एक्स्प्लोर

सलग पाचव्यांदा ओदिशाचे मुख्यमंत्री बनलेले नवीन पटनायक कोण आहेत?

नवीन पटनायक भारतातील सर्वात शांत राजकारणी म्हणून ओळखले जातात. 2000 सालपासून ते ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदावर विराजमान आहेत.

बिजू जनता दलाचे प्रमुख नवीन पटनायक यांनी आज ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात नवीन पटनायक सलग पाचव्यांदा मुख्यमंत्रीपदावर विराजमान झाले आहेत. ओदिशामध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाला 147 पैकी 112 जागा मिळाल्या आहेत. या विजयाचं सर्व श्रेय नवीन पटनायक यांना दिलं जात आहे. देशभरात मोदी लाट असतानाही ओदिशामधील जनतेनं मात्र पटनायक यांच्या बाजून कौल दिला आहे. नवीन पटनायक यांचे वडील बिजू पटनायक हे देखील ओदिशाचे मुख्यमंत्री होते. बिजू पटनायक स्वातंत्र्यसैनिक तर होतेच शिवाय त्यांनी पायलट म्हणुनही मोठी कामगिरी केली होती. दुसऱ्या महायुद्धात तसेच 1947 मध्ये पाकिस्तानने काश्मिरवर हल्ला केला त्यावेळी बिजू पटनायक यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. परंतू वडील जिवंत असेपर्यंत नवीन पटनायक राजकारणापासून दुर होते. 1988 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'द डिसीवर्स' या सिनेमात त्यांनी छोटीशी भूमिका देखील साकारली होती. बिजू पटनायक यांच्या निधनानंतर 1997 मध्ये नवीन सक्रिय राजकारणात आले. आपल्या वडिलांच्या नावावरुन त्यांनी बिजू जनता दलाची स्थापना केली. सुरुवातीला नवीन पटनायक ओदिशातील अस्का मतदारसंघातून लोकसभेवर निवडुन गेले. स्व. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांना केंद्रात मत्रीपदही देण्यात आलं होते. 2000 साली ओदिशामधील विधानसभा निवडणुकीत बिजू जनता दलाने भाजपसोबत युती करत बहुमत मिळविले. तेव्हा नवीन पटनायक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देत ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तेव्हापासून गेली 19 वर्षे नवीन पटनायक ओदिशाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत. 2009 साली भाजपची सोथ सोडल्यानंतर पटनायक यांनी तिसऱ्या आघाडीशी हात मिळवणी केली. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर निवडणूक लढवलेल्या त्यांच्या पक्षाला 103 जागा मिळाल्या होत्या. नवीन पटनायक यांनी त्यांच्या आयुष्यातील सुरुवातीचा बराच काळ ओदिशाच्या बाहेर काढल्याने तेथील ओडिया भाषेवर त्यांचं प्रभुत्त्व नाही. ते राज्यातील प्रमुख भाषा बोलता न येणार एकमेव मुख्यमंत्री आहेत. सुरुवातीच्या काळात प्रचारसभेतील त्यांची भाषणं 'रोमन' मध्ये लिहीली जात असत. पटनायक ती भाषणं वाचुन दाखवत. या गोष्टीमुळे त्यांच्यावर बरीच टिकीही झाली. नवीन पटनायक यांनी राज्यातील जनतेला लोकांना खुश ठेवण्यासाठी अनेक योजना चालवल्या आहेत. 'एक रुपयात तांदुळ, मोफत सायकल, पाच रुपयात जेवण अशा अनेक योजनांमुळे त्यांच्या पक्षाची लोकप्रियता वाढली. गरिबी निर्मुलनासाठीही पटनायक यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. त्यामुळेच ओदिशामध्ये सलग पाचव्यांदा बिजू जनता दलाचे सरकार स्थापन झाले आहे. भारतातील सर्वात शांत राजकारणी म्हणुन देखील नवीन पटनायक ओळखले जातात. अतिशय मितभाषी असलेले पटनायक सिक्किमचे मुख्यमंत्री पवन सिंह चामलिंग यांचा सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा रेकॉर्ड तोडण्याच्या वाटेवर आहेत. पवन सिंह चामलिंग सलग 24 वर्षे सिक्किमचे मुख्यमंत्री होते.

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
पेपरफुटी रोखण्यासाठी कायदा आणणार, फास्ट ट्रॅक कोर्ट आणि कठोर शिक्षेची तरतूद : नरेंद्र मोदी
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?
जनता मालक तर  शिक्षणमंत्री हे सेवक, जनतेने राजीनामा मागितला तर तो दिला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर काय म्हणाले अण्णा हजारे?

व्हिडीओ

Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget