एक्स्प्लोर
अयोध्येत 7 भाविकांना ट्रकने चिरडलं

लखनऊ : उत्तर प्रदेशातील अयोध्येत ट्रकखाली चिरडून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे. कानपुरमधून आलेल्या या भाविकांना बेदरकारपणे येणाऱ्या ट्रकने चिरडले असून सात लोक जागीच मृत्यूमुखी पडले आहेत. या दुर्घटनेत 7 लोक गंभीर जखमी झाले आहेत. अयोध्येत सुरू असलेल्या श्रावण उत्सवासाठी हजारो भाविक आले होते. पण प्रशासनाने त्यांच्या राहण्याची कोणतीही व्यवस्था न केल्यामुळे हे सर्व भाविक रस्त्याशेजारच्या डिव्हायडरवर झोपले होते. दरम्यान या दुर्घटनेत जखमी झालेल्यांना उपचारासाठी लखनऊच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अयोध्येत सुरू झालेल्या श्रावण महोत्सवासाठी लाखो लोक येतात. 5 ऑगस्टपासून हा महोत्सव सुरू आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था प्रशासनाने न केल्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. या घटनेनंतर भाविकांनी प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. दरम्यान याप्रकरणी तक्रार दाखल झाली असून ट्रकचालकाचा शोध सुरू आहे.
Before You Go
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा






















