एक्स्प्लोर

Dr. Babasaheb Ambedkar : डाॅ. बाबासाहेब आंबेडकर शिकत असतानाच ते सर्व हिंदुस्थानाचे 'पुढारी' होतील हे सांगणारे करवीरचे छत्रपती शाहू महाराज होते!

Dr Babasaheb Ambedkar : शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीची अन् प्रतिभेची पारख किती काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी होती याची प्रचिती अस्पृश्य समाजाच्या परिषदेच्या भाषणातून येते.

Dr Babasaheb Ambedkar : वर्णव्यवस्थेत हजारो वर्ष रंजल्या गांजल्या आणि गावकुसाबाहेर जीवन घालवलेल्या जीवांसाठी आयुष्य वेचलेल्या महामानवाची 14 एप्रिलला 132 वी जयंती साजरी होत आहे. तो महामानव होता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. या युगपुरुषाच्या महतीवर आज देश वाटचाल करतो आहे. प्रगल्भ लोकशाहीची बिरुदावली मिरवतो आहे. जगभरातील कायद्यांचा अभ्यास करून देशाला सर्वसमावेशक घटना देणाऱ्या या धुरंदर व्यक्तीमत्वाची चुणूक सर्वप्रथम करवीर संस्थानचे छत्रपती शिवछत्रपतींचे वंशज लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज (Rajarshi Shahu Maharaj) यांना आली होती. 

एक अस्पृश्य जातीमधील उमदा तरूण परदेशातून शिकून आल्यानंतर त्याला भेटण्यासाठी स्वत: शाहू महाराज मुंबईमध्ये  गेले होते. अस्पृश्य निर्मृलनासाठी लढा देणाऱ्या या दोन युगपुरुषांमधील संबंध अत्यंत स्नेहाचे आदराचे होते. बाबासाहेबांना  शिक्षणासाठी शाहू महाराजांनी मदत केली होती. कोल्हापुरात बाबासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत माणगाव परिषद झाली. राज्यात पुरोगामी फुले शाहू आंबेडकरांचा वारसा अभिमानाने सांगितला जातो. यामधील शाहू आणि आंबेडकर या द्वयींमधील मैत्री आणि स्नेह समतेच्या इतिहासात अजरामर झाला आहे. इतिहासकार डाॅ. जयसिंगराव पवार यांनी आपल्या "राजर्षी शाहू छत्रपती महाराज" या पुस्तकामध्ये  दोघा युगरुपरुषांच्या नात्यावर प्रकाश टाकला आहे. 

आंबेडकर आणि शाहू महाराजांची भेट कशी झाली?

शाहू महाराजांनी करवीर संस्थानात पददलितांच्या सर्वसमावेशकतेसाठी लढा सुरु केला होता. हा सामाजिक लढा सुरु असतानाच परदेशातून उच्च पदव्या घेऊन एक अस्पृश्य समाजातील तरुण हिंदुस्थानात परतल्याची माहिती शाहू महाराजांना मिळाली. आणि तो तरुण होता डाॅ. बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांना भेटण्यासाठी महाराजांनी निश्चय केला. महाराजांसोबत असलेल्या आर्टिस्ट दत्तोबा दळवी यांनी बाबासाहेबांचा मुंबईमधील पत्ता शोधून काढला. दत्तोबांना घेऊन महाराज मुंबईमधील परळ चाळीमध्ये पोहोचले. करवीरचे छत्रपती शाहू महाराज स्वत: भेटण्यासाठी आल्याचे समजताच बाबासाहेबांना अत्यानंद झाला. यावेळी महाराजांनी बाबासाहेबांच्या प्रतिभेचे कौतुक केले. चहापान झाल्यानंतर बाबासाहेबांना शाहू महाराजांनी करवीर भेटीचे निमंत्रण दिले. या भेटीपासून दोन युगपुरुषांचा स्नेह वाढत गेला तो शेवटपर्यंत राहिला. 

