एक्स्प्लोर

7 Years of Modi Government : मोदी सरकारला 7 वर्ष पूर्ण; पण देशाचा कारभार काँग्रेसच्याच कामगिरीवर सुरु - संजय राऊत

अद्यापही त्यांनी देशासाठी खूप काही करणं अपेक्षित आहे. आता तर, देश मागच्या 60 वर्षांच्या पुण्याईवरच चालत आहे

7 Years of Modi Government :  मोदी सरकारला देशात सत्तेवर येऊन 7 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्याचनिमित्तानं आपली प्रतिक्रिया देत माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी महत्त्वाचे मुद्दे मांडले. 

'राहुल गांधी यांचं म्हणणं अतिशय गांभीर्यानं ऐकण्याची गरज होती, मोदी सरकारला 7 वर्ष झाली. पहिली पाच वर्षे आणि दुसरी दोन वर्षे तर कोरोनामध्ये वाहून गेली. पण, अद्यापही त्यांनी देशासाठी खूप काही करणं अपेक्षित आहे. आता तर, देश मागच्या 60 वर्षांच्या पुण्याईवरच चालत आहे', असं म्हणत काँग्रेस सरकारनं केलेल्या कामगिरीच्याच बळावर देशाचा कारभार सुरु आहे, या शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारचे कान टोचले.

काँग्रेसची कामगिरी कोणालाही नाकारता येणार नाही, असंही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना स्पष्ट केलं. सरकारला जनता बहुमत देते याचा अर्थ असा की सरकारला लोकांचा विश्वास मिळाला आहे. पण, आज देशात बेरोजगारी, महागाई आणि देशात ज्या प्रकारे अराजकता माजली आहे ते पाहता परिस्थिती विचार करण्याजोगी आहे, असं ते म्हणाले. 

जनतेच्या माफक अपेक्षांवर लक्ष द्या

देशात सर्वांना अदानी आणि अंबानी व्हायचं नाहीये, पण सर्वांनाच रोजगार हवा आहे, पोटाची खळगी भरायचं साधन हवं आहे, जनतेच्या अगदी माफक अपेक्षा आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे नेतृत्त्वक्षमता आहे. त्यामुळं ते देशाला नक्कीच योग्य मार्गय दाखवतील. जनतेच्या अपेक्षांविषयी मोदी सरकारला आत्मचिंतनाची गरज आहे ही बाब त्यांनी स्पष्ट केली. 

Modi Govt 2.0 : मोदी सरकारच्या सत्तेची सात वर्षे पूर्ण; राज्यात काँग्रेस नेते केंद्राविरोधात रस्त्यावर उतरणार

मोदी सरकारवर कोणताही भ्रष्टाचाराचा आरोप नाही, ही चांगली बाब. पण, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भ्रष्टाचारासंदर्भात अनेक मुद्दे, प्रश्न इपस्थित केले, ते अद्यापही अनुत्तरीत आहेत असं राऊत म्हणाले. 

भाजपची सत्ता नसणाऱ्या राज्यांमध्ये केंद्राचं झुकतं माप पाहायला मिळत नाही, या प्रश्नाचं उत्तर देत पश्चिम बंगाल आणि केंद्र सरकारचा वाद हा आधीपासूनच होता ही बाब त्यांनी अधोरेखित केली. केंद्र हे राज्य शासनाचं मायबाप आहे, राजनैतिक विरोध आणि मतभेद विसरुन केंद्रानं राज्यला सांभाळण्याचं दायित्वं दाखवावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काणा डोळा करुन चालणार नाही, असं म्हणत त्यानी केंद्राचं याकडे लक्ष वेधत गुजरातप्रमाणे इतर राज्यांना न्याय का मिळत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

महत्त्वाच्या बातम्या

Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Arunachal Pradesh Dispute : चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
चीनला भारताचे चोख प्रत्युत्तर, अरुणाचल प्रदेशातील 27 ठिकाणांची अधिकृत नावे भारतीय नकाशात समाविष्ट
Lok Sabha Monsoon Session : संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
संसदेत घडामोडींना वेग! काँग्रेसकडून तीन ओळींचा 'व्हिप' जारी; NDA च्या सर्व खासदारांना दिल्लीत राहण्याचे आदेश
Mecca Deal : पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
पाकिस्तानवरचा हल्ला हा सौदी अन् तुर्कीवरील हल्ला समजला जाईल; मुस्लिम देशांमध्ये करार, भारताची मोठी प्रतिक्रिया
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
जंतरमंतरवर धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी तब्बल तीन आठवडे उपोषण करणाऱ्या AISA अध्यक्षा नेहा बोरांवर शाई फेकली; म्हणाल्या, अश्रुधुरांना घाबरलो नाही, या शाईने काय होणार?
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
'हाथी चले बाजार में, बाकी पुढचं मी काय बोलत नाही..' अमित भाई बोलतील तेव्हा विरोधक पळून जातील, त्यांना देशभक्ती दुसऱ्यांनी शिकवायची गरज नाही, मोदीजींच्या निवासाबाहेर आंदोलन षड्यंत्र : एकनाथ शिंदे
Rahul Gandhi : भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
भाजपमधील आवडता नेता कोण असा प्रश्न? राहुल गांधी यांनी 'अंकल' म्हणत उत्तर दिलं, माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया समोर
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Embed widget