एक्स्प्लोर

Kangana's Padma Shri Award: 'कंगनाचा पद्मश्री मागे घ्या, तिला उपचाराची गरज' दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षांचं राष्ट्रपतींना पत्र

कंगनाविरोधात देशद्रोहाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात यावा, अशीही मागणी स्वाती मालीवाल यांनी केलीय.

Kangana's Padma Shri Award: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली. भारताला 1947 मध्ये स्वातंत्र्य भीक म्हणून मिळाले. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं अशा आशायाची तिनं सोशल मीडियावर पोस्ट केली होती. ज्यामुळं देशभरातून तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. तसेच तिचा पद्म पुरस्कार काढून घेण्याची मागणींनी जोर धरलाय. याच दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल (Swati Maliwal) यांनी कंगनाच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केलाय. स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांना पत्र लिहून कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार मागे घ्यावा. कंगनानं शहिदांचा अपमान केलाय. तिच्याविरोधात देशद्रोहाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात यावा, अशीही मागणी स्वाती मालीवाल यांनी केलीय. 

स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपतींना लिहिलेल्या पत्राची प्रत ट्विटरवर शेअर केलीय. ज्यात त्यांनी असं लिहलंय की, अभिनेत्री महात्मा गांधी, भगतसिंह यांच्या हौतात्म्याचा विनोद वाटतो. त्यांच्या बलिदानानं मिळालेलं स्वातंत्र्य आणि कोट्यवधी लोकांची तपश्चर्यां भीक वाटते. तिला पुरस्कार नव्हेतर, उपचाराची गरज आहे. तिचा पद्मश्री पुरस्कार ताबडतोब मागे घ्यावा आणि तिच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असं पत्र स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपतींना लिहलेल्या पत्रात नमूद केलंय. 

नेमका वाद काय?

अभिनेत्री कंगना रणौतने बुधवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सांगितले की, 'भारताला 1947 मध्ये मिळालेलं स्वातंत्र्य भीक म्हणून मिळालं. भारताला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांचे सरकार स्थापन झाल्यावर मिळालंय. कंगना राणौतच्या या वक्तव्यावरुन चांगलाच गदारोळ झाला आहे. संपूर्ण देशभरातून तिच्या या वक्तव्याचा निषेध केला जातोय. याचदरम्यान, तिच्या घरासमोर अनेक लोकांनी निदर्शनही केली. यानंतरही कंगना थांबली नाही. तिनं इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये एक पोस्ट केली. ज्यात तिनं असं म्हटलंय की, "1857 हा स्वातंत्र्यासाठीचा पहिला सामूहिक लढा होता आणि सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांच्यासारख्या महान व्यक्तींनी बलिदान दिले. मला 1857  माहिती आहे, पण 1947 मध्ये कोणते युद्ध झाले? मला माहिती नाही. हे जर कोणी मला सांगू शकले तर मी माझे पद्मश्री परत करेन आणि माफीही मागेन", असं तिनं म्हटलं होतं. 

कंगनाच्या याच वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर आता स्वाती मालीवाल यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहलंय. तसेच कंगनाला दिलेला पद्मश्री पुरस्कार मागे घेण्यात यावा, अशीही मागणी त्यांनी राष्ट्रपतींकडे केलीय. 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi: 1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
1000 युवकांमध्ये फक्त 12 जणांना कायमस्वरुपी नोकरी, भारतात रोजगाराचे सर्व मार्ग बंद, राहुल गांधी यांचा हल्लाबोल 
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
नवीन CEO येताच एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट, 17 टक्के पगारवाढ करण्याचा निर्णय, पगारासोबत मिळणार इतरही लाभ
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
गॅस आयात धोरणात मोठा बदल, 67 टक्के LPG  गॅस एकाच देशातून आयात होणार, सरकारनं घेतला मोठा निर्णय
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget