एक्स्प्लोर

SBI मध्ये दुसऱ्याच्या खात्यात पैसे भरताय? आधी ‘हे’ वाचा!

रोख रकमेचा व्यवहार कमी व्हावा, असाही एक उद्देश या नियमामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची भीतीही बँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जातेय.

मुंबई : तुम्ही तुमच्या नातेवाईक किंवा कुणा ओळखीच्या व्यक्तीच्या बँक खात्यात पसे जमा करण्यासाठी जात असाल, तर तुम्हाला अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण इतरांच्या खात्यात पैसे जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल झाले आहेत. सध्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय) हे बदल केले असले, तरी येत्या काळात इतर बँकाही असे नियम करण्याचा अंदाज बँकिंग क्षेत्रातून वर्तवला जात आहे. एसबीआयने नेमका काय बदल केलाय? अनेकदा आपण आपल्या नातेवाईकाच्या किंवा ओळखीतल्या व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे भरायला जातो. त्यावेळी आपल्याकडे काही विशिष्ट ओळखपत्र असायला हवे, असे बंधनकारक नसते. अगदीच मोठी रक्कम असेल, तर पॅन कार्ड किंवा मोबाईल नंबर इत्यादी माहिती घेऊन पैसे स्वीकारले जातात. एसबीआयने मात्र आता सरसकट सगळ्यांना नवीन नियम लागू केला आहे. इतर व्यक्तीच्या बँक खात्यात पैसे भरावयाचे असल्यास, खातेधारकाकडून 'परवानगी पत्र' पैसे भरणाऱ्याकडे असणं एसबीआयने बंधनकारक केले आहे. जर कुठल्याही कारणाने परवानगी पत्र नसेल, तर कॅश डिपॉझिट स्लिपवर खातेधारकाची स्वाक्षरी असायला हवी. पैसे भरताना खातेधारकाची स्वाक्षरी कोर बँकिंग सोल्युशनद्वारे (CBS) मॅच केली जाईल. स्वाक्षरी मॅच झाल्यानंतरच पैसे भरण्यासाठी परवानगी दिली जाईल. परवानगी पत्र किंवा कॅश डिपॉझिट स्लिपवर स्वाक्षरी, अशा दोन्ही गोष्टी नसतील, तर पैसे भरण्यासाठी आलेल्या व्यक्तीचे खाते एसबीआयमध्ये असायला हवे. शिवाय, केवायसी पूर्ण केलेला असायला हवा. तसेच पॅन कार्ड नंबरही दिलेला असावा. या गोष्टी असतील, तरच तुम्ही इतरांच्या बँक अकाऊंटमध्ये पैसे भरु शकता. एसबीआयने बँक खात्यात पैसे जमा करण्यासंबंधी केलेले हे नियम लवकरच इतर बँकांमध्ये लागू केले जाण्याची शक्यता आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या संख्येत लोकांनी खात्यात कॅश जमा केली. आयकर विभागाने ज्यावेळी संबंधित खातेधारकांकडे या रकमेची माहिती मागितली, त्यावेळी अनेकांना माहिती देण्यास विरोध दर्शवला. याच पार्श्वभूमीवर इतरांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यासंबंधी नवे नियम लागू केले जात असल्याची माहिती मिळतेय. तसेच, रोख रकमेचा व्यवहार कमी व्हावा, असाही एक उद्देश या नियमामागे असल्याचे बोलले जात आहे. मात्र, बँकेच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची भीतीही बँकिंग क्षेत्रातून व्यक्त केली जातेय.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
100 वर्षांपर्यंत संरक्षण मिळणारी 'ही' आहे LIC ची खास योजना, कोणाला मिळू शकतो लाभ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
100 वर्षांपर्यंत संरक्षण मिळणारी 'ही' आहे LIC ची खास योजना, कोणाला मिळू शकतो लाभ? जाणून घ्या सविस्तर माहिती 
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Liquor Policy Case: कथित मद्य घोटाळ्याचे आरोप, ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांसह आम आदमी पक्षाचे चार टाॅप लीडर जेलमध्ये अन् तेच आता सर्व निर्दोष सुटले
कथित मद्य घोटाळ्याचे आरोप, ऐन दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अरविंद केजरीवालांसह आम आदमी पक्षाचे चार टाॅप लीडर जेलमध्ये अन् तेच आता सर्व निर्दोष सुटले

व्हिडीओ

Nagpur 12 Exam : नागपूरच्या वैशाली नगरच्या सक्सेस क्लासच्या पेपरफुटी प्रकरणात सहभाग
Sunetra Pawar PC Video : बोलून झाल्यावर उठा, पीसीपूर्वी काय काय घडलं?
Rohit Pawar on Raj Thackeray : राज म्हणाले दादा असो व इतर कुणी मराठी माणसाला न्याय देऊ
Raj Thackeray on Rohit Pawar : दादांचा अपघात कसा झाला हे अजून महराष्ट्राला समजलेलं नाही
Atideb Sarkar Speech : आयडियाज ऑफ इंडियामध्ये एबीपी नेटवर्कचे मुख्य संपादक अतिदेब सरकार यांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 फेब्रुवारी 2026 | शुक्रवार
Arvind Kejriwal: दिल्लीत निवडणूक घ्या, भाजपच्या 10 पेक्षा अधिक जागा आल्यास राजकारण सोडेन, अरविंद केजरीवालांचं मोदींना चॅलेंज
नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी देशाची माफी मागावी, अरविंद केजरीवालांची मागणी, दिल्लीत निवडणूक घेण्याचं चॅलेंज
Satej Patil on Sugar Factory Crisis: बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
बाबासाहेब पाटलांच्या काळात 50 टक्के साखर कारखाने बंद पडले असा इतिहास लिहू देऊ नका; सतेज पाटलांचा खोचक टोला
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
देवाच्या कृपेने फसवणुकीपासून वाचले; अभिनेत्री ऐश्वर्या नारकरने सांगितली आपबिती, फसवणुकीचा नवा फंडा
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
'जिथं गिरीश महाजन तिथं बिबटे कसे घुसतील? कोणाची हिंमत आहे?? त्यांनी खूप वाघ, बिबट फाडून जेरबंद केलेत' बिबट्यांवरून संकटमोचकांना चिमट्यावर चिमटे
बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांना चाप, कर्जदारांना दिलासा;  एका निर्णयानं मायक्रो फायनान्स कंपन्यांचे स्टॉक पडले
मुद्दलापेक्षा जास्त व्याज घेऊ नका, कर्जदारांना धमकावल्यास कारवाई, बिहार सरकारकडून मायक्रो फायनान्स कंपन्यांचा चाप
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
अजित पवार धुक्याने गेले की धोक्यानं? सरकार किंवा पोलीस स्टेशनला FIR का नकोय? सरकार संशयाची भूतं नाचवत आहे; मरीन ड्राईव्हला अधिकारी FIR लिहायला बसला आणि DCPनं थांबवला; आता राज ठाकरेंचाही थेट सवाल
दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर
दिल्लीतही बापाचा जामीन फेटाळला, वाल्मिक कराडच्या लेकाची फेसबुक पोस्ट; म्हणाला, आता मात्र सर्वांसमोर
Embed widget