एक्स्प्लोर

Chandrakant Patil : एका रात्रीत निर्णय बदलला! कोल्हापूरमध्ये आता चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार  

कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते

Kolhapur News : कोल्हापूरमध्ये 15 ऑगस्टला कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न होणार आहे. एका रात्रीत हा निर्णय बदलण्यात आला आहे. यापूर्वी जारी करण्यात आलेल्या आदेशात चंद्रकांत पाटील पुण्यात ध्वजारोहण करणार होते, तर कोल्हापूरची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांवर देण्यात आली होती. मात्र, आता पुण्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ध्वजारोहण करतील आणि चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये असतील.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जिल्हानिहाय कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होईल, याबाबत काल आदेश जारी केला होता. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर तब्बल 40 दिवसानंतरही एकनाथ शिंदे सरकारकडून मंत्रिमंडळ विस्तार झाला नव्हता. त्यामुळे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत असताना महाराष्ट्रात मात्र 15 ऑगस्टला जिल्ह्यामध्ये कोणाच्या हस्ते ध्वजारोहण होणार? याची चिंता लागून राहिली होती. 

मात्र, अखेर मंत्रिमंडळ विस्तारात 18 जणांचा शपथविधी झाल्याने त्यांना ध्वजारोहण करण्यासाठी जिल्हे विभागून देण्यात आले आहेत. मंत्री नसलेल्या जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्या आदेशाने माहिती देण्यात आली आहे. 

घरोघरी तिरंगा’ उपक्रम, तिरंगासह सेल्फी पोर्टलवर पाठवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडून आवाहन 

दरम्यान, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट, 2022 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत https://harghartiranga.com/ या पोर्टलवर PIN A FLAG व UPLOAD SELFIE WITH FLAG  दोन बटनवर क्लिक करुन सेल्फी, तिरंगासह फोटो अपलोडरावा, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे. 

तसेच याबाबत नागरिकांना व शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना अवगत करावे व कोल्हापूर जिल्ह्यातून तिरंगासह जास्तीत- जास्त सेल्फी, फोटो अपलोड होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घरोघरी तिरंगा उपक्रमांतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी आस्थापना, शैक्षणिक संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तीने करावयाची आहे.

हे तीन दिवस घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल. म्हणजेच कार्यालयांनी दररोज सूर्यास्तापूर्वी ध्वज उतरविणे आवश्यक आहे.

घरोघरी तिरंगा कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना व नियमावलीबाबत लोकांमध्ये जनजागृतीसाठी स्थानिक स्तरावर शिक्षण व संवाद उपक्रमांचे आयोजन करावे. काही गावे शहर या ठिकाणी घरे/ इमारती/ कार्यालये/दुकाने यांचे तिरंगा लावल्यानंतरचे फोटो व व्हिडीओ ड्रोन शूटिंगने घेवून त्याचे फोटो व व्हिडीओ पाठविण्यात यावेत, अशाही सूचना जिल्हाधिकारी रेखावार यांनी केल्या आहेत.


Chandrakant Patil : एका रात्रीत निर्णय बदलला! कोल्हापूरमध्ये आता चंद्रकांत पाटलांच्या हस्ते 15 ऑगस्टला ध्वजारोहण होणार  

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण
... म्हणून जरांगे पाटलांच्या भेटीसाठी उपोषणस्थळी गेलो नाही; उदय सामंतांनी सांगितलं विखे पाटलाचं राज'कारण'
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
गोकुळच्या निवडणुकीसाठी महायुती मैदानात, कोल्हापुरात नेत्यांची बैठक, महायुती विरुद्ध सतेज पाटील सामना रंगणार
Gokul Election: 'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास
'गोकुळ'ला 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र, मागणी तसा पुरवठा, आखाती देशांमध्ये 'गोकुळ'च्या उत्पादनांना मागणी; निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या घामाला धर्माचा वास

व्हिडीओ

Abdul Sattar on Shiv Sena Merger : दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजे; शिंदेंचा आमदार खूप काही बोलला
Pune NCP Vidhan Parishad : पुण्यात अर्ज भरताना गोंधळ, एकाच पक्षातून 2 अर्ज भरण्यासाठी गडबड
Nitin Gadkari Speech : राजकारणातील 90 टक्के खेळाडू वाट पाहतात की कोणत्या पार्टीचे सरकार येईल?
Mahendra Dalvi : कोकणच्या जागेवर राष्ट्रवादीचा संबंधच नाही, शिवसेना ठाम - दळवी | ABP Majha
Rajasthan Dust Storm : राजस्थानात धुळीच्या वादळाचा कहर! अचानक कसं घोंघावलं संकट? | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gokul Kolhapur: 'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
'गोकुळ'मधील प्रशासक काळात पहिला दणका; विभागीय दुग्ध निबंधकाकडून 427 संस्थांवर सर्जिकल स्ट्राईक
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
फसव्या जाहिराती करणाऱ्या सेलिब्रिटींवरही कारवाई; तुकाराम मुंढेंचा इशारा, ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी धडाडीचं पाऊल
Iran War Live: तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
तोपर्यंत मध्यस्थांमार्फत अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा होणार नाही; इराणचा शांतता चर्चेला थेट ब्रेक, ट्रम्पच्या दाव्यांना तगडा झटका
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
अब्दुल सत्तार म्हणाले, दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, पश्चाताप झाला असेल तर...
Vaibhav Sooryavanshi: आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाचे पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
आयपीएलमध्ये चौकार षटकारांचा पाऊस पाडत ऑरेंज कॅप पटकावलेला वैभव सूर्यवंशी काय काय म्हणाला? अवघ्या 15 वर्षाच्या पोराच्या शब्दांनी अनेकांचे डोळे उघडतील!
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
रिलायन्स कम्युनिकेशन्स प्रकरणात अमिताभ झुनझुनवाला अटकेत; आर्थर रोड कारागृहात पाठवलं
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
मुंबईतील म्हाडाच्या 2,640 घरांच्या सोडतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, 75,366 अर्ज प्राप्त; कधी होणार सोडत, तारीख समोर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 1 जून 2026 | सोमवार
Embed widget