एक्स्प्लोर

कारखानदार अगोदर बगलबच्च्यांचा ऊस नेतात, सर्वसामान्यांचा ऊस जाळून जातो; राजू शेट्टींचा प्रहार 

राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

Raju Shetti : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. राजकीय नेते ऐकमेकावंर आरोप प्रत्यारोप करत आहे. अशातच हातकणंगले लोकसभा (Hatkanagle Loksabha) मतदारसंघातील राजकीय वातावरण देखील चांगलच गरम झालं आहे. या मतदारसंघातून राजू शेट्टी (Raju Shetti) निवडणूक लढवत आहेत. त्यांनी प्रचाराला सुरुवात केलीय. शिरसीमध्ये आयोजीत केलेल्या प्रचारसभेत बोलताना राजू शेट्टी यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली. कारखानदार आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचा ऊस जाळून न्यायला लावतात, असे राजू शेट्टी म्हणाले. 

साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस कधी जाळून गाळपास नेलाय का?

माझ्या विरोधात साखर कारखानदार लोकसभेच्या प्रचारात उतरले आहेत. पण बिले द्यायचे नाव काढत नाहीत. शेतकऱ्यांचा ऊस या लोकांनीच वाळवलेला आहे. कारण यांच्याकडे टोळ्या कमी आहेत. तोडणी यंत्रणा कमी आहे. बहुसंख्या टोळ्या पळून गेल्या आहेत. आपल्या बगलबच्च्यांचा ऊस अगोदर नेतात. पण तुमच्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना ऊस जाळून न्यायला लावतात. एखाद्या साखर कारखानदाराने स्वतःचा ऊस जाळून गाळपास गेलेले एक उदाहरण असेल तर मला द्या असेही शेट्टी म्हणाले. सर्वसामान्य व गोरगरीब शेतकऱ्यांची ऊस जाळून कारखान्याला जातो. यामुळं शेतकऱ्याचं नुकसान होते असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे

माझ्यावर काही महाभाग टीका करत आहेत की, राजू शेट्टी यांनी आंदोलन केले म्हणून ऊसाच्या तोडण्या उशीरा सुरू झाल्या. फेब्रुवारीनंतर दरवर्षी साखर कारखानदार ऊस जाळूनच नेतात. त्यात सभासद नसला की टनाला 300 रुपये कमी करतात. यामधूनही पण शेतकऱ्यांची लूट करत आहेत. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट आहे. शेतकऱ्यांनी संघटीत होऊन लढा दिला पाहिजे. तरच शेतकरी चळवळ टिकणार आहे असं राजू शेट्टी म्हणाले. आपण देशाला अन्नधान्य पुरवतो. मात्र शेतकरी उपाशीची आहे. शेतीमालाला हमीभाव मिळाल्यास शिराळा तालुक्यातील डोंगरी भागातील युवकांना रोजगारासाठी मुंबईला जायची गरज भासणार नाही. यासाठी मला एमएसपीचा कायदा मंजूर करून घेण्यासाठी संसदेत जायचे आहे असे राजू शेट्टी म्हणाले. 

शेतकऱ्यांच्या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार 

शिराळा तालुका हा दुर्गम भाग आहे. ऊसाबरोबरच इतर पिके देखील याठिकाणी घेतली जातात. येथील शेतकऱ्यांची गुंट्याची शेती आहे. शेतीमालाला दर मिळत नाही. शेतकऱ्यांची या अवस्थेला राज्यकर्तेच जबाबदार आहेत. ग्रामीण भागात रोजगार मिळत नाही. मिळतो तो केवळ शेतीमधूनच. त्यासाठी लोकांना पुणे, मुंबईत नोकरीसाठी जावे लागते. शेतीमालाला दर मिळावा म्हणून गेली 30 वर्षे मी संघर्ष करतोय. मी खासदार असताना लोकसभेत दोन अशासकीय विधेयके मांडलेली आहेत. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव, शेतकऱ्यांना कर्जमुक्ती अधिकर 2018 या दोन विधेयकांना अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. मला संसदेत जाऊन ती विधेयके मंजूर करून घ्यायची आहेत. त्यासाठी मी लागेल ती किंमत मोजायला तयार असल्याचे शेट्टी म्हणाले. 

महत्वाच्या बातम्या:

Raju Shetti : 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींच्या एकूण संपत्तीत आणि कर्जातही वाढ; एकूण किती कोटींची संपत्ती?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Uddhav Thackeray Shivsena : गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपचा बुरखा फाटलेला, उद्धव ठाकरेंची टीका
Omraje Nimbalkar अतिवृष्टीच्या मदतीबाबत सरकारनं प्रस्ताव तातडीने पाठवावा,निंबाळकर 'माझा'वर EXCLUSIVE
Khasbag Kusti Maidan Kolhapur:50 लि. दूध,10पोती लिंबू,10 पोती हळद,10 डबे तेल,खासबाग मैदानाचा खुराक
Devendra Fadnavis Meet Sanjay Raut : देवेंद्र फडणवीसांनी घेतली संजय राऊतांची भेट
Maharashtra Municipal Election 2025 : जिल्हा परिषदांऐवजी महापालिका निवडणूक आधी होणार?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
'मला वाटतं तू नक्की सिंगल आणि व्हर्जिन नाहीस' अनेक विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, विद्यापीठातील तीन प्राध्यापक निलंबित, व्हॉट्सअॅप चॅट व्हायरल
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
तिरुपती दर्शनाहून परतताना बारामतीमधील दाम्पत्याचा भीषण अपघात; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
अमरसिंह पंडितांच्या हत्येचा कट होता; आमदाराच्या स्वीय सहायकाचा ICU मधून खळबळजनक दावा
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
महापुरात जमीन खरडून गेली, शेतकऱ्यांचा आक्रोश संपेना; राज्य सरकारनं केंद्राला प्रस्तावच पाठवला नाही; केंद्रीय कृषीमंत्र्यांनीच दिली माहिती
Devendra Fadnavis: तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
तपोवनातील वृक्षतोडीबाबत देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक वक्तव्य, म्हणाले, '10 वर्षांपूर्वीच्या गुगल इमेजमध्ये झाडं नव्हती'
IND vs SA 2nd ODI LIVE Score : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
IND vs SA LIVE : रोहित शर्मानंतर जैस्वालने सोडली संघाची साथ, कोहलीसोबत ऋतुराज मैदानात, 10 षटकांनंतर टीम इंडियाच्या धावा किती?
China Condom Tax: चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
चीनमध्ये कंडोमवर लावलेल्या महाकाय टॅक्सने घेणाऱ्यांना घामटा फुटायची वेळ आली! असा निर्णय का घेतला?
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
सोनिया गांधी थेट भाजपच्या उमेदवार! उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं, तगडा मुकाबला रंगला
Embed widget