एक्स्प्लोर

चारा घोटाळा नेमका काय आहे?

चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत.

पाटणा : चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे. 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. चारा घोटाळ्याचे एकूण सहा खटले आहेत. यातील एका खटल्यात 2013 साली लालूप्रसाद यादव यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे ते काही काळ निवडणुकीच्या राजकारणातून दूर झाले. त्या खटल्यात पाच वर्षांची शिक्षा झाली असली, तरी ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. 1990 मध्ये चारा घोटाळ्याला सुरुवात चारा घोटाळ्याला 1990 साली सुरुवात झाली होती. त्यावेळी लालूप्रसाद यादव बिहारचे मुख्यमंत्री होते. बिहारचे पशूपालन विभागाची बनावट बिलं देऊन चाऱ्याच्या नावाने सरकारी तिजोरीतून रक्कम काढली गेली. यात अधिकारी, कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांचाही हात होता. या घोटाळ्यात लालूप्रसाद यादव यांच्यावर एकूण सहा खटले सुरु आहेत. चाईंबासा खटल्यात लालूप्रसाद यादव यांना 2013 साली पाच वर्षांची शिक्षा झाली होती. मात्र जामिनावर ते बाहेर आहेत. आरोपी कोण आहेत? चारा घोटाळ्यात एकूण 38 आरोपी होते. बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्यासह माजी मुख्यमंत्री जन्नाथ मिश्रा, बिहारचे माजी मंत्री विद्यासगर निषाद, पीएसीचे तत्कालनी अध्यक्ष जगदीश शर्मा आणि ध्रुव भगत, आर. के. राणा, तीन आयएएस अधिकारी, फूलचंद सिंह, बेक ज्युलिएस उर्फ महेश प्रसाद, एस के भट्टाचार्य, पशू चिकित्सक डॉ. के. के. प्रसाद आणि इतर चार आरोपींचा समावेश होता. यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. तिघेजण सीबीआयचे साक्षीदार बनले आणि आपला गुन्हा मान्य केला होता. त्यानंतर त्या तिघांनाही 2006-07 मध्ये शिक्षा सुनावली गेली. त्यामुळे आता एकूण 22 आरोपींविरोधात रांची कोर्टात निर्णय दिला जाणार आहे. चारा घोटाळ्याचा घटनाक्रम चारा घोटाळा म्हणजे प्राण्यांचा चारा, औषधं आणि पशूपालन उपकरणांचा घोटाळा आहे.
  • 900 कोटींचा चारा घोटाळा 1996 साली उघडकीस आला. या घोटाळ्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्रा मुख्य आरोपी बनवलं गेलं.
  • 10 मे 1997 रोजी सीबीआयने तत्कालीन राज्यपालांकडे मागणी केली की, लालूप्रसाद यादव यांच्यावर कारवाई व्हावी.
  • 23 जून 1997 रोजी लालूप्रसाद यादव आणि इतर 55 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
  • 29 जुलै 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांना अटक करण्यात आली होती.
  • 12 डिसेंबर 1997 रोजी लालूप्रसाद यादव यांची सुटका झाली.
  • 28 ऑक्टोबर 1998 रोजी पुन्हा अटक करण्यात आली.
  • मार्च 2012 रोजी सीबीआयने पाटणा कोर्टात लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रा यांच्यासह 32 जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले.
  • 2013 मध्ये चारा घोटाळ्याशी संबंधित चाईंबासा प्रकरणात त्यांना 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत.
चारा घोटाळा समोर आणणारे सध्या झारखंडमध्ये मंत्री चारा घोटाळा ज्यांनी पुराव्यानिशी समोर आणला, ते याचिकाकर्ते सरयू राय हे सध्या झारखंडमध्ये मंत्री आहेत. सरयू राय यांना कधीकाळी वाटलंही नव्हतं की, चारा घोटाळा इतकं मोठं रुप घेईल आणि त्यात लालूप्रसाद यादवांना तुरुंगवासाची शिक्षा होईल. सरयू राय हे सध्या झारखंडमधील भाजप सरकारमध्ये संसदीय कामकाज मंत्री आणि अन्न पुरवठा मंत्री आहेत. 2014 साली ते पश्चिम जमशेदपूरमधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले आहेत. चारा घोटाळा बाहेर काढल्याने ते प्रकाशझोतात आले होते. सर्व खटले एकत्रित चालवण्यास कोर्टाचा नकार चारा घोटाळ्याशी संबंधित सर्व खटल्यांची एकत्रित सुनावणी व्हावी, अशी याचिका लालूप्रसाद यादव यांनी सुप्रीम कोर्टात केली होती. मात्र कोर्टाने याचिका फेटाळली आणि प्रत्येक खटला स्वतंत्रपणे चालवण्याचे आदेश दिले. आज कोणत्या प्रकरणात निर्णय येणार? देवघर तिजोरीतून अवैधरित्या 90 लाख रुपये काढल्याच्या प्रकरणात आज निर्णय सुनावला जाणार आहे. लालूप्रसाद यादव आणि जगन्नाथ मिश्र यांच्यासह एकूण 22 आरोपी या प्रकरणात आहेत. रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे, त्यामुळे आज अंतिम निकालाची अपेक्षा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Crime News: मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
मध्यरात्री पतीशी भांडण, सकाळी अंथरुणावर आढळला पत्नीचा मृतदेह; सोशल मीडियावरील मैत्री, प्रेम अन् लग्नाचा रक्तरंजीत शेवट
PM Modi on Gold: परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र
परदेशात फिरायला जाऊ नका, विदेशात लग्नसोहळे टाळा, गरज पडलं तरच सोनं विकत घ्या; पंतप्रधान मोदींचा नवा कानमंत्र

