एक्स्प्लोर

Kolhapur News : ठाकरेंकडून उचलबांगडी झाल्याने मुरलीधर जाधव शिंदे गटात; धैर्यशील माने, यड्रावकरांवर काय म्हणाले?

मुरलीधर जाधव यांनी मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी कुठलाही संपर्क झालेला नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हणाले. त्यांनी पुन्हा एकदा सुचित मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर तोफ डागली.

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव (Murlidhar Jadahav)यांनी तडकाफडकी जिल्हाध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता शिंदे गटाचा मार्ग पकडला आहे. शिंदे गटाचे दोनदिवसीय महाधिवेशन कोल्हापूरमध्ये होत आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार, खासदार कोल्हापूरमध्ये आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर मुरलीधर जाधव यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. 

मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी संपर्क नाही

उद्या (17 फेब्रुवारी) ते समर्थक शिवसैनिकांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुरलीधर जाधव यांनी यावेळी बोलताना मातोश्रीवरून दीड महिना झाला, तरी कुठलाही संपर्क झालेला नाही त्यामुळे हा निर्णय घेतल्याचे म्हणाले. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सुचित मिणचेकर आणि सुषमा अंधारे यांच्यावर तोफ डागली. त्यांनीच कान भरल्याचा आरोप त्यांनी सातत्याने केला आहे. समर्थक शिवसैनिकांना सोबत घेऊन येऊन कोल्हापुरातून मिरजकर तिकटीपासून अधिवेशन ठिकाणी पदयात्रेनं जाणार असल्याचे म्हटले आहे. 

 धैर्यशील माने, यड्रावकरांवर काय म्हणाले?

शिवसेना फुटल्यानंतर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील बंडखोरांच्या दारात जाऊन मोर्चा काढला होता. यामध्ये त्यांनी सर्वाधिक आक्रमक भूमिका हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील खासदार धैर्यशील माने आणि शिरोळचे आमदार माजी मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विरोधात घेतली होती. आता त्यांच्यासोबत काम करण्याची वेळ येणार आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना मुरलीधर जाधव यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. 

मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी

ते म्हणाले की, पक्षाची भूमिका होती म्हणून मी विरोध केला. पक्ष श्रेष्ठ आणि पक्षादेश मानणारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं कोणाशी वैर नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षामध्ये कोणतं पद मिळेल म्हणून जात नसून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा जोपासण्यासाठी सर्वसामान्यांविरुद्ध होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठवण्यासाठी पक्ष प्रवेश करणार असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्याप्रमाणे कार्यरत राहू असे ते म्हणाले. 

दुसरीकडे, मुरलीधर जाधव हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्नशील होते. मात्र, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर जाऊन भेट घेतल्यानंतर यांनी मुरलीधर जाधव यांनी कडाडून विरोध केला होता. यानंतर तीन दिवसांमध्ये मुरलीधर जाधव यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. 

मुरलीधर जाधव यांची शिंदे गटाशी वाढलेली जवळीक सुद्धा त्यांच्या उचलबांगडीसाठी कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे कारवाईसाठी निमित्त हवे असतानाच राजू शेट्टी यांच्या भेटीनंतर ते मिळालं आणि कारवाई करण्यात आली असंही बोललं जात आहे. मुरलीधर जाधव यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर दोन जिल्हाध्यक्ष नेमण्यात आले आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
कोल्हापुरात खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात दुचाकीने धडक दिल्याने हकनाक जीव गेला; मृतदेह खड्ड्यांमध्ये ठेवत नातेवाईक अन् नागरिकांचा आक्रोश
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
सातबारा कोरा करणार असं सांगून मुख्यमंत्री शेतकऱ्यांना अजून किती दिवस गंडवणार, कर्जमाफीच्या मुद्यावरुन राजू शेट्टींचा हल्लाबोल
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
शक्तीपीठ महामार्गाविरोधात राजू शेट्टींचा एल्गार, 13 जिल्ह्यातील शेतकरी पंढरपुरात एकत्र येणार, आषाढीपूर्वी भव्य पायी सदबुध्दी यात्रा
Kolhapur Crime: 'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं
'आज माझा तरी शेवट नाहीतर...पुढच्याचा'; कोल्हापूरमध्ये नवऱ्याने मोबाईलवर स्टेटस ठेवून बायकोला संपवलं

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget