एक्स्प्लोर

सरकारच्या निर्णयाला विरोध करणं फॅशन, घटनात्मक पद्धतीनं लागू केलेल्या कायद्यांना विरोध त्रासदायक : किरेन रिजिजू

सरकारच्या निर्णयाला विरोध करणं फॅशन झाली आहे. घटनात्मक पद्धतीनं लागू केलेल्या कायद्यांना विरोध त्रासदायक आहे, असं केंद्रीय विधि आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी म्हटलं आहे.

नवी दिल्ली: सरकारच्या निर्णयाला विरोध करणं फॅशन झाली आहे. घटनात्मक पद्धतीनं लागू केलेल्या कायद्यांना विरोध त्रासदायक आहे, असं केंद्रीय विधि आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी म्हटलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, आज काल काही लोकं कायदेशीर, वैध आणि घटनात्मक गोष्टींना जोरदार पद्धतीनं विरोध करतात. असा विरोध करणं ही फॅशन झाली आहे. ही देशात संकटाची स्थिती नाही का? असा सवाल देखील रिजिजू यांनी केला आहे. आम्ही विरोधी पक्षात असताना असे केले नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे. 

विधि व न्याय मंत्रालयाच्या एका कार्यक्रमात काल रिजिजू (Kiren Rijiju)यांनी म्हटलं की, जेव्हा संसद काही विधेयक पारित करते किंवा सदनात काही कायद्यांना मंजूरी दिली जाते त्यावेळी नियमांचं पालन होत नाही, असं म्हणायची आजिबात गरज नसते. या गोष्टी घटनात्मक पद्धतीनं होत असतात, असं ते म्हणाले.  

सोमवारी संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) सुरु होत आहे. त्याआधी रिजिजू यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिवाळी अधिवेशनात  तीन कृषी कायदे (New Agriculture Laws) रद्द करण्याबाबतच विधेयक येणार आहे. त्या संदर्भाने रिजिजू यांनी भाष्य केलं.  

संविधानाचा आदर केलाच पाहिजे : किरण रिजिजू
किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी म्हटलं की, 'भारत हा लोकशाही माननारा देश आहे. त्यामुळं लोकशाहीत विरोध करण्याचा आपल्याला अधिकार आहे. वैचारिक मतभेद करण्याचाही अधिकार आहे. असहमती दर्शवण्याचा अधिकार आहे मात्र घटनात्मक पद्धतीनं मंजूर केलेल्या गोष्टींचा सन्मान केला पाहिजे, असं ते म्हणाले. कोणता कायदा संविधानिक किंवा असंविधानिक आहे हे न्यायपालिका ठरवेल, असंही ते म्हणाले. 

त्यांनी म्हटलं की, कुणीतरी मला विचारलं की, आपण मंत्री आहात, कायदा पास झाला आहे तर आपण लागू का करु शकत नाहीत. त्यावर माझ्याकडं काही उत्तर नव्हतं. माझ्यासाठी या सोप्या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड होतं. आपल्याला यावर विचार करायला हवा. हक्क आपल्यासाठी आहेत मात्र आपण देशाच्या सेवेत आहोत. मूलभूत अधिकार महत्वाचे आहेतच मात्र मूलभूत कर्तव्य त्यापेक्षाही महत्वाची आहेत, असं ते म्हणाले.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 09 PM: 29 Sept 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सVare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 29 Sept 2024Uddhav Thackeray Full Speech Nagpur : फडणवीसांच्या होमग्राऊंडवर शिंदे, शाहांवर हल्ला, ठाकरे  UNCUTMahayuti Meeting : महायुतीच्या जागावाटपासंदर्भात वर्षा निवासस्थानी साडेचार तास बैठक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Air Hostess : एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
एअर होस्टेसची नोकरी किती वर्ष असते? किती वय झालं की निवृत्त व्हावं लागतं? पगार किती मिळतो?
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
कौटुंबिक वादातून आईची दोन चिमुकल्यासह विहिरीत उडी, तिघांचा मृत्यू; माहेरच्या लोकांनी हंबरडा फोडला
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
मुंबई महापालिकेत भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली निलंबित 96 अधिकाऱ्यांची पुनर्बहाली; RTI मधून उघड
Numerology : अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
अतिशय फटकळ असतात 'या' जन्मतारखेचे लोक; जे मनात, तेच तोंडावर... समोरच्या व्यक्तीच्या भावनांचाही करत नाहीत विचार
Video:  बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
Video: बाप रे बाप, रोहिणी खडसेंच्या हाती माईकऐवजी साप; व्हिडिओ व्हायरल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
आनंद दिघेंना कुणी मारलं, का मारलं हे आजही गूढ; आता संजय निरुपमांचा सवाल
Pitru Paksha 2024 : पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
पितृ पक्ष संपताच वाढणार 'या' 3 राशींच्या अडचणी; नोकरीत विरोधक देणार त्रास, आर्थिक संकटही बळावणार
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
धुरळा... सणासुदीसाठी Paytm च्या ट्रॅव्‍हल कार्निवलची घोषणा; बस व रेल्‍वे तिकिटांवर 25 टक्‍के सूट
Embed widget