एक्स्प्लोर
मी शेवटपर्यंत मनातून हार मानली नव्हती: साक्षी मलिक

रिओ दी जेनेरिओ: रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या पैलवान साक्षी मलिकनं या यशाचं गुपित उघड केलं आहे. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ती बोलत होती.
सुरुवातील 5-0 नं मागे पडलेल्या साक्षीनं तुफानी खेळ करीत विजय अक्षरश: खेचून आणला. याबाबतच बोलतान साक्षी म्हणाली की, 'सुरुवातीला मी 5-0नं मागे पडली होती. पण मी मनात हार मानली नव्हती. माझ्याकडे 3 मिनिटं होती. तेव्हा माझ्या मनात होतं की, या तीन मिनिटात मला माझं बेस्ट द्यायचं आहे. मी माझं बेस्ट दिलं आणि आज पदक माझ्या हातात आहे.' असं साक्षी म्हणाली.
शेवटच्या क्षणापर्यंत हार न मानता साक्षीनं विजयला गवसणी घातली. तिच्या या विजयामुळे भारतानं रिओ ऑलिम्पिकमध्ये आपलं पदकाचं खातं उघडलं.
संबंंधित बातम्या:
रिओमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक, पैलवान साक्षी मलिकला कांस्य
VIDEO: पदक जिंकल्यानंतर सगळं जग सुंदर वाटतं आहे: साक्षी मलिक
साक्षी तू इतिहास रचला, आम्हाला तुझा अभिमान आहे: पंतप्रधान मोदी
साक्षीला अडीच कोटींचं बक्षीस जाहीर, सरकारी नोकरीही मिळणार!
एखाद्या बहिणीनं भावाला यापेक्षा मोठं गिफ्ट दिलं नसेल: सचिन मलिक
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
मुंबई
महाराष्ट्र
विश्व
Advertisement
Advertisement
























