एक्स्प्लोर

आत्तापर्यंत राज्यातील 11 लाख 87 हजार स्थलांतरीत मजूर आपल्या राज्यात परतले

1 मे पर्यंत एस.टी. च्या माध्यमातून 5 लाख 30 हजार प्रवाशांना घरी पोहचवलं. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजूरांसाठी राज्यभरात 5427 कँप उभारले.

मुंबई : 1 जूनपर्यंत राज्यातील जवळपास 12 लाख स्थलांतरित मजूर आपल्या राज्यात सुखरुप परतल्याची माहिती राज्य सरकारच्यावतीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. लॉकडाऊनच्या काळात आपापल्या राज्यात परतण्यासाठी आतुर असलेल्या स्थलांतरित मजूरांची घरी परतण्याची मागणी श्रमिक रेल्वेच्या माध्यमातून पूर्ण करण्यात आली असून त्यांच्या कोणत्याही मागण्या आता प्रलंबित नाहीत असंही हायकोर्टात सांगण्यात आलं आहे.

कोरोनामुळे हजारो मजुरांनी आपापल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सोयीसाठी रेल्वे आणि परिवहन प्रशासनाकडून मजूरांसाठी विशेष श्रमिक रेल्वे तसेच बसेस सोडण्यात आल्या. मात्र, श्रमिक विशेष रेल्वे आणि बसेससाठी मजुरांनी दाखल केलेल्या अर्जाच्या स्थितीबाबत त्यांनाच अंधारात ठेवण्यात आले. या मजुरांना प्रतिक्षा कालावधीत देण्यात आलेली शेल्टरर्सही अरुंद, अस्वच्छ आहेत. तसेच मजुरांना अन्न आणि इतर जीवनावश्यक वस्तू योग्यरित्या पुरविण्यात येत नसल्याचा दावा करणारी याचिका सेंट्रल ऑफ इंडियन ट्रेड युनियननं हायकोर्टात दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पार पडली.

या सुनावणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन विभागाचे सचिव किशोर निंबाळकर यांनी प्रतिज्ञापत्र सादर करत याचिकाकर्त्यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. 1 जूनपर्यंत एकूण 822 श्रमिक ट्रेनच्या माध्यमातून साधारणतः 11 लाख 87 हजार 150 मजूर त्यांच्या राज्यात परतले आहेत. श्रमिक ट्रेनमध्ये आता मणिपूरकडे रवाना होणारी फक्त एकच ट्रेन उरली असून त्यानंतर हे मिशन पूर्ण होईल असंही प्रतित्रापत्रातून नमूद करण्यात आले आहे. या श्रमिक ट्रेनसाठी मजूरांकडून कोणतेही भाडे आकारण्यात आलेले नाही. या कामगार आणि इतर अडकलेल्यांना परत पाठविण्यासाठी रेल्वे प्रशासनाला राज्य सरकारने जिल्ह्याधिकाऱ्यांमार्फत 97.69 कोटी रुपये वितरित केले. ज्यातनं अन्न, वस्त्र, निवारा तसेच वैद्यकीय सेवा पुरविण्यसाठी योग्य त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्याचं या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. तसेच 10 एप्रिलपर्यंत राज्यभरात 5427 रिलिफ कँप उभारण्यात आले. त्यात 6 लाख 66 हजार 994 मजुरांच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. 31 मे पर्यंत हा आकडा 37 हजार 994 वर उतरला.

Thane Mission Began Again | प्रतिबंधित क्षेत्र वगळता ठाण्यातील दुकानं सुरु

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
राज्यातील 39 आमदार अशोक खरातच्या तंत्र-मंत्र भोंदूगिरीत सामील, त्या आमदारांच्या राजीनाम्यासाठी  माकप आंदोलन करणार 
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
अलिबाग वडखळ मार्गावर भीषण अपघात, आयशर टेम्पोची कंटेनरला जोराची धडक, एकाचा जागीच मृत्यू
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत
अब्जाधिश सलमान खानच्या पायात फाटके बूट, व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांनी शोधून काढली ब्रँडेड किंमत

व्हिडीओ

Donald Trump Warning Iran : Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
Khalapur Fake Bhondubaba Case : खरातनंतर आता खालापूरचा बाबाजान, जादूटोण्याच्या बहाण्याने अत्याचार
Congress On Himanta Biswa Sarma : आसामचा रणसंग्राम, काँग्रेसची हिमंता बिस्वा यांच्यावर गंभीर आरोप
Ashok Kharat Case : अशोक खरात प्रकरणात आता ईडीची एन्ट्री? मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
Khalapur Bhondu Baba : खालापूरमध्ये भोंदूबाबाचा पर्दाफाश, अनेक महिलांवर केला अत्याचार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Assam Election : आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्या पत्नीकडे तीन देशांचा पासपोर्ट, काँग्रेसचा मोठा आरोप 
Hormuz Strait Crisis : होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
होर्मुझ सामुद्रधुनी खुली करा नाहीतर नरकात जाल, डोनाल्ड ट्रम्प यांचा आटापिटा सुरुच, इराणला वाहिली शिव्यांची लाखोली
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
ना दहावा, ना तेरवा, तुकाराम मुंढेंनी आईच्या अस्थी विसर्जन करुन सांगितला विज्ञान विचार; म्हणाले, निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
CM देवेंद्र फडणवीस म्हणाले, अशोक खरातचा सीडीआर कुठून आला, ह्याचा तपास करू; अंजली दमानियांची पहिली प्रतिक्रिया
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
तुकाराम मुंढेंचं आदर्शवत पाऊल, रुढींना फाटा, आईंच्या अस्थींचे शेतातच विसर्जन; वडाचं रोपटं लावून जपली आठवण
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
राघव चड्ढांनी आम आदमी पार्टी सोडल्यास किंवा त्यांना पक्षानं काढून टाकल्यास खासदारकीचे काय? जाणार की राहणार??
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
भोंदू अशोक खरातचं बीड कनेक्शन, गर्भलिंगनिदान अन् रुपाली चाकणकरांचं नावं; पत्रानंतर महिला नेत्याचा गंभीर आरोप
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
ह्रदयद्रावक... संभाजीनगरमध्ये मन हेलावणारी घटना; पोहायला गेलेल्या तलावात बुडून 4 तरुणांचा मृत्यू
Embed widget