Exclusive : '26 जानेवारीला झालं ते अयोग्य, आम्ही दिलेल्या ताकतीचा चुकीचा वापर' : शेतकरी नेते व्ही.एम सिंह
R-Day violence in Delhi: एबीपी माझाशी बोलताना शेतकरी नेते व्ही एम सिंह यांनी राकेश टिकैत यांच्यावर आरोप केले आहेत. 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे विषय बाजूला राहिले आणि लाल किल्ल्यावर कोण पोहोचणार हा मुद्दा बनला, असं त्यांनी म्हटलंय.
![Exclusive : '26 जानेवारीला झालं ते अयोग्य, आम्ही दिलेल्या ताकतीचा चुकीचा वापर' : शेतकरी नेते व्ही.एम सिंह R-Day violence in Delhi : VM Singh stated What happened on 26th January is inappropriate misuse of our power Exclusive : '26 जानेवारीला झालं ते अयोग्य, आम्ही दिलेल्या ताकतीचा चुकीचा वापर' : शेतकरी नेते व्ही.एम सिंह](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/28213102/Sardar-VM-Singh.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Farmer Protest : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आयोजित ट्रॅक्टर रॅलीदरम्यान हिंसाचारावरुन एकमेंकावर आरोपांचं सत्र सुरु आहे. यातच शेतकरी नेते व्ही एम सिंह यांनी 26 जानेवारीला जे घडलं ते अयोग्य असल्याचं म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना व्ही एम सिंह यांनी म्हटलं की, गेल्या 60 दिवसांपासून आम्ही सरकारसोबत बैठकीत न जाता आंदोलनाला सपोर्ट करत होतो. कारण आमच्या मागण्या मांडल्या जातील अशी आशा होती. आम्ही जी ताकत दिली त्या ताकतीचा चुकीचा वापर केला जात होता, असं सिंह यांनी म्हटलं आहे.
व्ही. एम सिंह म्हणाले की, राकेश टीकैत पोलिसांकडून एक मार्ग घेऊन आले होते पण बॅरिकेड तोडून ते स्वतः दुसरीकडे निघाले. आम्ही निश्चित मार्गावरच मोर्चा करत होतो. आम्ही जी ताकत दिली त्या ताकतीचा चुकीचा वापर केला जात होता. जोपर्यंत एम एस पी ची गॅरंटी मिळत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करणार आहोत. एकदा ही हमी मिळाली की या कायद्यांचा प्रभाव राहत नाही. त्यामुळे आमची ही मागणी आहे, असं ते म्हणाले.
ते म्हणाले की, 26 जानेवारी रोजी शेतकऱ्यांचे विषय बाजूला राहिले आणि लाल किल्ल्यावर कोण पोहोचणार हा मुद्दा बनला. त्यांनी म्हटलं की, व्ही एम सिंह टिकैत यांच्यापेक्षा लहान किंवा मोठा नाही. आम्ही मागे राहून सपोर्ट देत होतो मात्र त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला. मला म्हणत होते बुराडी मैदानावर आम आदमी पक्षाची मदत घेतो आहे. मग नंतर आंदोलनात त्यांनी दिलेले टॉयलेट स्वीकारले ना? असंही ते म्हणाले.
Farmer Tractor Rally Violence : दिल्ली हिंसाचारप्रकरणी योगेंद्र यादव यांच्यासह 26 जणांवर गुन्हे दाखल
शेतकरी नेत्यांविरोधात गुन्हे दाखल ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचाराबद्दल बर्याच दिल्ली पोलिसांनी अनेक शेतकरी नेत्यांविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये योगेंद्र यादव यांच्या नावाचाही समावेश आहे. त्यांच्याशिवाय राकेश टिकैत, सरवनसिंग पंढेर आणि सतनामसिंग पन्नू यांचीही नावं एफआयआरमध्ये नाव आहे. या नेत्यांव्यतिरिक्त पंजाबी अभिनेता आणि गायक दीप सिद्धू आणि लखबीरसिंग उर्फ लखा सिधाना हे देखील दिल्ली पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 26 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. शेतकरी नेत्यांविरोधात विविध कलमांर्तगत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 93 जणांना अटक केल्याचं बोललं जात आहे. तर 200 लोकांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या हिंसाचाराबद्दल दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये असा आरोप केला जात आहे की पोलिसांनी ट्रॅक्टर रॅलीसाठी जारी केलेल्या एनओसीचे पालन केले गेले नाही.
गुन्हे दाखल झालेल्या नेत्यांची नावं
आंदोलनात सहभागी झालेल्या जवळपास सर्व नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये नर्मदा बचाव आंदोलनाच्या मेधा पाटकर, स्वराज इंडियाचे योगेंद्र यादव, जममुरी किसान सभा पंजाबचे कुलवंतसिंग संधू, भारतीय किसान सभा डकोडाचे बुटा सिंग यांचा समावेश आहे. कवणलप्रीतसिंग पन्नू, किसान मजदूर संघर्ष समिती सतनामसिंह पन्नू, सुरजितसिंग फूल, जोगिंदरसिंग हरमीतसिंग कादियन, बलवीरसिंग राजेवाल, सतनामसिंग साहनी, डॉ. दर्शन पाल, भगबसिंग मनसा बलविंदर लिओ ओलाक, सतनामसिंग भेरू, बुटासिंग शादिपुर, बलदेवसिंग सिरसा, जगबीरसिंग ताडा, मुकेश चंद्र, सुखपालसिंग दाफर, हरपाल सांगा, कृपालसिंग नटूवाला, राकेश टिकैत, कविता, ऋषी पाल अंबावता, व्हीएम सिंग, प्रेमसिंग गहलोत यांची नावं एफआयआरमध्ये आहेत. गुन्हेगारी कट रचणे, दरोडा, दरोड्याच्या वेळी प्राणघातक शस्त्राचा वापर, खुनाचा प्रयत्न करण्यासारख्या गंभीर कलमांसह एकूण 13 कलमांर्तगत ही कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)