एक्स्प्लोर

Ajit Pawar: उदल-विजयने चहावाल्याच 'आग-आग' ऐकलं प्रवाशानी रेल्वेतून मारल्या उड्या; शरीराची दुर्दशा अन्..., घटनाक्रम सांगताना अजितदादांना शब्दच सुचेना

Ajit Pawar: लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी थेट रेल्वेतून खाली उड्या घेतल्या.

जळगाव: जळगाव जिल्ह्यात बुधवारी (22 जानेवारी) दुपारी एक भयंकर रेल्वे अपघात (Jalgaon Train Accident) घडला. या अपघातात (Jalgaon Train Accident) 13 लोकांचा मृत्यू झाला असून, 10 लोक गंभीरपणे जखमी झाले आहेत. लखनऊ येथून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरली आणि प्रवाशांनी थेट रेल्वेतून खाली उड्या घेतल्या. त्यानंतर अचानक गोंधळ उडाल्याने रेल्वेतील (Jalgaon Train Accident) चैन ओढली. त्यानंतर अनेकांनी त्यातून उड्या मारल्या, यावेळी बाजुच्या रेल्वे रुळावरुन भरधाव वेगात जाणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसची धडक बसली आणि प्रवाशांच्या शरीराचे तुकडे झाले, अनेक जण जखमी झाले. ज्यामध्ये 13 जणांना आपला जीव गमवला आहे. हा अपघात (Jalgaon Train Accident) कसा आणि का घडला? नेमकं काय झालं याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे.

उदल-विजयने चहावाल्याच 'आग-आग' ऐकलं 

अजित पवारांनी माहिती देताना म्हटलं, या रेल्वेमध्ये उदल कुमार ( वय 30 वर्षे, उत्तर प्रदेश) हे लखनऊ ते मुंबई पुष्पक एक्सप्रेसने रोजगारासाठी मुंबईकडे यायला निघाले होते. त्याच्यासोबत त्याचा मेहुणा विजयकुमारही होता. यावेळी ते सर्वसाधारण तिकिटाने सर्वसाधारण बोगीच्या वरच्या आसनावर बसले होते. त्यावेळी रेल्वेच्या रसोईतील चहा विक्रेत्याने आग लागली, आग लागली अशी ओरड केली. अशी आरोळी ऐकू येताच, बोगीत अचानक गोंधळ उडाला. आजुबाजुच्या बोगीमध्येही गोंधळ उडाला.

त्यावेळी काही प्रवाशांनी घाबरुन स्वत:चा जीव वाचवण्यासाठी रेल्वेतून दोन्ही बाजुने उड्या घेतल्या. यावेळी रेल्वे गाडी खूप वेगात होती, त्यामुळे एका प्रवाशाने साखळी ओढली आणि रेल्वे थांबवली. त्यानंतर प्रवासी गाडीतून खाली उतरु लागले. ते आपला जीव वाचवण्यासाठी पळत असताना शेजारीच असलेल्या रेल्वे रुळावरुन जात असताना बंगळुरु-नवी दिल्ली कर्नाटक एक्सप्रेस अतिशय वेगाने आली आणि रेल्वे रुळावर असलेल्या प्रवाशांना धडक देऊन काही अंतारावर पुढे जाऊन थांबली. त्यावेळी बऱ्याच प्रवाशांच्या शरीराची इतकी दुर्दशा झाली, की ती मी सांगूही शकत नाही, यामध्ये काही प्रवाशी मृत्यूमुखी पडले तर काही जखमी झाले. यामध्ये उदल कुमार आणि विजय कुमार दोघांनाही धडक बसली आणि ते जखमी झाले. यामध्ये 10 मृतदेह सापडले आहेत, तर तीन मृतदेहांच्या शरीराचे भाग विखुरले आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 

कसा झाला अपघात?

- जळगाववरुन मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसचा अचानक ब्रेक लागल्याने आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी डब्यात आगीची चर्चा सुरू झाली.
- यावेळी काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. 
- दुर्दैवानं समोरुन येणाऱ्या बंगळुरु एक्स्प्रेसची प्रवाशांना धडक बसली.
- या घटनेमध्ये अनेकांचा मृत्यू झाला. जखमींवर आता उपचार सुरू आहेत. 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Jalgaon Crime News: झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
झोपलेल्या चिमुरड्यांवर जन्मदात्या बापाकडूनच जीवघेणा हल्ला, मुलीचा जागीच अंत, मुलगा गंभीर जखमी; जळगाव हादरलं!
Jalgaon Rain: पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
पाच तास झाडावर जीव मुठीत धरून बसले; नाग झाडावर चढताच फांद्या तोडून खाली फेकले; जळगावात पुरात अडकलेल्या नागरिकाने सांगितला थरारक अनुभव
Maharashtra Rain: पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, IMDचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
पावसाचा रौद्रावतार! विदर्भ मराठवाड्यासह निम्म्या महाराष्ट्राला अलर्ट जारी, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, हवामान विभागाचा राज्यासाठी महत्वाचा इशारा
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले
शाळेच्या गच्चीवर अडकलेल्या शिक्षकाची थरारक सुटका; पुरामुळे 50 ते 60 घरांना पाण्याचा वेढा, नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवले

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget