एक्स्प्लोर

OnlyOnTwitter : उद्योग क्षेत्रातील 'हे' ट्विट 2021 मध्ये सर्वाधिक राहिले चर्चेत 

टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल ट्विट उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे.

मुंबई : बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. परंतु, अलिकडच्या काळात या सोशल मीडियाचा वापर फक्त भावना व्यक्त करण्यापूरता मर्यादित राहिला नसून माहितीची आदान प्रदान करण्यापर्यंत पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रातील लोक आता या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यातच एखादी पोस्ट आपल्याला आवडल्यानंतर ती रीपोस्ट करण्याचीही पद्धत रूढ झाली आहे. सध्या असेच एक ट्विट (twitters) चर्चेत आहे, जे उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे. एअर इंडिया कंपनी (Air India) सरकारकडून टाटा समुहाकडे परत आल्यानंतर टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी त्यासंदर्भात ट्विट केले होते. टाटा यांचे हे ट्विट 2021 मध्ये उद्योग क्षेत्रात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट करण्यात आले आहे. 
 
जवळपास 90 वर्षापूर्वी टाटा समुहाने स्थापन केलेली एअर इंडिया ही कंपनी गेल्या 70 वर्षापासून सरकारी मालकीची होती. ती गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त बोली लावून रतन टाटा यांनी खरेदी केली. ही कंपनी टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी एअर इंडियाचे स्वागत करणारे ट्विट केले होते. सत्तर वर्ष एअर इंडिया सरकारी मालकीच्या राहिल्यानंतर ती परत टाटा समुहात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना, रतन टाटा यांनी (@RNTata2000) एअर इंडियाच्या सुरुवातीच्या विमानाच्या फोटोसह “वेलकम बॅक, एअर इंडिया” अशी टॅगलाईन देऊन ट्विट केले होते. टाटा यांनी हे ट्विट केल्यानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी हे ट्वीट रिट्विट आणि लाईक केले. तब्बल 19 लाख तीन हजार जणांनी या ट्विटला रिप्लाय दिला आहे. तर 91 लाख एक हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. 40 लाख चार हजार लोकांनी ते लाईक केले आहे.  


सर्वात जास्त बोली लावून परत घेतली एअर इंडिया
टाटा सन्सने (Tata Sons) ऑक्टोबर महिन्यात एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं. 

फक्त दोन लाखांच्या भांडवलावर झाली होती एइर इंडियाची स्थापना
टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.  टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता. 

संबंधित बातम्या

Air India Bid: एअर इंडिया पुन्हा TATA कडे! कंपनीने सर्वात मोठी बोली लावून घेतला ताबा

Air India : 'वेलकम बॅक, एअर इंडिया...', मालकी मिळाल्यानंतर रतन टाटाची भावनिक प्रतिक्रिया 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
India Rain Deficit : 'एल निनो'चा प्रभाव, राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; भारतात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर, IMD चा अंदाज काय?
'एल निनो'चा प्रभाव, राज्यासह देशात संकाटाचे ढग गडद; जुलैमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज; भारतात मान्सूनच्या पावसाची तूट 40 टक्क्यांवर, IMD चा अंदाज काय?
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
'देशात जन्मलेलं प्रत्येक मूल अमेरिकन नागरिक..' अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायदा कायम, सुप्रीम कोर्टाकडून ट्रम्पचा आदेश रद्द, लाखो भारतीयांना दिलासा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेसवेवर स्लिपर बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत सहा जणांचा जिवंतपणी जळून कोळसा; 8 जणांचा मृत्यू, 21 जण होरपळले, डिकीत सिगारेट बॉक्स असल्याचा दावा

व्हिडीओ

Satej Patil on Sachin Ahir : सचिन अहिर फुटले, आता सतेज पाटील म्हणतात...
Eknath Shinde PC on Chembur : चेंबूरमध्ये शाळेच्या व्हॅनवर झाड कोसळलं,एकनाथ शिंदे म्हणाले...
Zero Hour Full : सचिन अहिर शिवसेनेत,शिंदेंचा ठाकरेंना धक्का, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
Operation Tutari Special Report : राज्यात ऑपरेशन तुतारी? शरद पवार गटात दोन मतप्रवाह
Sachin Ahir Special Report : सचिन अहिर शिंदेंच्या शिवसेनेत, ठाकरे पिता-पुत्रांना धक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
देशातील 23 राजकीय पक्षाचे SIR वरून सरन्यायाधीशांना पत्र; निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभारावर अत्यंत गंभीर आरोप, 'इंडिया' आघाडीबाहेरील पक्षांचाही समावेश
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
खासदार श्रीकांत शिंदेंच्या ताफ्याला काळे झेंडे; नांदेडमध्ये संतप्त शिवसैनिकांची घोषणाबाजी, पोलिसांकडून धरपकड
Devendra Fadnavis: सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
सचिन अहिरांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड; मुख्यमंत्री फडणवीसांनी 'अहिर' शब्दाचा अर्थ सांगितला, शिंदेंची शेरोशायरी
Sunil Shinde News: ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
ठाकरेंचा विधान परिषदेतील आणखी एक आमदार गळाला?; सेम टू सेम सचिन अहिर पॅटर्न राबवण्याच्या हालचाली, पडद्यामागे काय घडतंय?
Raj Thackeray: जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
जेव्हा सत्ताधारी विरोधक संपवतात, तेव्हा त्यांच्यातच दुश्मन तयार होतात आणि तेच त्यांना संपवतात, ही प्रक्रिया भाजपत सुरु झालीय; राज ठाकरेंनी थेट सुनावलं
Mumbai Rain Red Alert: मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्याला चार वाजेपर्यंत पावसाचा रेड अलर्ट, मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा, तर विदर्भातल्या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी
Hardik Pandya: आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
आजवर कोणत्याच भारतीय क्रिकेटरने घेतला नाही असा निर्णय चक्क हार्दिक पांड्यानं घेतला!
Eknath Shinde Delhi Visit: श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
श्रीकांत शिंदे आणि ओमराजे निंबाळकरांच्या केंद्रीय मंत्रिपदाची जोरदार चर्चा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजच दिल्ली गाठण्याची शक्यता
Embed widget