एक्स्प्लोर

OnlyOnTwitter : उद्योग क्षेत्रातील 'हे' ट्विट 2021 मध्ये सर्वाधिक राहिले चर्चेत 

टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी केलेल ट्विट उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे.

मुंबई : बदलत्या काळानुसार सोशल मीडियाचा वापर खूपच वाढला आहे. आज प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. त्यामुळे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. परंतु, अलिकडच्या काळात या सोशल मीडियाचा वापर फक्त भावना व्यक्त करण्यापूरता मर्यादित राहिला नसून माहितीची आदान प्रदान करण्यापर्यंत पोहोचला आहे. सर्वच क्षेत्रातील लोक आता या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करत आहेत. त्यातच एखादी पोस्ट आपल्याला आवडल्यानंतर ती रीपोस्ट करण्याचीही पद्धत रूढ झाली आहे. सध्या असेच एक ट्विट (twitters) चर्चेत आहे, जे उद्योग क्षेत्रात 2021 या वर्षात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट केले गेले आहे. एअर इंडिया कंपनी (Air India) सरकारकडून टाटा समुहाकडे परत आल्यानंतर टाटा समुहाचे प्रमुख उद्योगपती रतन टाटा यांनी त्यासंदर्भात ट्विट केले होते. टाटा यांचे हे ट्विट 2021 मध्ये उद्योग क्षेत्रात सर्वात जास्त लाईक आणि रिट्विट करण्यात आले आहे. 
 
जवळपास 90 वर्षापूर्वी टाटा समुहाने स्थापन केलेली एअर इंडिया ही कंपनी गेल्या 70 वर्षापासून सरकारी मालकीची होती. ती गेल्या ऑक्टोबर महिन्यात सर्वात जास्त बोली लावून रतन टाटा यांनी खरेदी केली. ही कंपनी टाटा समुहाच्या ताब्यात आल्यानंतर रतन टाटा यांनी एअर इंडियाचे स्वागत करणारे ट्विट केले होते. सत्तर वर्ष एअर इंडिया सरकारी मालकीच्या राहिल्यानंतर ती परत टाटा समुहात दाखल झाल्याचा आनंद व्यक्त करताना, रतन टाटा यांनी (@RNTata2000) एअर इंडियाच्या सुरुवातीच्या विमानाच्या फोटोसह “वेलकम बॅक, एअर इंडिया” अशी टॅगलाईन देऊन ट्विट केले होते. टाटा यांनी हे ट्विट केल्यानंतर जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी हे ट्वीट रिट्विट आणि लाईक केले. तब्बल 19 लाख तीन हजार जणांनी या ट्विटला रिप्लाय दिला आहे. तर 91 लाख एक हजार लोकांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. 40 लाख चार हजार लोकांनी ते लाईक केले आहे.  


सर्वात जास्त बोली लावून परत घेतली एअर इंडिया
टाटा सन्सने (Tata Sons) ऑक्टोबर महिन्यात एअर इंडियाच्या (Air India) निर्गुंवणुकीसाठी लावलेली बोली जिंकली. टाटा सन्सने एअर इंडियासाठी 18 हजार कोटी रुपयांची बोली लावली होती. तर दुसरे खरेदीदार असलेल्या अजय सिंह यांच्या स्पाईसजेटने एअर इंडियासाठी 15100 कोटी रुपयांची बोली लावली होती. या दोन्ही खरेदीदारांच्या बोली अंतिम फेरीसाठी पात्र असल्याचं एअर इंडियाच्या निर्गुंतवणुकीसाठी गठित करण्यात आलेल्या मंत्रिस्तरीय समितीने जाहीर केलं होतं. 

फक्त दोन लाखांच्या भांडवलावर झाली होती एइर इंडियाची स्थापना
टाटा सन्सचे अध्वर्यू असलेल्या जेआरडी यांनीच एअर इंडियाची स्थापना केली होती. जेआरडी टाटा म्हणजे जहांगीर रतनभॉय दादाभाई टाटा यांनी 1932 साली टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. ते स्वतः देशातील पहिले परवानाधारक वैमानिक होते.  टाटा एअरलाईन्सची सुरुवात फक्त दोन लाख रुपयांच्या भांडवलावर झाली होती. टाटा एअर लाईन्सचा पहिला प्रवास हा कराची ते मुंबई असा होता. 

संबंधित बातम्या

Air India Bid: एअर इंडिया पुन्हा TATA कडे! कंपनीने सर्वात मोठी बोली लावून घेतला ताबा

Air India : 'वेलकम बॅक, एअर इंडिया...', मालकी मिळाल्यानंतर रतन टाटाची भावनिक प्रतिक्रिया 

 

 

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Jantar Mantar Protest : जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने सामने, पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या, दिल्लीत मोठ्या घडामोडी
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
नीट पेपरफुटी प्रकरणावरुन राहुल गांधी राजकारण करतायेत, जे पी नड्डांचा हल्लाबोल, सरकारत चर्चेसाठी तयार असल्याची माहिती
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच

व्हिडीओ

Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार
Dharmendra Pradhan On Rahul Gandhi:राहुल गांधींची टीका अन् राजीनाम्याच्या मागणीवर धर्मेंद्र प्रधान यांचं प्रत्युत्तर
Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया
Raj Thackeray on Delhi : पोलिसांचा विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार, राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
रेवती आऊट, जान्हवी इन... सुप्रिया सुळेंकडून खास फोटो शेअर, सूचक कॅप्शनने वेधलं लक्ष, चर्चा तर होणारच
Sharad Pawar: शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
शरद पवारांनी सांगितलं मोदीभेटीमागचं कारण; दिल्लीतील आंदोलनावरही पंतप्रधानांना बोलले, काय झाली चर्चा
Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
मुंबईत 23 जुलैपासून 6 ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे कारण काय? सरकारला कसली भीती वाटते? रोहित पवारांचा सीएम फडणवीसांना सवाल
Sonam Wangchuk: ...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
...तर उपोषण मागे घेऊ, सोनम वांगचुक यांचं केंद्र सरकारला पत्र; आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासह तीन अटी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 जुलै 2026 | बुधवार
Rahul Gandhi: मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
मोदी विद्यार्थ्यांची माफी मागा, 10 वर्षात 150 पेपर फुटले, एकालाही शिक्षा नाही; प्रामाणिक सोडून 40-50 लाख मोजणाऱ्यांना मागच्या दराने संधी; राहुल गांधींचा कडाडून हल्लाबोल, तीन मोठ्या मागण्या
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
दिल्लीत लाठीचार्ज, महाराष्ट्रात पोलिसांचं डिजिटल पेट्रोलिंग; राज्यातील आंदोलकांवर 14 दिवसांपासून वॉच
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
बिहारमध्येही दिल्ली पोलिसांची सेम टू सेम काॅपी; मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर पेपरफुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी पळवून पळवून मारलं, फरफटत नेलं, भाजप आमदार पळाल्याने वाचला
Embed widget