एक्स्प्लोर

कारखानदार अगोदर बगलबच्च्यांचा ऊस नेतात, सर्वसामान्यांचा ऊस जाळून जातो; राजू शेट्टींचा प्रहार 

राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

Raju Shetti : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते ऐकमेकावंर आरोप प्रत्यारोप करत आहे. अशातच हातकणंगले लोकसभा (Hatkanagle Loksabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण देखील चांगलच गरम झालं आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. शिरसीमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस कधी जाळून गाळपास नेलाय का?

माझ्या विरोधात साखर कारखानदार लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत. पण बिले द्यायचे नाव काढत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस या लोकांनीच वाळवलेला आहे. कारण यांच्याकडे टोळ्या कमी आहेत. तोडणी यंत्रणा कमी आहे. बहुसंख्या टोळ्या पळून गेल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळून न्यायला लावतात. एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास गेलेले एक उदाहरण असेल तर मला द्या असेही शेट्टी म्हणाले. सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांची ऊस जाळून कारखान्याला जातो. यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होते असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे

माझ्यावर काही महाभाग टीका करत आहेत की, राजू शेट्टी यांनी आंदोलन केले म्हणून ऊसाच्या तोडण्या उशीरा सुरू झाल्या. फेब्रुवारीनंतर दरवर्षी साखर कारखानदार ऊस जाळूनच नेतात. त्यात सभासद नसला की टनाला 300 रुपये कमी करतात. यामधूनही पण शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरच शेतकरी चळवळ टिकणार आहे असं राजू शेट्टी म्हणाले. आपण देशाला अन्नधान्य पुरवतो. मात्र शेतकरी उपाशीची आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाल्यास शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील युवकांना रोजगारासाठी मुंबईला जायची गरज भासणार नाही. यासाठी मला एमएसपीचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी संसदेत जायचे आहे असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार 

शिराळा तालुका हा दुर्गम भाग आहे. ऊसाबरोबरच इतर पिके देखील याठिकाणी घेतली जातात. येथील शेतकऱ्यांची गुंट्याची शेती आहे. शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही. मिळतो तो केवळ शेतीमधूनच. त्यासाठी लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतीमालाला दर मिळावा म्हणून गेली 30 वर्षे मी संघर्ष करतोय. मी खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडलेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अधिकर 2018 या दोन विधेयकांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मला संसदेत जाऊन ती विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे शेट्टी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींच्या एकूण संपत्तीत आणि कर्जातही वाढ; एकूण किती कोटींची संपत्ती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा

व्हिडीओ

Chandrapur Mayor : चंद्रपुरात पक्षाअंतर्गत कुरघोडीला उधाण  Special Report
Solapur Praniti shinde Vs Jaykumar gore : निकालानंतरचे शोले टीका, टोमणे, टोले Special Report
Samadhan Sarvankar : सरवणकरांचं अ 'समाधान' भाजपवर शरसंधान Special Report
NCP on ZP Election : महापालिकेच्या पराभवानंतर पवारांनी कोणता धडा घेतला? Special Report
BJP on Samadhan Sarvankar : समाधान सरवणकर यांना जी मत मिळाली ती फक्त भाजपमुळे

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chandrapur : चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
चंद्रपुरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष, पण त्यातही नगरसेवकांचे दोन गट; वादाचा फायदा घेण्यासाठी भाजप सरसावलं
Kolhapur : लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
लेबल महाराष्ट्राचे, दारू गोव्याची; कोल्हापुरात मोठा छापा, 40 लाखांची देशी दारू जप्त
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
तौरल इंडियाने वर्षभरात उत्पादनही सुरू केलं; दावोसमध्ये मुख्यमंत्री म्हणाले, मराठमोळ्या भरत गीतेंचा अभिमान
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
काँग्रेसने चंद्रपूर जिंकलं पण नेत्यांकडून नगरसेवकांची पळवापळवी; प्रतिभा धानोकरांचा वडेट्टीवारांना इशारा
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
ह्रदयद्रावक... अंत्यविधीवरुन घराकडे जाताना अपघात, नदीवरुन कोसळली कार; दोघांचा मृत्यू, 3 जखमी
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
Video: युती तोडा, संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्त्यांकडून राडा; झेडपीसाठी फॉर्म्युला ठरताच मंत्र्यांसमोर फुल्ल ड्रामा
NCP : शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
शक्य तिथे घड्याळ, शक्य तिथे तुतारी; झेडपीसाठी दोन्ही राष्ट्रवादीतील अंडरस्टँडिंग निर्णायक वळणावर
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
प्रणिती शिंदेंनी कार्यकर्त्यांचं वाटोळं केलं; जयकुमार गोरेंची बोचरी टीका, म्हणाले आलेले दोन नगरसेवक सांभाळा
Embed widget