एक्स्प्लोर

24 September In History : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले, 24 सप्टेंबर आहे या घटनांचा साक्षीदार

On This Day In History : 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. 

24 September In History : अंतराळ मोहिमेच्या क्षेत्रात मोठ्या यशाचा आजचा दिवस आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील टोकापर्यंत पोहोचण्याचे भारताचे प्रयत्न गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये यशस्वी झाले नाहित. परंतु हा महिना अंतराळ क्षेत्रात भारताच्या यशासह मैलाचा दगड ठरेल. 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. भारताने आशियातील दोन दिग्गज चीन आणि जपानला मागे टाकले. कारण हे दोन्ही देश त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेत यशस्वी झाले होते.
 
 1726 : ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला 
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना 31 डिसेंबर 1600 मध्ये झाली. ब्रिटनच्या राणीने भारतासोबत व्यापार करण्यासाठी 21 वर्षे दिली होती. नंतर कंपनीने भारतातील जवळजवळ सर्व क्षेत्रांवर आपले लष्करी आणि प्रशासकीय नियंत्रण स्थापित केले. 1858 मध्ये कंपनीचे विलीनीकरण झाले. त्यानंतर भारतावर ब्रिटीश राजवट आली. त्याआधी 24 सप्टेंबर 1726 रोजी ईस्ट इंडिया कंपनीला मुंबई, कलकत्ता आणि मद्रास येथे महानगरपालिका आणि महापौर न्यायालये स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आले. 

1859  : धुंडू पंत उर्फ ​​नाना साहेब यांचे निधन 
नाना साहेबांचा जन्म वेणुग्राम येथील माधवनारायण राव यांच्या घरी 1824 साली झाला. त्यांचे वडील पेशवा बाजीराव द्वितीय यांचे भाऊ होते. पेशव्यांनी नानाराव यांना आपला दत्तक पुत्र म्हणून स्वीकारले आणि त्याच्या शिक्षणाची व दीक्षा घेण्याची पुरेशी व्यवस्था केली. त्यांना हत्ती, घोडा, तलवार आणि बंदुकी कशी चालवायची हे शिकवण्यात आले आणि त्यांना अनेक भाषांचे चांगले ज्ञानही देण्यात आले. 1857 च्या भारतीय स्वातंत्र्याच्या पहिल्या युद्धाचे ते शिल्पकार होते. त्यांचे मूळ नाव धोंडूपंत होते. स्वातंत्र्यलढ्यात नाना साहेबांनी कानपूरमध्ये इंग्रजांविरुद्ध नेतृत्व केले. 

1861 : भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मॅडम भिखाजी रुस्तम कामा यांचा जन्म

भिखाजी रुस्तम कामा किंवा मादाम कामा यांचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे. जेव्हा जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याच्या गाथा गायल्या जातील तेव्हा भिखाजी कामा यांचे नाव येईल. भिखाजी रुस्तम कामा या भारतीय वंशाच्या फ्रेंच नागरिक असल्या तरी भारताच्या स्वातंत्र्यात त्यांचे योगदान कोणत्याही भारतीयापेक्षा कमी नव्हते. भिखाजी रुस्तम कामा यांनी जगातील विविध देशांना भेटी देऊन भारताच्या स्वातंत्र्याच्या बाजूने वातावरण निर्माण करण्याचे काम केले.

 1990 : पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली 
नाटोला विरोध म्हणून सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखालील पूर्व युरोपीय देशांच्या युतीने 1955 मध्ये वॉर्सा करारावर स्वाक्षरी केली. सोव्हिएत युनियन, पोलंड, पूर्व जर्मनी, चेकोस्लोव्हाकिया, हंगेरी, रोमानिया आणि बल्गेरिया या देशांचा यामध्ये समावेश होता.  नाटोमध्ये सामील असलेल्या देशांचा मुकाबला करणे हे त्यांचे मुख्य कार्य होते. परंतु, 24 सप्टेंबर 2004 रोजी पूर्व जर्मनीने वॉर्सा करारातून माघार घेतली. 

 2004 : वादळानंतर हैतीमध्ये आलेल्या पुरात किमान 1,070 लोकांचा मृत्यू झाला 
 हैतीमध्ये 2004 साली आलेल्या वादळामुळे हाहाकार उडाला होता. या वादळानंतर आलेल्या पुरात तब्बल 1,070 जणांना प्राण गमवावे लागले होते. 
 
