एक्स्प्लोर

Amravati News : अबब! एकाच घरातून निघाले तब्बल 10 अजगर, उत्तमसरा येथील घटना

Amravati Rain Update : अमरावतीत मात्र एका घरात एक किंवा दोन नव्हे तर, तब्बल 10 अजगर आढळले आहेत. घरातील गादीत, चुलीत, गोठ्यात अजगराचे 10 पिल्लू आढळले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.

Amravati News : अमरावती शहरासह जिल्ह्यात सर्वत्र सतत पाऊस सुरू आहे. पावसाळ्याला सुरुवात होताच मानव वस्तीत सरपटणाऱ्या प्राण्यांच्या आढळण्याच्या घटनांमध्ये वाढ होते. अमरावतीत मात्र एका घरात एक किंवा दोन नव्हे तर, तब्बल 10 अजगर आढळले आहेत. ही घटना आहे भातकुली तालुक्यातील उत्तमसरा या गावात समोर आली आहे. घरातील गादीत, चुलीत, गोठ्यात अजगराचे 10 पिल्लू आढळले असून त्यांना रेस्क्यू करण्यात आलं आहे.

उत्तमसरा गावातील बंडू मतालाने यांच्या घराजवळ एक साप आढळल्याची माहिती वसा संस्थेला मिळाली. वसा अनिमल्स रेस्क्यू टीमचे सर्पमित्र ओम यावले आणि मुकेश मालवे यांनी तो साप अजगराचे पिल्लू असल्याची पुष्टी केली. त्यानंतर सुनीता यावले यांच्या घरात झोपण्याच्या गादीत, चुलीमध्ये, टिनाच्या कप्प्यात, अंगणात अशी 6 अजगराची पिल्ले सर्पमित्रांनी रेस्क्यू केली. 

एकाच घरातून निघाले चक्क 10 अजगर

दुसऱ्या दिवशी बाजूच्या घरात सुद्धा अजगराचे पिल्लू आढळून आले. त्यांनी ते स्वतः प्लास्टिक डब्यात बंद करून नदीवर नेऊन सोडलं. त्यानंतर शेजारी बकऱ्यांच्या गोठ्यात गेले असता त्यांना गोठ्याच्या टिनात अजगराचं पिल्लू दिसून आले. ते पिल्लू सुद्धा वसा संस्थेच्या सर्पमित्रांनी रेस्क्यू केलं. दिवस भर पावसाने उघडीप दिल्यानंतर गावात कुठे अजगराचे पिल्ले आढळून आले नाहीत. मात्र रात्री पावसाला सुरू होताच तब्बल आठ फूट लांबीची अजगराची मादी कुलपत शेंडे यांच्या गोठ्याजवळ आढळून आली. सर्पमित्र मुकेश मालवे यांनी मोठ्या शिताफीने तिला रेस्क्यू केलं.

पाहा व्हिडीओ : 

जिल्हाधिकारी कार्यालय आवारात 7 फुटी धामण

अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात 7 फुटी धामण जातीचा साप आढळला. मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात अचानक साप दिसल्याने लोकांची एकच तारांबळ उडाली होती. साप पाहूनच अनेकांनी तिथून पळ काढला. थोड्यावेळाने सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. सर्पमित्राने सापाला पकडून जंगलात सोडलं. सध्या पावसाळा सुरू झाल्याने अनेक ठिकाणी साप दिसून येत आहेत, त्यामुळे लोकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Amravati News : शेतकऱ्यांसाठीच्या सर्व सुविधा एकाच ठिकाणी, अमरावती जिल्ह्यात 734 पीएम समृद्धी केंद्र सुरू होणार

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More

महत्त्वाच्या बातम्या

सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
सावधान! पुढील तीन दिवस पुणेकरांसाठी महत्वाचे, हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी, नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन   
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parth Pawar : तुम्ही आज आमच्यात नाही, ही उणीव फक्त पवार कुटुंबालाच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राला जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
प्रत्येक पावलावर तुमची उणीव जाणवते, पार्थ पवार यांची अजितदादांसाठी भावनिक पोस्ट
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget