेवत ठेवणाऱ्या जलमित्रांना सलाम

वॉटर कप स्पर्धेची तयारी सुरु झाली होती त्यावेळी कोरोनाची संकट आले. या काळात कसे काम करणार हे मोठे आव्हान होते. याकाळा आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरु केले. जसे पाहिजे तशी ही दोन वर्ष  गेली नसल्याचे आमिर खानने सांगितले. कोरोना काळात संकटे असूनही जलमित्रांनी पणती तेवत ठेवली. एकाही गावात पणती विझली नाही. त्यांनी सातत्याने कामे सुरु ठेवली. त्या सर्व जलमित्रांना सलाम असल्याचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. गावात पाणी येते त्यावेळी त्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पाणी मोजणे गरजेचे असते असे भटकळ म्हणाले.

20 शेतकरी कुटुंबाचा सहभाग असणार

एक पीक एक गट यावर आधारीत 'सत्यमेव जयते फार्मर कप' ही स्पर्धा आयोजीत केली आहे. गट शेतीतील स्पर्धकांना शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार असल्याची माहिती पाणी फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. या स्पर्धेत किमान 20 शेतकरी कुटुंबाचा सहभाग असणार आहे. राज्यपातळीवर यासाठी बक्षीसे दिली जाणार आहेत. राज्यपातळीवर प्रथम येणाऱ्या शेतकरी गटाला 25 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. दुसरे बक्षीस 15 लाख, तर तिसरे बक्षीस 10 लाख रुपये दिले जाणार आहे. एकूण 42 रोख बक्षीसे दिली जाणार असल्याचे भटकळ यांनी सांगितले.

1 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोठे काम केले

पाणी फाऊंडेशनच्या कामाची सुरुवात झाली होती त्यावेळी 9 हजार ग्रामपंचायतीमध्ये काम सुरु केले होते. यातील 1 हजार ग्रामपंचायतीमध्ये मोठे काम केले. तिथे आता पाण्याची स्थिती खूप चांगली आहे. त्याठिकाणी आता गंज खात पडलेले टॅकर दिसत असल्याचे सत्यजित भटकळ यांनी सांगितले. आमचे ध्येय पुर्णपणे साध्य झाले नाही पण प्रक्रिया सुरु झाली आहे. पाण्याचे व्यवस्थापन हे सामुहिक पातळीवर झाले पाहिजे असे ते म्हणाले. त्यामुळेच सत्यमेव जयते फार्मर कप अशी स्पर्धा आयोजीत केली असल्याचे त्यांनी सांगितले.

आम्ही दोघे जण शाळेत असल्यापासून एकत्र आहोत असे भटकळ यानी सांगितले. आमच्यामध्ये बरेच साम्य आहे. अनेक मुद्दे वेगळेही आमच्यात आहेत असे त्यांनी सांगितले. यावेळी अमिर खाने याने 'एकजुटीन पेटलं रान तुफान आलया' गाणं म्हणून सर्वांची मने जिंकली. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?

व्हिडीओ

Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं
Adv Ashutosh Rathod : कोकाटेंची आमदारकी गेली की राहिली? याचिकाकर्ते राठोड यांनी स्पष्ट सांगितलं
माणिकराव कोकाटेंच्या अटकेला स्थगिती, उच्च न्यायालयाचा मोठा दिलासा

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election : भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
भाजपसोबत युतीसाठी राष्ट्रवादी आग्रही, अजितदादा- तटकरेंनी पक्षाचा आढावा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला
Pension Scheme : प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
प्रायव्हेट नोकरी करताय तर निवृत्तीनंतर पेन्शनचा जुगाड करा, 'या' योजनेतून मिळतील दरमहा 5000 रुपये
Disqualification of MLA : माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
माणिकराव कोकाटेंच्या प्रकरणामुळं आमदार अपात्रता चर्चेत , आमदार, खासदार कोणत्या कारणांमुळं अपात्र ठरतात?
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
माणिकराव कोकाटे दोषी आहेत की नाही, आमदारकी राहणार की जाणार, कोर्टाचा निर्णय नेमका काय?
Success Story : तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
तीन सख्खे भाऊ MPSC उत्तीर्ण, एकाच गावातील 15 पोरं अधिकारी, उखलगावच्या चंदन बंधूंचे प्रेरणादायी यश
Epstein files India: अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
अमेरिकेत दिवस उजाडला, एपस्टीन फाईल्ससाठी राहिले अवघे काही तास! काय काय बाहेर येणार? यादी समोर
Gold Rate : भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण, जाणून घ्या नवे दर
Nagpur Butibori MIDC : टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
टँक टॉवर कोसळून नागपूरच्या बुटीबोरी MIDCमध्ये मोठी दुर्घटना; तीन मजुरांचा मृत्यू, तर 11 जण जखमी, बचावकार्य सुरू
Embed widget