एक्स्प्लोर

Odisha Train Accident : मृतांची संख्या वाढली, बिहारमधील 17 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू

Odisha Train Accident: बालासोर येथे 2 जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे.

Odisha Train Accident: ओडिशातील (Odisha Train Accident) बालासोर येथे 2 जून झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांचा आकडा वाढला आहे. या अपघातात आत्तापर्यंत 290 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी (16 जून) उपचारादरम्यान बिहारमधील (Bihar) एका मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर मृतांचा आकडा 290 झाला आहे. या अपघातात एक हजाराहून अधिक लोक जखमी झाले होते. 

बिहारमधील रहिवासी असलेल्या 17 वर्षीय प्रकाश रामचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कटक येथील एससीबी मेडिकल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रकाश राम हा देखील शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेसने प्रवास करत होता. त्यावेळी झालेल्या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्यावर शासकीय रुग्णालयातील सर्जरी वॉर्डमध्ये उपचार सुरू होते. 

 प्रकाश रामच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती

रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार प्रकाश रामच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली  होती. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्या डाव्या पायाचा काही भाग गुडघ्याखाली कापण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तो अस्वस्थ होता अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. डॉक्टरांनी तीन दिवसांपूर्वी डाव्या गुडघ्याच्या वरचे दुसरे शवविच्छेदन केले होते. रक्ताच्या संक्रमणानंतर संसर्ग झाला होता. गुरुवारी (15 जून) रात्रीपर्यंत रुग्णाची प्रकृती ठीक होती. तो बोलत होता, खात होता  मात्र शुक्रवारी सकाळी त्याचा अचानक मृत्यू झाला. प्रकाश रामच्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. अद्याप त्याचा तपास सुरू आहे. दरम्यान, मंगळवारनंतर रुग्णालयात मरण पावलेला प्रकाश हा दुसरा व्यक्ती आहे. बिहारमधील बिजय पासवान यांचाही मंगळवारी एससीबी मेडिकल कॉलेज आणि रुग्णालयात मृत्यू झाला होता.

 81 मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही

दरम्यान, भुवनेश्वरमधील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये ठेवण्यात आलेल्या 81 मृतांच्या मृतदेहांची ओळख अद्याप पटलेली नाही. लोक डीएनए चाचणीच्या अहवालाची वाट पाहत आहेत. 78 कुटुंबांनी डीएनए नमुने दिले आहेत.

रेल्वेमंत्री लवकरच बालासोरला भेट देणार 

एएनआय वृत्तसंस्थेन दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हे 21 जून रोजी ओडिशातील बालासोरला भेट देण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांचा दौरा होणार आहे. बालासोर येथील योग कार्यक्रमात सहभागी होण्यासोबतच रेल्वे मंत्री रेल्वे अपघातातील मृतांची काळजी घेणाऱ्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. रेल्वेमंत्री वैष्णव हे कठीण प्रसंगी बचाव कार्यात काम करणाऱ्या डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे आभार मानणार आहेत.

भारतीय रेल्वे हे जगातील सर्वात मोठ रेल्वे नेटवर्क म्हणून ओळखलं जातं. भारतात जगातील सर्वात मोठे रेल्वेचं जाळं पसरलं आहे. भारतीय रेल्वेचा विस्तार देशाच्या कानाकोपऱ्यात पसरला आहे. क्वचितच असा एखादा जिल्हा किंवा गाव असेल, अद्याप रेल्वे पोहोचलेली नाही. भारतात 13,500 हून अधिक रेल्वे गाड्या धावतात. आजही बहुतेक लोक प्रवासासाठी ट्रेनचीच निवड करतात. 

महत्त्वाच्या बातम्या:

ओडिशा अपघातात 3 ट्रेनचा चक्काचूर, किती झालं नुकसान, एक ट्रेन तयार करायला किती खर्च येतो?

महत्त्वाच्या बातम्या

SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
PM Modi Meeting with Shiv Sena MPs: पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
पीएम मोदींची शिवसेनेच्या सात खासदारांसोबत 'ब्रेकफास्ट पे चर्चा', ओमराजे निंबाळकरांच्या 'त्या' गोष्टीची खास विचारपूस; बैठकीतील Inside Story
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Chanakya Niti: तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
तुमच्या घरात शांतता टिकत नाही? घरातील वातावरण बिघडवणारी 5 कारणं, चाणक्यनीती सांगते...
Delimitation Bill: सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
सगळ्या देशाचं लक्ष जेन झी आंदोलनाच्या यशाकडे अन् इकडे मोदी सरकारची मोहीम फत्ते, लोकसभा मतदारसंघ पुर्नरचनेसाठी दोन तृतीयांश मतांची जुळवाजुळव पूर्ण?
Mumbai Pune Expressway Missing Link Accident: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर व्हिडीओ
मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर धडकी भरवणारा भीषण अपघात, कार टेम्पोला धडकली, एकाचा मृत्यू, पाहा भयंकर VIDEO
Raj Thackeray in Nashik press conference: नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले, प्रत्येकाला फक्त आपापल्या कमिशनशी देणंघेणं; राज ठाकरेंची टीका
Embed widget