 2014 : भारताने पहिल्याच प्रयत्नात मंगळावर आपले अंतराळ यान यशस्वीपणे पाठवले 
 24 सप्टेंबर 2014 रोजी भारताने आपल्या पहिल्याच प्रयत्नात आपले अंतराळ यान मंगळाच्या कक्षेत यशस्वीरित्या ठेऊन एक मोठे कार्य पूर्ण केले होते. 24 सप्टेंबर 2014 रोजी मंगळावर पोहोचण्याच्या पहिल्या प्रयत्नात ही कामगिरी करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. भारताने आशियातील दोन दिग्गज चीन आणि जपानला मागे टाकले. कारण हे दोन्ही देश त्यांच्या पहिल्या मंगळ मोहिमेत यशस्वी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Sandeep Deshpande on PM Modi: तुमचं नाटक, व्हिडीओ बस्स झाले; तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर..., संदीप देशपांडेंची पंतप्रधान मोदींवर आगपाखड
तुमचं नाटक, व्हिडीओ बस्स झाले; तुम्ही धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या नाहीतर..., संदीप देशपांडेंची पंतप्रधान मोदींवर आगपाखड
Sonam Wangchuk : ‘धिक्कार आहे अशा देशाचा जिथे असे ...’; उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले, ट्रोलर्सला सुनावलं!
‘धिक्कार आहे अशा देशाचा जिथे असे ...’ उपोषण सोडल्यानंतर होणाऱ्या आरोपांनंतर सोनम वांगचुक संतापले, ट्रोलर्सला सुनावलं!

व्हिडीओ

Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज
Wangchuk Hunger Strike Special Report : उपोषणाची माघार, आंदोलनाचा एल्गार, उपोषण का सोडलं?
CJP Special Report : मीटिंगमध्ये काय ठरलं? राजीनाम्यावरुन अडलं, कॉक्रोच जनता पार्टीत तासभर चर्चा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sonam Wangchuk: सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
सोनम वांगचूक यांचा 'तो' व्हिडीओ व्हायरल, दरवाजा जोरात ढकलला, पोलिसांना म्हणाले, 'तणावामुळे माझा मृत्यू झाला तर...'
CJP Protest Dharmendra Pradhan: धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला नाही तर...; कॉकरोच जनता पार्टीचा 'प्लॅन बी' काय? आशुतोष रांकांनी सगळंच सांगितलं
Salman Khan Instagram Post: 'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
'सलमान खान डर गया...'; 6 पॅक Abs फ्लॉन्ट करत सलमान खानची दमदार पोस्ट; चाहते म्हणाले, 'तुमच्याशी कोण पंगा घेणार'
Raj Thackeray Mumbai Tiranga Morcha: 'कोणी मोर्चाला गालबोट लावायला आलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
'कोणी मोर्चाला गालबोट लावलं तर....'; राज ठाकरेंची तिरंगा मोर्चापूर्वी कडक वॉर्निंग, शिवतीर्थवर तातडीची बैठकही बोलावली
Shabana Azmi Health Update: आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
आधी दम्याचा अटॅक, CJP आंदोलनानंतर 74 वर्षीय दिग्गज अभिनेत्रीला पूर्णपणे बेडरेस्ट, शबाना आझमींना नेमकं काय झालं?
NEET Maharashtra Protetst: दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा! धर्मेंद प्रधानांच्या राजीनाम्यासाठी दिल्लीनंतर आता मुंबईपासून पुण्यापर्यंत अथांग जनसागर रस्त्यावर, हटके अन् खोचक बॅनर्सनी सुद्धा लक्ष वेधलं
Ashadhi Ekadashi 2026 : आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
आषाढी एकादशीच्या दिवशी काय करावं आणि कोणत्या 10 गोष्टी टाळाल? वाचा संपूर्ण माहिती फक्त एका क्लिकवर...
TET paper Case Accused Arrested : टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
टीईटी पेपरफुटी प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई; फरार मुख्य आरोपी बिजेंद्र गुप्ताला बिहारमधून अटक
Embed widget