एक्स्प्लोर

OnlyOnTwitter : उद्योग क्षेत्रातील 'हे' ट्विट 2021 मध्ये सर्वाधिक राहिले चर्चेत 

टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल ट्विट उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे.

मुंबई : बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. परंतु, अलिकडच्या काळात या सोशल मीडियाचा वापर फक्त भावना व्यक्त करण्यापूरता मर्यादित राहिला नसून माहितीची आदान प्रदान करण्यापर्यंत पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रातील लोक आता या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यातच एखादी पोस्ट आपल्याला आवडल्यानंतर ती रीपोस्ट करण्याचीही पद्धत रूढ झाली आहे. सध्या असेच एक ट्विट (twitters) चर्चेत आहे, जे उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे. एअर इंडिया कंपनी (Air India) सरकारकडून टाटा समुहाकडे परत आल्यानंतर टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी त्यासंदर्भात ट्विट केले होते. टाटा यांचे हे ट्विट 2021 मध्ये उद्योग क्षेत्रात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट करण्यात आले आहे. 
 
जवळपास 90 वर्षापूर्वी टाटा समुहाने स्थापन केलेली एअर इंडिया ही कंपनी गेल्या 70 वर्षापासून सरकारी मालकीची होती. ती गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त बोली लावून रतन टाटा यांनी खरेदी केली. ही कंपनी टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी एअर इंडियाचे स्वागत करणारे ट्विट केले होते. सत्तर वर्ष एअर इंडिया सरकारी मालकीच्या राहिल्यानंतर ती परत टाटा समुहात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना, रतन टाटा यांनी (@RNTata2000) एअर इंडियाच्या सुरुवातीच्या विमानाच्या फोटोसह “वेलकम बॅक, एअर इंडिया” अशी टॅगलाईन देऊन ट्विट केले होते. टाटा यांनी हे ट्विट केल्यानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी हे ट्वीट रिट्विट आणि लाईक केले. तब्बल 19 लाख तीन हजार जणांनी या ट्विटला रिप्लाय दिला आहे. तर 91 लाख एक हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. 40 लाख चार हजार लोकांनी ते लाईक केले आहे.  


सर्वात जास्त बोली लावून परत घेतली एअर इंडिया
टाटा सन्सने (Tata Sons) ऑक्टोबर महिन्यात एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं. 

फक्त दोन लाखांच्या भांडवलावर झाली होती एइर इंडियाची स्थापना
टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.  टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता. 

संबंधित बातम्या

Air India Bid: एअर इंडिया पुन्हा TATA कडे! कंपनीने सर्वात मोठी बोली लावून घेतला ताबा

Air India : 'वेलकम बॅक, एअर इंडिया...', मालकी मिळाल्यानंतर रतन टाटाची भावनिक प्रतिक्रिया 

 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
IND vs ENG : 'त्या' दोन षटकांनी फिरवला सामन्याचा निकाल, भारत चौथ्यांदा T20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
इस्रायल इराण युद्धाचा भारतावर परिणाम, कोट्यावधी रुपयांचा तांदूळ अडकला, किंमतीत मोठी घसरण
मोठी बातमी, पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
पश्चिम बंगालच्या राज्यपालांचा राजीनामा, निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड, ममता बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया समोर
Israel Iran Conflict : अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 
अखेर भारताकडून खामेनींच्या मृत्यूवर शोकसंदेश जारी, इराणच्या दूतावासात जाऊन हस्ताक्षर 

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Maharashtra Live blog updates: महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती
Sanju Samson : संजू सॅमसनचा सलग दुसऱ्या मॅचमध्ये धडाका, रोहित शर्माला मागं टाकलं, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार संजूच्या नाववार 
संजू सॅमसननं रोहित शर्माचा विक्रम मोडला, भारताकडून टी 20 वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम नावावर नोंदवला
भारताचा 7 धावांनी विजय, शोएब अख्तरनं विजयाचं श्रेय कोणाला दिलं? टीम इंडियाच्या दोन खेळाडूंचं नाव घेत म्हणाला...
भारताचा इंग्लंडवर 7 धावांनी विजय,मोहम्मद कैफ आणि शोएब अख्तरकडून भारताच्या दोन खेळाडूंचं कौतुक, टीम इंडियाचं अभिनंदन करत म्हणाला...
Jishnu Dev Varma : महाराष्ट्राचे नवे राज्यपाल, कोण आहेत जिष्णू देव वर्मा? त्रिपुरा ते मुंबई, राजकीय प्रवासाची कहाणी!
महाराष्ट्राच्या राज्यपालपदी जिष्णू देव वर्मांची नियुक्ती; त्रिपुराच्या राजघराण्याशी संबंधित, कशी आहे राजकीय कारकीर्द
Rajya Sabha Election : राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
राज्यसभेत आजोबांसह नातवाचीही एन्ट्री, एकाच कुटुंबातील तीन खासदार, राजकारणात नवे समीकरण
Iran : इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
इराणची होर्मुझच्या सामुद्रधुनीसंदर्भात मोठी खेळी, भारताला फायदा होणार, अमेरिका- इस्त्रायलची कोंडी करण्याचा प्लॅन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 मार्च 2026 | गुरुवार
BMC Election : गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
गिरणगावातील प्रभाग समितीच्या निवडणुकीत ठाकरेंना धक्का, समाजवादी पक्षाच्या मदतीने महायुतीची बाजी
Embed widget