एक्स्प्लोर

युद्ध झाल्यास चीन शिवाय कोणते देश पाकिस्तानला साथ देतील, भारताच्या विरोधात कोण कोण उभं राहू शकतं?

भारताच्या हवाई दलानं पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांवर एअर स्ट्राईक केला आहे. या एअर स्ट्राईकद्वारे भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. 

Operation Sindoor:  भारतानं ऑपरेशन सिंदूर द्वारे पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. भारतानं मध्यरात्री दीडच्या सुमारास पाकिस्तानातील 5 आणि पाक व्याप्त काश्मीरमधील 4 ठिकाणांवर एअर स्ट्राईक करुन दहशतवाद्यांचे अड्डे बेचिराख केले. भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 48 लोक जखमी आहेत. भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला 15 दिवसांनंतर घेतला आहे. 

इस्त्रायलनं भारतानं केलेल्या कारवाईचं समर्थन केलं आहे. भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार असल्याचं इस्त्रायलचे राजदूत म्हणाले. त्यांनी ऑपरेशन सिंदूरचं समर्थन केलं आहे. दुसरीकडे चीननं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. सध्या भारत पाक सीमेवर तणाव वाढलेला आहे.जर दोन्ही देशांमध्ये युद्ध झालं तर चीन शिवाय पाकिस्तानच्या बाजूनं कोण जाऊ शकतं?  

चीनचा पाकिस्तानला पुन्हा पाठिंबा

भारताकडून करण्यात आलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर चीन पुन्हा एकदा पाकिस्तानच्या समर्थनसाठी पुढं आला. चीननं भारताच्या एअर स्ट्राईकवर चिंता व्यक्त केली. भारताकडून करण्यात आलेली सैन्य कारवाई खेदजनक असल्याचं चीननं म्हटलं. सद्यस्थितीमुळं चिंतीत असल्याचं चीननं म्हटलं. दोन्ही देशांनी संयम दाखवावा आणि प्रश्न आणखी गुंतागुंतीचा करु नका, असं चीननं म्हटलं.  

तुर्की पाकिस्तानच्या समर्थनार्थ

भारताच्या एअर स्ट्राईकनंतर तुर्कीनं पाकिस्तानचं समर्थन केलं आहे. तुर्कीच्या राजदूतांनी भारताचे एअर स्ट्राईक पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचं उल्लंघन असल्याचं म्हटलं. यापुढं जात त्यांनी निर्देोष लोकांच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे. तुर्कीनं म्हटलं की काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राच्या प्रस्तावानं आणि काश्मीरच्या लोकांच्या इच्छेवर सोडवण्यात यावा. 

अझरबैझान पाकिस्तानसोबत  

ऑपरेशन सिंदूरनंतर अझरबैझानच्या विदेश मंत्रालयाकडून एक प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये पाकिस्तानच्या विरोधात झालेल्या सैन्य हल्ल्याचा निषेध करतो असं म्हटलं गेलं आहे. ज्यामध्ये नागरिक जखमी झाले किंवा काही जणांचा मृत्यू झाला. 

दरम्यान, पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला पर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये एकूण 26  जणांचा मृत्यू झाला होता. या नंतर भारताकडून पाकिस्तानला कधी उत्तर दिलं जाणार याची प्रतीक्षा होती. अखेर भारतीय सैन्यानं पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ठिकाणांवर एअर स्ट्राईक केले आहेत. 

भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये न जाता दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले आहेत. भारतानं पुन्हा एकदा दहशतवादापुढं झुकणार नसल्याचं दाखवून दिलं आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारतानं जगाला देखील ठाम संदेश दिला आहे. भारताच्या सुरक्षा दलांच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची रडारड सुरु झाली आहे. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?

व्हिडीओ

Rupali Thombare Pune:Ajit Pawar यांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या Mahesh Landgeयांच्यावर ठोंबरे संतापल्या
Sanjay Raut Mumbai: फडणवीसांना आव्हान, 11 लाखांचं बक्षीस; ठाकरें बंधूंच्या सभेआधी संजय राऊत काय काय म्हणाले?
Eknath Shinde Majha Katta :मुंबई,श्रेयवाद,ठाकरे बंधू ते महायुती! एकनाथ शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Aaditya Thackeray Speech Dadar : आदित्य ठाकरेंचं दादरमध्ये दणदणीत भाषण, मुख्यमंत्र्‍यांवर टीका
Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Municipal Election 2026: नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
नाशिकच्या प्रभाग 8 मध्ये जादूटोणा? हळद, कुंकू, तांदूळ आढळल्याने खळबळ, शिवसेनेच्या विलास शिंदेंचा विरोधकांवर गंभीर आरोप
Gold Rate Weekly Update : आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
आठवड्यात सोनं स्वस्त झालं की महाग, चांदी दरातील तेजी सुरुच, जाणून घ्या बाजारात काय घडलं?
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
इरई नदीपात्रात 3 वर्षीय वाघाचा मृतदेह आढळल्याने खळबळ; वन विभाग आले, पोस्टमार्टमसाठी पाठवले
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
श्रेय चोरणारी टोळी सक्रीय झाली, त्यांचं मराठीवरचं प्रेम 'पुतना मावशीचं' आहे, त्यांचा वचननामा म्हणजे फक्त टोमणेनामा, घोटाळेनामा; ठाकरे बंधूंना उद्देशून एकनाथ शिंदे काय काय म्हणाले?
राज ठाकरे म्हणाले मुंबई विमानतळ बंद करुन जागा विकायचा केंद्राचा डाव; प्रकाश महाजनांचं उत्तर अन् टीका
राज ठाकरे म्हणाले मुंबई विमानतळ बंद करुन जागा विकायचा केंद्राचा डाव; प्रकाश महाजनांचं उत्तर अन् टीका
'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल
'प्रभास की जय ' म्हणत चित्रपटगृहात फिरवल्या मगरी.. ; प्रेक्षकांही घाबरले, चाहत्यांचा एकच धुमाकूळ; Video व्हायरल
दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल
दोन महिने हिंदू मुस्लीम करून जुमलानामा जाहीर केला, पण भाजपच्या 2017 च्या जाहीरनाम्यातील पूरमुक्त मुंबई, 11 लाख घरे, आणि छत्रपती शिवराय, बाबासाहेबांच्या स्मारकांचं काय झाले? काँग्रेसचा हल्लाबोल
BMC Election 2026 Mahayuti Manifesto: पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
पाच वर्षांसाठी पाणीपट्टी वाढीला स्थगिती ते लाडक्या बहिणींना बेस्टमध्ये 50 टक्के सवलत; महायुतीकडून मुंबईकरांसाठी घोषणांचा पाऊस
Embed widget