एक्स्प्लोर

युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?

भारताच्या हवाई दलानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. या एअर स्ट्राईकद्वारे भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. 

Operation Sindoor:  भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानातील 5 आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 4 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख केले. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 48 लोक जखमी आहेत. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला 15 दिवसांनंतर घेतला आहे. 

इस्त्रायलनं भारतानं केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्त्रायलचे राजदूत म्हणाले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आहे. दुसरीकडे चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. सध्या भारत पाक सीमेवर तणाव वाढलेला आहे.जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर चीन शिवाय पाकिस्तानच्या बाजूनं कोण जाऊ शकतं?  

चीनचा पाकिस्तानला पुन्हा पाठिंबा

भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनसाठी पुढं आला. चीननं भारताच्या एअर स्ट्राईकवर चिंता व्यक्त केली. भारताकडून करण्यात आलेली सैन्य कारवाई खेदजनक असल्याचं चीननं म्हटलं. सद्यस्थितीमुळं चिंतीत असल्याचं चीननं म्हटलं. दोन्ही देशांनी संयम दाखवावा आणि प्रश्न आणखी गुंतागुंतीचा करु नका, असं चीननं म्हटलं.  

तुर्की पाकिस्तानच्या समर्थनार्थ

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर तुर्कीनं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. तुर्कीच्या राजदूतांनी भारताचे एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. यापुढं जात त्यांनी निर्देोष लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तुर्कीनं म्हटलं की काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानं आणि काश्मीरच्या लोकांच्या इच्छेवर सोडवण्यात यावा. 

अझरबैझान पाकिस्तानसोबत  

ऑपरेशन सिंदूरनंतर अझरबैझानच्या विदेश मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सैन्य हल्ल्याचा निषेध करतो असं म्हटलं गेलं आहे. ज्यामध्ये नागरिक जखमी झाले किंवा काही जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये एकूण 26  जणांचा मृत्यू झाला होता. या नंतर भारताकडून पाकिस्तानला कधी उत्तर दिलं जाणार याची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत. 

भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये न जाता दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारतानं पुन्हा एकदा दहशतवादापुढं झुकणार नसल्याचं दाखवून दिलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं जगाला देखील ठाम संदेश दिला आहे. भारताच्या सुरक्षा दलांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची रडारड सुरु झाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Israel-Iran War Affect Mumbai Hotel: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!
Gas Shortage ECA Act: इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
इराण-इस्रायलच्या युद्धामुळे अखेर निर्णय घ्यावाच लागला; मोदी सरकारने 1955 चं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं, भारतात ECA कायदा लागू, नेमकं काय काय घडतंय?
Gas Shortage ESMA: देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
देशभरात गॅसचा तुटवडा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय, ESMA कायदा लागू, नक्की काय होणार?
NCERT: 'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार
'न्यायपालिकेतील भ्रष्टाचार' प्रकरणावरून सुप्रीम कोर्टाने फटकारलं, NCERT ने मागितली बिनशर्त माफी; आठवीच्या पुस्तकातील 'तो' धडा पुन्हा लिहिणार

व्हिडीओ

Pune Khanawal Gas Shortage : पुण्यात गॅस तुटवड्यांमुळे अनेक खानावळी बंद;बॅचलर,विद्यार्थ्यांचे हाल
Vishakha Subhedar Son Return to Mumbai : कुवेतमधून सुखरुप परतला विशाखा सुभेदार यांचा मुलगा
BJP MLA vs BJP Minister : अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप नेत्यांमध्ये जुगलबंदी Special Report
Iran Israel War : इराण-इस्त्रायल युद्धाच्या झळा, खिशाला कळा Special Report
Uddhav Thackeray Vidhan Parishad : उद्धव ठाकरे विधान परिषदेत पुन्हा येणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mhada House : धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
धूळ खात पडलेली घरे विक्रीला; म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण मंडळाच्या तिजोरीत तब्बल 800 कोटींची भर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
युद्धामुळे गॅस महागला आता सोन्याच्या भावातही मोठी उसळी, 1 तोळं सोनं किती रुपयांनी महागलं? जाणून घ्या लेटेस्ट दर
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
लवकर या, लवकर जा.. सुनेत्रा पवारांची महिलांसाठी मोठी घोषणा; विधिमंडळातील पहिल्याचं भाषणात सगळ्यांचं लक्ष वेधलं, VIDEO
Maharashtra Weather Update: मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
मुंबई तापणार! 3 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट; हवामान विभागाचा महाराष्ट्राला सावधानतेचा इशारा
Rohini Khadse : गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
गॅस टंचाईचा विषय तात्काळ सोडवा, अन्यथा वेळ आली तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरू; रोहिणी खडसे यांचा सरकारला गंभीर इशारा
BCCI Give Team India Prize Money T20 World Cup 2026 मोठी बातमी: विश्वविजेत्या टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; आयसीसीपेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
टीम इंडियासाठी BCCI ने पेटारा उघडला; ICC पेक्षा चौपट आणि 2024 च्या तुलनेपेक्षाही अधिक बक्षीस जाहीर, किती कोटी मिळाले?
Buldhana Crime: तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
तीनवेळा जेवणातून विष दिलं तरीही पत्नी वाचली, अखेर थंड डोक्याने शेवटचा प्लॅन आखला, बुलढाण्यातली वृषाली गावंडे हत्याकांडाची इनसाईड स्टोरी
Sangola News: दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
दहावीचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थी अन् शिक्षकांवर मधमाशांचा हल्ला; जवळपास 100 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Embed widget