'मूकनायक'साठी मदत ते माणगाव परिषद 

शाहू महाराज आणि बाबासाहेबांची भेट झाल्यानंतर त्यानंतर वर्षभरात बाबासाहेबांनी अस्पृश्योद्धारासाठी 'मूकनायक' वृत्तपत्र सुरु केले. या वृत्तपत्रासाठी शाहू महाराजांनी मदत केली. यानंतर महाराजांच्या प्रेरणेतून (1920 Mangaon Parishad) कोल्हापुरात मार्च 1920 मध्ये कोल्हापूर संस्थानातील माणगावमध्ये अस्पृश्य समाजाच्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. बाबासाहेब या परिषदेचे अध्यक्ष होते. शाहू महाराजांनी या परिषदेला उपस्थिती लावली होती. 

ते (बाबासाहेब आंबेडकर) सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील 

शाहू महाराज यांच्या दूरदृष्टीची अन् प्रतिभेची पारख किती काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी होती याची प्रचिती अस्पृश्य समाजाच्या परिषदेच्या भाषणातून येते. शाहू महाराज बाबासाहेबांच्या प्रतिभेचा गौरव करताना म्हणतात, लोकहो तुम्ही तुमचा पुढारी शोधून काढला. यासाठी मी तुमचे मनापासून अभिनंदन करतो. इतकंच नव्हे, तर एक वेळ अशी येईल की, ते सर्व हिंदुस्थानचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगत आहे. शाहू महाराज 6 मे 1922 रोजी निर्वतले, पण त्यांनी बाबासाहेबांची निरखलेली प्रतिभा काय होती हे सांगून जाते. 

बाबासाहेब आंबेडकर परिषदेत काय म्हणाले?

माणगाव परिषदेत अध्यक्षपदावरून बोलताना बाबासाहेब म्हणाले की, आपल्या राज्यात (कोल्हापूर संस्थानात) अस्पृश्यांना समानतेचा हक्क देऊन त्यांचा उद्धार केल्याबद्दल मी आभार मानतो. महाराजांचा वाढदिवस  प्रत्येक बहिष्कृत व्यक्तीने एखाद्या सणाप्रमाणे साजरा करावा, असा ठरावही बाबासाहेबांनी या सभेत मंजूर करून घेतला. या परिषदेनंतर शाहूराजांनी बाबासाहेबांना सोनतळी कॅम्पवर नेऊन जरीपटका आहेर म्हणून दिला होता. यावेळी त्यांना गहिवरून आले होते. 

बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेल्यानंतरही महाराजांनी त्यांना मदत केली. दोघांमध्ये पत्रव्यवहार सुरु होता. एका पत्रात ते म्हणतात, हिंदुस्थानात प्रगती करत असलेल्या सामाजिक लोकशाहीच्या महान चळवळीचे आपण आधारस्तंभ आहात. महाराजांनी मुंबईत 6 मे 1922 रोजी देह ठेवल्यानंतर त्यांचे पुत्र राजाराम महाराजांना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या. त्यावेळी ते इंग्लंडमध्ये होते. ते आपल्या शोकसंदेशात म्हणतात, हा प्रसंग माझ्यासाठी दोन घटनांमुळे दु:खदायक आहे. मी एका वैयक्तिक मित्राला गमावलं आहे आणि अस्पृश्य समाज आपल्या एका महान हितचिंतकाला व सर्वात महान कैवाऱ्याला मुकला आहे. 1927 साली सुद्धा बाबासाहेबांनी अखिल अस्पृश्य समाजाकडून कृतज्ञता व्यक्त केली होती. 

  • संदर्भ - राजर्षी शाहू छत्रपती महाराज  लेखक -  डाॅ. जयसिंगराव पवार 

इतर महत्वाच्या बातम्या 

जून 2022 पासून एबीपी माझा डिजिटल टीममध्ये असून गेल्या चार वर्षांपासून डिजिटल मीडियामध्ये कार्यरत. यापूर्वी दैनिक पुढारी, सकाळ, ईटीव्ही मराठी अशा संस्थामध्ये कामाचा अनुभव. समाजकारण, राजकारण तसेच मध्य पूर्वेतील विविध विषयांवर गेल्या आठ वर्षांपासून सातत्याने लिखाण.  
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Embed widget