एक्स्प्लोर

SBI मध्ये दुसऱ्याच्या खात्यात पैसे भरताय? आधी ‘हे’ वाचा!

रोख रकमेचा व्यवहार कमी व्हावा, असाही एक उद्देश या नियमामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची भीतीही बँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जातेय.

मुंबई : तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा कुणा ओळखीच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पसे जमा करण्यासाठी जात असाल, तर तुम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण इतरांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) हे बदल केले असले, तरी येत्या काळात इतर बँकाही असे नियम करण्याचा अंदाज बँकिंग क्षेत्रातून वर्तवला जात आहे. एसबीआयने नेमका काय बदल केलाय? अनेकदा आपण आपल्या नातेवाईकाच्या किंवा ओळखीतल्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे भरायला जातो. त्यावेळी आपल्याकडे काही विशिष्ट ओळखपत्र असायला हवे, असे बंधनकारक नसते. अगदीच मोठी रक्कम असेल, तर पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबर इत्यादी माहिती घेऊन पैसे स्वीकारले जातात. एसबीआयने मात्र आता सरसकट सगळ्यांना नवीन नियम लागू केला आहे. इतर व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे भरावयाचे असल्यास, खातेधारकाकडून 'परवानगी पत्र' पैसे भरणाऱ्याकडे असणं एसबीआयने बंधनकारक केले आहे. जर कुठल्याही कारणाने परवानगी पत्र नसेल, तर कॅश डिपॉझिट स्लिपवर खातेधारकाची स्वाक्षरी असायला हवी. पैसे भरताना खातेधारकाची स्वाक्षरी कोर बँकिंग सोल्युशनद्वारे (CBS) मॅच केली जाईल. स्वाक्षरी मॅच झाल्यानंतरच पैसे भरण्यासाठी परवानगी दिली जाईल. परवानगी पत्र किंवा कॅश डिपॉझिट स्लिपवर स्वाक्षरी, अशा दोन्ही गोष्टी नसतील, तर पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे खाते एसबीआयमध्ये असायला हवे. शिवाय, केवायसी पूर्ण केलेला असायला हवा. तसेच पॅन कार्ड नंबरही दिलेला असावा. या गोष्टी असतील, तरच तुम्ही इतरांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे भरु शकता. एसबीआयने बँक खात्यात पैसे जमा करण्यासंबंधी केलेले हे नियम लवकरच इतर बँकांमध्ये लागू केले जाण्याची शक्यता आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या संख्येत लोकांनी खात्यात कॅश जमा केली. आयकर विभागाने ज्यावेळी संबंधित खातेधारकांकडे या रकमेची माहिती मागितली, त्यावेळी अनेकांना माहिती देण्यास विरोध दर्शवला. याच पार्श्वभूमीवर इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासंबंधी नवे नियम लागू केले जात असल्याची माहिती मिळतेय. तसेच, रोख रकमेचा व्यवहार कमी व्हावा, असाही एक उद्देश या नियमामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची भीतीही बँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जातेय.

महत्त्वाच्या बातम्या

Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता
ओमानच्या किनाऱ्याजवळ 'जीएफएस गॅलेक्सी' व्यापारी जहाजावर हल्ला; 11 पैकी 10 भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण अद्याप बेपत्ता

व्हिडीओ

Majha Sanman Award 2026: अरुण फिरोदिया यांचा उद्योगक्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल ‘माझा सन्मान’ पुरस्काराने गौरव
Majha Sanman Award 2026: भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांचा एबीपी माझा कडून सन्मान
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से
Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget