एक्स्प्लोर

Bhagwat Karad in Kolhapur : कोणताही नेता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विचारानुसार बदलतो, नारायण राणे हे उत्तम उदाहरण

शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही तर उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले. शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असेल, असे मंत्री भागवत कराड यांनी म्हटले आहे.

Bhagwat Karad in Kolhapur : मोदी हे सर्वांचे पंतप्रधान आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकेरी शब्द वापरायला नको होते. संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे, महिलाही ते दिसताच टीव्ही बंद करा म्हणतात, अशी टीका शब्दात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे. शिंदे गट आणि भाजप एकजीव युती असून शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही, असा दावाही त्यांनी यावेळी बोलताना केला. कोणत्याही नेता आमच्याकडे आल्यानंतर आम्ही विचारानुसार बदलतो, नारायण राणे हे उत्तम उदाहरण असल्याचेही भागवत कराड म्हणाले. 

शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही

विविध कार्यक्रमांसाठी मंत्री कराड कोल्हापुरात (Kolhapur News) आले होते. त्यांनी मंगळवारी अंबाबाई मंदिरात देवीचे दर्शन घेतले. यावेळी खासदार धनंजय महाडिक, भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे उपस्थित होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, खासदार संजय राऊत यांची रोजची बडबड ऐकून जनता वैतागली आहे. ते दिसताच महिलांही आता टीव्ही बंद करा म्हणतात. शिंदे व भाजप एकजीव युती आहे. शिंदे गट भाजपकडे कोणत्या खुर्चीसाठी आलेला नाही तर उद्धव ठाकरे हे खुर्चीसाठी सेना आणि हिंदुत्व सोडून गेले. शिंदे आणि भाजपची युती येणाऱ्या निवडणुकीतही कायम असेल.

शेजारच्या देशांची आर्थिक परिस्थिती खराब असून प्रचंड महागाई आहे. तुलनेने भारतामध्ये महागाई फारच कमी आहे. पंतप्रधान मोदींनी देश विकसनशील केला असून अर्थव्यवस्था भक्कम असल्याचेही कराड म्हणाले. भागवत कराड यांच्या हस्ते राजे विक्रमसिंह घाटगे को-ऑप. बँक लि.कागल बँकेच्या मुरगूड शाखेचे उद्घघाटन करण्यात आले. कराड म्हणाले की, देशात गुंतवणुकीसाठी जगभरातील उद्योजक उत्सुक आहेत. पंतप्रधान मोदींनी जगाला विश्वास दिला आहे. देशाची आर्थिक प्रगती सुरु असून डिजिटल क्रांती झाली आहे. देश महासत्ता बनण्यासाठी ग्रामीण भागाचा विकास गरजेचा आहे.

भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येईल की नाही हा वरच्या पातळीवरीचा प्रश्न आहे. मात्र, भाजपचे एक प्रिन्सिपल आहे जो येतो त्याचे स्वागत करून आम्ही आमच्या विचारानुसार घडवतो. आम्ही सत्तेसाठी, खुर्चीसाठी विचार बदलत नाही. कोणत्याही पक्षाचा आमच्यात आला तर आम्ही त्यांना आमच्या विचारानुसार बदलतो, केंद्रीय मंत्री नारायण राणे याचे उत्तम उदाहरण आहे, असेही डॉ. कराड यांनी सांगितले.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur Crime: रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
रेकॉर्डवरील गुन्हेगारावर कोल्हापुरात भरदिवसा गोळीबार; आरोपींच्या 12 तासात मुसक्या आवळल्या
Satej Patil on Jayant Patil: जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
जयंतराव 'उजव्या वळणावर' येऊन ठेपल्याची चर्चा शिगेला पोहोचली; सतेज पाटील सूचक वक्तव्य करत काय म्हणाले?
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला गोकुळ कामगार संघटनेचा जाहीर पाठिंबा; 'गेट मीटिंग' घेत केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 
धक्कादायक! भाजप कार्यकर्त्यावर गोळीबार, खाजगी सावकारीतून घटना घडल्याची माहिती, कोल्हापुरात खळबळ 

व्हिडीओ

Baramti Girl Got 5th Rank in state in NEET Exam : बारामतीची श्रावणी यशाला गवसणी | ABP Majha
Navneet Rana VS Uddhav Thackeray : ठाकरेंची रामरक्षा; राणांची हनुमान चालीसा | Special Report
Zero Hour Full : ठाकरेंचं आंदोलन ते वागंचुक यांच्या आंदोलनाचा २० वा दिवस; झिरो अवरमध्ये सखोल चर्चा
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ashadhi Wari : वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
वारीत निधन झाल्यास एक लाखांचं अर्थसहाय्य; श्री संत तुकाराम महाराज संस्थानचा मोठा निर्णय!
RBI : रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
रिझर्व्ह बँकेची मोठी कारवाई, महाराष्ट्रातील सहकारी बँकेंवर निर्बंध लादले, आरबीआयनं कारवाई का केली?
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
Rahul Gandhi: 10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
10 वर्षात 152 पेपर फुटले, एका व्यक्तीला शिक्षा नाही, साडे सात कोटी विद्यार्थ्यांचं नुकसान, राहुल गांधींचा हल्लाबोल 
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
बारामतीची श्रावणी राज्यात पहिली, NEET परीक्षेत घवघवीत यश; सुनेत्रा पवारांचा फोन, अजित दादांची आठवण
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
गांजा विक्रीतील सराईत गुन्हेगारीने विष प्यायले; उपचारादरम्यान मृत्यू, व्हिडिओतून पोलिसांवर गंभीर आरोप
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
RBI चा कारवाईचा धडाका सुरुच, मुथूट फायनान्ससह 6 कंपन्यांना दणका, आर्थिक दंड ठोठावला
MSRTC Fare Hike : एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली? जाणून घ्या
एसटी प्रवास महागला, एसटीच्या तिकीट दरात 13.56 टक्क्यांची वाढ, महामंडळानं भाडेवाढीसाठी कोणती कारणं दिली?
Embed widget