एक्स्प्लोर

Anna Hajare : अशा सरकारच्या राज्यात जगण्याची इच्छा नाही - अण्णा हजारे

Anna Hajare : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.

Anna Hajare : सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता. याबाबत अण्णांची मनधरणी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह यांनी अण्णांची राळेगणसिद्धी येथे भेट घेऊन, त्यांच्याशी तब्बल तीन तास चर्चा केली. तसेच वाईन विक्रीच्या निर्णयाबाबत राज्यातून हरकती मागवल्या जातील त्या हरकतींचा सूर लक्षात घेऊन निर्णयाच्या अंमलबजावणी करायची की नाही तो निर्णय घेतला जाईल असं नायर यांनी अण्णांना सांगितले. वाईन विक्री निर्णयाविरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे 14 फेब्रुवारीपासून आंदोलन करणार होते. मात्र, अण्णांनी उपोषण करू नये असा ग्रामसभेत ठराव करण्यात आला. वयाचा विचार करून अण्णांना उपोषण करण्याचा निर्णय मागे घेण्याची विनंती करण्यात आली. अण्णांनी ग्रामसभेचा ठराव मान्य केला आहे. त्यामुळे अण्णा आंदोलन करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत बोलताना अण्णांनी मी सरकारच्या निर्णयाबाबत 50 टक्के समाधानी असून उपोषणाबाबत ग्रामसभेत निर्णय घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार आज राळेगणसिद्धी येथे विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी अण्णांनी आपल्या वयाचा आणि प्रकृतीचा विचार करून उपोषण करू नये असा ठराव ग्रामसभेसमोर ठेवण्यात आला. याबाबत बोलताना अण्णा म्हणाले की, सरकारने घेतलेला निर्णय अतिशय दुर्दैवी असून अशा सरकारच्या राज्यात मला जगण्याची इच्छा राहिलेली नाही. असे निर्णय घेताना सरकारने जनतेच्या भूमिका जाणून घेणे गरजेचे असून तसं न झाल्यास याला लोकशाही कसं म्हणता येईल. असे निर्णय घेणे म्हणजे एक प्रकारची हुकूमशाहीच असल्याचे अण्णांनी म्हटले आहे.

मात्र, ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर ठेवत मी उपोषण न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, सरकारने जे आश्वासन मला दिले आहे त्यानुसार त्यांनी राज्यातून हरकती मागवाव्यात आणि तीन महिन्यात जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णायाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घ्यावा तसं न झाल्यास , आणि सरकारने घुमजाव केलं तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.मी आणखी तीव्र आंदोलन करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेईल असं अण्णांनी म्हटले आहे.सोबतच हा निर्णय आज झालेला असून 2001 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते असं अण्णांनी म्हटले आहे तसेच यात नेमकी कुणाकुणाचा फायदा होणार आहे त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल असं अण्णांनी म्हटले आहे.

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा सरकारचा 2001 पासून प्लॅन होता- अण्णा हजारे -
सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 14 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला होता.त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची मनधरणी करण्यासाठी त्यांची भेट घेतली मात्र, मी ग्रामसभेनंतर निर्णय घेईल असं अण्णांनी म्हटले होते.त्यानुसार आज अण्णांनी ग्रामसभेत झालेल्या ठरावानुसार उद्या उपोषण न करण्याचा निर्णय घेतला मात्र, सरकारने जे आश्वासन मला दिले आहे त्यानुसार त्यांनी राज्यातून हरकती मागवाव्यात आणि तीन महिन्यात जनतेचा सूर लक्षात घेऊन वाईन विक्रीच्या निर्णायाच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घ्यावा तसं न झाल्यास , आणि सरकारने घुमजाव केलं तर माझा उपोषणाचा मार्ग मोकळा आहे.मी आणखी तीव्र आंदोलन करेल, राज्यभर फिरून कार्यकर्त्यांच्या भूमिका जाणून घेईल असं अण्णांनी म्हटले आहे.सोबतच हा निर्णय आज झालेला नसून 2001 पासून या निर्णयाबाबत सरकार प्रयत्नशील होते असं अण्णांनी म्हटले आहे... तसेच यात नेमकी कुणाकुणाचा फायदा होणार आहे त्यांची नावे मी लवकरच जाहीर करेल असं अण्णांनी म्हटले आहे...

मागच्या एक वर्षापासून एबीपी माझा सोबत कार्यरत...8 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत... व्यंगचित्रकार म्हणून पत्रकारितेला सुरुवात
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
गोरेगावमधील गोकुळधाम परिसरातील इमारतीला भीषण आग, होरपळून एका महिलेचा मृत्यू 
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
रेल्वेच्या खांबावर चढला, करंट लागून खाली पडला; मुंबईत दोन तास रेल्वेसेवा विस्कळीत
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 मार्च 2026 | रविवार

व्हिडीओ

Ramdas Athwale on Ashok Kharat : नाशिकमधील खरात भोंदूबाबाला फाशीची शिक्षा द्या
Vinayak Raut On Deepak Kesarkar : खरातप्रकरणी विनायक राऊतांचे खळबळजनक दावे
Jaykumar Gore Satara : पालकमंत्र्यांचे आकांडतांडव आणि पोलिसांची हरेसमेंट थांबवा, देसाईंवर प्रहार
Rupali Thombare On Rupali Chakankar : भोंदूबाबा राज्य महिला आयोग चालवत होता- रुपाली ठोंबरे
Ashok Kharat Case : खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांची तक्रार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Indians : हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
हार्दिक पांड्या नव्हे सूर्यकुमार यादवला मुंबईचा कर्णधार करा, भारताच्या माजी कॅप्टनचा सल्ला
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल, पीडित महिलांना सरकारशी संपर्क करण्याचं आवाहन
प्रत्येक धर्मात अशोक खरातसारखे काही सडके आंबे निघतातच, नितेश राणेंचा हल्लाबोल
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Datta Meghe Passes Away : माजी मंत्री दत्ता मेघे यांचं निधन, वयाच्या 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
संतापजनक! 50 वर्षाच्या नराधमाने अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार, परळीत पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल
Nanded : नांदेडच्या प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
प्रफुल्ल पाटील या तरुणानं नातं जपलं, भावाच्या निधनानंतर वहिनीसोबत विवाह, पोरका झालेला संसार सावरला
Maharashtra Kesari नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 68 वा 'महाराष्ट्र केसरी'; फॉर्च्यूनर जिंकणारा पहिला पैलवान, चांदीची गदा अन् बक्षिसांचा वर्षाव
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
पर्यटकांला अतिउत्साह नडला, फॉर्च्यूनर थेट समुद्रात अडकली; जेसीबी बोलवून बाहेर काढली, समुद्रकिनारी पाहायला गर्दी
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
ईदनिमित्ताने नातेवाईकांकडे जाताना कारला भीषण अपघात; परभणीत एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू
Embed widget