व्हिडीओ

GDP Rate India : जीडीपाचा बोलबाला, पंतप्रधानांचा बचतीचा सल्ला Special Report
Nepal Flood : नेपाळमध्ये मृतांचा आकडा आता हजाराच्या घरात, एबीपी माझाचा हा ग्राऊंड रिपोर्ट
Mumbai Inflation : दूध, गॅस आणि महागाईचा 'प्रवास' | Special Report ABP Majha
Manoj Jarange Vs Laxman Hake : जरांगेंशी चर्चा, हाकेंचा मुंबईकडे मोर्चा | Special Report ABP Majha
Sanjay Raut Mumbai PC : देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी आमदार डुलक्या मारत होते, संजय राऊतांचा टोला

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Waqf Board Decision : वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
वक्फ मंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय! अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळणार, शासनाकडून लवकरच जीआर
Shehbaz Sharif : पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
पाकिस्तानचे बालिश चाळे! आधी क्रॉप करून मोदींना फोटोबाहेर काढलं, ट्रोल झाल्यावर शहबाज शरीफ यांचा यू टर्न
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
धक्कादायक घटना... कुटुंबियांची पोलिसांत बेपत्ता म्हणून तक्रार; लिफ्टच्या डक्टमध्ये आढळला महिलेचा मृतदेह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
MPSC चा भोंगळ कारभार सुरूच, मुख्य परीक्षेच्या गुणांमध्ये मोठी तफावत; 250 पैकी 2, 6 अन् 11 गुण, पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
नागरिकांच्या आरोग्याशी खेळ; पॅकेटवरील एक्स्पायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री, 11 कंपन्यांविरुद्ध कारवाई
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
मंत्री जयकुमार गोरेंचा ताफा अडवला, मराठा बांधवांची थेट गाडीखाली उडी; पालकमंत्र्यांची SP अंजना कृष्णांशी चर्चा
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
शिवाजी महाराजांसोबत तुलना मोदींनाही आवडणार नाही, पण..; अमित ठाकरेंनी फोटो हटवला, एकनाथ शिंदे स्पष्टच बोलले
Mumbai BMC News : मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
मुंबईत BMC अभियंत्यांच्या बदल्यांसाठी रेट कार्ड, भाजप आमदाराचा गंभीर आरोप, नेमकं काय आहे प्रकरण?
Embed widget