एक्स्प्लोर

Anna Hajare : अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे

Anna Hajare : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

Anna Hajare : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत अण्णांची मनधरणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन, त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. तसेच वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्यातून हरकती मागवल्या जातील त्या हरकतींचा सूर लक्षात घेऊन निर्णयाच्या अंमलबजावणी करायची की नाही तो निर्णय घेतला जाईल असं नायर यांनी अण्णांना सांगितले. वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत बोलताना अण्णांनी मी सरकारच्या निर्णयाबाबत 50 टक्के समाधानी असून उपोषणाबाबत ग्रामसभेत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अण्णांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून उपोषण करू नये असा ठराव ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला. याबाबत बोलताना अण्णा म्हणाले की, सरकारने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून अशा सरकारच्या राज्यात मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. असे निर्णय घेताना सरकारने जनतेच्या भूमिका जाणून घेणे गरजेचे असून तसं न झाल्यास याला लोकशाही कसं म्हणता येईल. असे निर्णय घेणे म्हणजे एक प्रकारची हुकूमशाहीच असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

मात्र, ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर ठेवत मी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारने जे आश्वासन मला दिले आहे त्यानुसार त्यांनी राज्यातून हरकती मागवाव्यात आणि तीन महिन्यात जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णायाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घ्यावा तसं न झाल्यास , आणि सरकारने घुमजाव केलं तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.मी आणखी तीव्र आंदोलन करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेईल असं अण्णांनी म्हटले आहे.सोबतच हा निर्णय आज झालेला असून 2001 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते असं अण्णांनी म्हटले आहे तसेच यात नेमकी कुणाकुणाचा फायदा होणार आहे त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल असं अण्णांनी म्हटले आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा सरकारचा 2001 पासून प्लॅन होता- अण्णा हजारे -
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेतली मात्र, मी ग्रामसभेनंतर निर्णय घेईल असं अण्णांनी म्हटले होते.त्यानुसार आज अण्णांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार उद्या उपोषण न करण्याचा निर्णय घेतला मात्र, सरकारने जे आश्वासन मला दिले आहे त्यानुसार त्यांनी राज्यातून हरकती मागवाव्यात आणि तीन महिन्यात जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णायाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घ्यावा तसं न झाल्यास , आणि सरकारने घुमजाव केलं तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.मी आणखी तीव्र आंदोलन करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेईल असं अण्णांनी म्हटले आहे.सोबतच हा निर्णय आज झालेला नसून 2001 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते असं अण्णांनी म्हटले आहे... तसेच यात नेमकी कुणाकुणाचा फायदा होणार आहे त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल असं अण्णांनी म्हटले आहे...

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Pandharpur : विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
विठ्ठल मंदिरात मुनगंटीवार नाराज, नातेवाईकांना दर्शनासाठी रोखलं; तर शिवसेनेचे मंत्री लवाजम्यासह आत, VIP दर्शनबंदीचा पहिल्याच दिवशी बोजवारा!
ST Bus Fare Hike : एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
एसटीची उन्हाळी हंगामातील 10 टक्के भाडेवाढ 'या' तारखेपर्यंत कायम, वाढत्या डिझेल दरामुळे निर्णय
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक

व्हिडीओ

NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!
Uddhav Thackeray Nagpur Ramraksha Andolan : नागपुरात रामरक्षा आंदोलनाची नवी कक्षा Special Report
Zero Hour Full : राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह ते नागपुरात रामरक्षा आंदोलन, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना,डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू
डेक्कन क्वीन आणि इंटरसिटी एक्सप्रेसची सेवा पूर्ववत - तिसऱ्या मार्गिकेचे काम सुरू,मध्य रेल्वेद्वारे दक्षिण-पूर्व घाटातील दुसऱ्या मार्गिकेची पुनर्स्थापना
Mohammad Ali Jauhar University : मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
मोहम्मद अली जौहर विद्यापीठावर बुलडोझर चालणार, 40 पैकी 38 इमारती जमीनदोस्त होणार, योगी आदित्यनाथ सरकारचा आदेश
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
... तर जनतेच्या मनात नेत्यांबद्दलचा विश्वास कमी होईल; मुख्यमंत्र्यांचं नाव घेत सुधीर मुनगंटीवारांनी स्पष्टच सांगितलं
Hydrogen Train : देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
देशातील पहिली हायड्रोजन ट्रेन जिंद ते सोनीपत दरम्यान धावणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 जुलै रोजी हिरवा झेंडा दाखवणार
Shaligram Garg Arrested : पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचा भाऊ शाळिग्राम गर्गला अटक, गोळीबार प्रकरणी अटकेची कारवाई
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
वाशिम पोलिसांसाठी मन सुन्न करणारी सकाळ; क्षणाचा राग अन् तीन चिमुकले अनाथ, पत्नीही कायमची गेली
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
कृषीमंत्री दत्तात्रय भरणेंनी अमोल मिटकरींना टाळलं पण, आमदार रवि राणांचा फोन उचलला; म्हणाले, किती हो तत्परता
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
मृत्यूनंतरही मरणयातना, जळत्या चितेवर कोसळली धूर चिमणी, सुदैवाने नातेवाईक बचावले; मनसे, शिवसेना आक्रमक
Embed widget