एक्स्प्लोर

Sangli : कृष्णेच्या पाण्याची पातळी 30 फुटांजवळ, औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी शिरले

सांगलीतील पाणी पातळी  35  फूटापर्यंत वाढण्याची शक्यता पूरनियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

कोयनेतील विसर्ग वाढविल्याने एकीकडे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढती आहे तर दुसरीकडे आज सायंकाळच्या सुमारास औदुंबरच्या दत्त मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये कृष्णा नदीचे पाणी गेले आणि उत्सव मूर्ती मंदिरातून देवघरामध्ये हलवली. मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घालून मूर्ती देवघरात हलवली गेली. काल रात्रीच औदुंबरमधील दत्त मंदिर परिसरात पाणी शिरले होते. आज कोयनेतून विसर्ग वाढवल्याने सकाळपासून मंदिर परिसरातील पातळी वाढत होती. सायंकाळच्या सुमारास पाणी मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात शिरले. जिल्ह्यात मोठा पाऊस नसला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने सांगलीतील पाणी पातळी  35  फूटापर्यंत वाढण्याची शक्यता पूरनियंत्रण कक्षाकडून व्यक्त करण्यात आली आहे. 

गेल्या पाच दिवसापासून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरणातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे. कोयनेमध्ये  83 टक्के तर चांदोली धरणामध्ये  92 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज  सकाळी दहा वाजता कोयना धरणाच्या वक्राकार दरवाजातून  8  हजार आणि पायथा विद्युतगृहातून  2  हजार  100  क्युसेक  पाण्याचा  विसर्ग करण्यात येत आहे. तसेच चांदोलीतून  9  हजार  231, दूधगंगातून  5 हजार 816 , पाटगावमधून  250 , धोममधून  2  हजार 86, उरमोडीमधून 5  हजार  54 आणि तारळी धरणातून 1 हजार  212   क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे कृष्णा, वारणा व पंचगंगा नदीतील  पाण्याची पातळी झपाट्याने वाढत  आहे. तर विविध धरणातील विसर्ग लक्षात घेउन संभाव्य पूरहानी टाळण्यासाठी अलमट्टीमधून पाण्याचा विसर्ग सव्वा दोन लाख  क्युसेक करण्यात आला आहे. कोयनेतून केल्या जात असलेल्या विसर्गामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी  सांगलीतील आयर्विन पूलाजवळ  35 फूटापर्यंत  जाण्याची शक्यता  पूर नियंत्रण कक्षाच्या प्रभारी कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी सांगितले. 

नागठाणे व डिग्रज  बंधारे पाण्याखाली गेले असून औदुंबरमधील दत्त मंदिराच्या गाभार्‍यात नदीचे पाणी शिरले आहे. शुक्रवारी  दुपारी सांगलीतील  पाणी पातळी  29  फूट 7 इंच झाली होती. या ठिकाणी इशारा पातळी 40  तर धोका पातळी  45  फूट असून  35  फूट पाणी पातळी झाल्यानंतर शहरातील नदीकाठी असलेल्या सुर्यवंशी व इनामदार प्लॉट, कर्नाळ रस्ता, शिवमंदिर परिसर, बायपास  चौक,  काकानगर, दत्तनगर परिसरातील नागरी वस्तीमध्ये पूराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. उद्या  सकाळपर्यंत या भागात पाणी शिरण्याची शक्यता असून नागरिकांनी आज सुरक्षितस्थळी स्थलांतर सुरू केले आहे.

संबंधित बातम्या :

Kolhapur Rain : नृसिंहवाडीतील दत्त मंदिर पुराच्या पाण्याखाली, कृष्णा आणि पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

City Sixty : सिटी 60 बातम्यांचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर : 26 February 2025 : ABP Majha : 7 PmABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 26 February 2025JOB Majha News : केंद्रीय औद्योगित सुरक्ष दलमध्ये नोकरीची संधी,  शैक्षणिक पात्रता काय? 26 Feb 2025ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07PM 26 February 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
फक्त 11 रुपयांत मिळणार विमानाचे तिकीट! 'या' ऑफरमुळे देशात खळबळ
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
उन्हाचा कहर, महाराष्ट्र तापला, ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक तापमानाची नोंद; गोव्यातही वाढलं टेंपरेचर
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
चाहे जाओ मुंबई, दिल्ली, आगरा... सोलापुरात भाच्याच्या लग्नात मामाने नाचवल्या बारबाला; पोलिसांचा फौजफाटा आला
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
पुण्यातील घटनेनंतर मंत्रालयात उद्याच बैठक; बस स्थानकांतील जुन्या बसेस संदर्भातही महत्त्वाचे निर्देश
Chandrapur News : महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
महाशिवरात्रीनिमित्य देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांवर काळाचा घाला; वैनगंगा नदीत बुडून 3 सख्या बहि‍णींचा दुर्दैवी अंत
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
पुण्यातील धक्कादायक घटनेनंतर अजित पवारांचा लाडक्या बहि‍णींना शब्द; CM फडणवीसांनीही घेतली दखल
Prashant Kishor : बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
बिहारमध्ये अजूनही डाळ शिजत नसल्याने, प्रशांत किशोर जुन्या मार्गावर? उत्तरेतून दक्षिणेकडे मोर्चा वळवत कोणता संदेश दिला??
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
कर्नाटक प्रशासनाची महाराष्ट्रात तब्बल पाच दिवसानंतर बस सेवा पूर्ववत, कोल्हापुरातून बेळगावपर्यंत बस धावली
Embed widget