एक्स्प्लोर

Jayant Patil : ...तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची शक्यता, जयंत पाटलांचं सूचक वक्तव्य

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Politicis) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.

Jayant Patil : राज्यातील सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Politicis) राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात जर सत्ता संघर्षाबाबतचा निकाल सरकार विरोधात गेला तर शिंदे सरकार कोणत्याही क्षणी कोसळू शकते. त्यामुळं मध्यावधी निवडणुका लागण्याऐवजी राष्ट्रपती राजवट (President rule) लागण्याची शक्यता असल्याचे पाटील म्हणाले. जयंत पाटील हे जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचोरा येथील कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत बोलत होते.

Jayant Patil on State Govt : सरकार हे निवडणुका घेण्यास घाबरतंय

राज्यातील सध्याचे सरकार हे निवडणुका घेण्यास घाबरत आहे. त्यामुळं निवडणुका जास्तीत जास्त पुढे कशा ढकलता येतील असा या सरकारचा प्रयत्न असल्याचे जयंत पाटील म्हणाले. राज्यात शेतकऱ्यांची आंदोलने झाली. त्यामध्ये काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावरील गुन्हे सरकारनं मागे घेतले पाहिजेत, असे जयंत पाटील म्हणाले. 

Jayant Patil : आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणार

ज्या ठिकाणी विधानसभा निवडणुका लढवतो, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांशी सध्या संवाद सुरु आहे. पक्षांतर्गत काही जबाबदाऱ्या आणि कामं देण्यात आली होती. ती पूर्ण झाली आहेत का? ती बघण्याचं काम देखील या दौऱ्यानिमित्त करण्यात येणार आहे. तसेच सभासद नोंदणी, पक्षांतर्गत निवडणुका संदर्भात चर्चा झाली. तसेच बुथ बांधणी संदर्भात चर्चा झाल्याचे पाटील म्हणाले. आगामी काळात संपूर्ण महाराष्ट्रभर मी फिरणार असून, कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचे पाटील म्हणाले. महाविकास आघाडी म्हणून सगळ्या निवडणुका आम्ही लढमार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यामुळं याबाबत कोणी शंका उपस्थित करण्याची गरज नसल्याचे पाटील म्हणाले. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले 

अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही शेतकऱ्यांचे प्रश्न लावून धरले होते. अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी अशी मागणी आम्ही केल्याचे जयंत पाटील म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सभागृहातही मांडले आहेत आणि सभागृहाच्या बाहेरही मांडल्याचे पाटील म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी प्रश्नांसह इतर मुद्यावरुन अनेकवेळा सभागृहात गोंधळ झाला. त्यामुळं वेळोवेळी सभागृह तहकूब करण्यात आले होते. तसेच विरोधकांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर शेतमाल आणत आंदोलनही केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या:

Jayant Patil : अधिवेशन संपलं तरी शेतकऱ्यांना मदत नाही, हे सरकार असंवेदनशील : जयंत पाटील   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी

व्हिडीओ

Special Report Asaduddin Owaisi 29 पैकी 13 महापालिकांत MIM ची बाजी,ओवैसींचे फासे, एमआयएमचे सव्वाशे
Ganesh Naik Navi Mumbai : नवी मुंबईत भाजपच्या विजयानंतर गणेश नाईक यांची प्रतिक्रिया
Special Report Vasai Virar Malegaon स्थानिक पक्ष सत्तेत; भाजपची चांगली कामगिरी, पण सत्तेपासून दूरच
Santosh Dhuri on Thackeray BMC Election : मनसेची चेष्टा,एकत्र येऊनही 6 जागा जिंकल्या; आता ठाकरे....
Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market : रविवारी शेअर बाजार सुरु राहणार, एनएसई आणि बीएसईवर ट्रेडिंग होणार, केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी शेअर बाजार सुरु राहणार
भारतीय शेअर बाजार रविवारी सुरु राहणार,केंद्रीय अर्थसंकल्पादिवशी विशेष ट्रेडिंग सत्राचं आयोजन
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
रुपाली ठोंबरेंचे फेसबुकवर 3 लाख 72 हजार फॉलोअर्स; पुण्यात महापालिकेला 2 ठिकाणी पराभव
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
भाजपकडून मताला 15 हजार वाटले, तरीही उमेदवार पडले; परभणी जिंकणाऱ्या बंडू जाधवांनी सगंळच काढलं
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
एकनाथ शिंदेंच्या प्रभागात, नंदनवन बंगल्याच्या भागात ठाकरेंचा पठ्ठ्या जिंकला; आई वडिलांच्या डोळ्यात पाणी
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
वसंत मोरेंचे फेसबुकवर 6 लाख फॉलोअर्स; पुण्यातून पराभव, निवडणुकीत किती मतं?
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
मुंबईचा महापौर आमचा व्हावा ही आजही इच्छा; निवडणुकीतील पराभवानंतर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
Kolhapur : बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
बाळंतपणानंतर डिस्चार्ज घेऊन जाणाऱ्या आईचा अपघाती मृत्यू, संतप्त जमावाने कार पेटवली
Thackeray brothers BMC Election Results 2026: राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
राज-उद्धव ठाकरेंचा बाळासाहेबांसोबतचा फोटो, डोळ्यांच्या कडा पाणावणारे शब्द, ठाकरे बंधूंच्या पराभवानंतर अंबादास दानवेंची पोस्ट व्हायरल
Embed widget