![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Cyclone Yaas : तोक्ते नंतर आता 'यास' ची धडक, 27 मेपर्यंत पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ येण्याची शक्यता
Cyclone Yaas : बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने येत्या 26-27 मे रोजी 'यास' (Yaas) नावाचे चक्रीवादळ पूर्व किनारी धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे
![Cyclone Yaas : तोक्ते नंतर आता 'यास' ची धडक, 27 मेपर्यंत पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ येण्याची शक्यता New Cyclone Yaas may hit Bengal Odisha next week warns India Meteorological Department Cyclone Yaas : तोक्ते नंतर आता 'यास' ची धडक, 27 मेपर्यंत पूर्व किनारपट्टीवर नवं चक्रीवादळ येण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/05/19/75f6634fb043187d7278db326c7aded1_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : भारताच्या पश्चिमी किनारपट्टीवर तोक्ते चक्रीवादळाने धुमाकुळ घातल्यानंतर आता पूर्वेच्या किनारपट्टीवर आणखी एक चक्रीवादळ धडकणार आहे. अंदमान समुद्र आणि बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरात 22 मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने येत्या 26-27 मे रोजी 'यास' (Yaas) नावाचे चक्रीवादळ पूर्व किनारी धडकणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने बुधवारी दिली आहे. हे चक्रीवादळ 72 तासांपर्यंत असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने सांगितलं की, यास हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे आणि 26 मे पर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये 25 मे पासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. 22 मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होणार असल्याने या चक्रीवादळाची निर्मिती होणार आहे. त्याचवेळी अंदमान सागरात 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहू शकते. ते बंगालच्या खाडीपर्यंत येईपर्यंत 70 किमीची वेग पकडू शकते.
यास या चक्रीवादळाच्या संभाव्यतेमुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.
पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ येऊन गेलं आहे. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वादळापेक्षाही यास ची तीव्रता जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे.
नुकत्याच आलेल्या तोक्ते चक्रीवादळामुळे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मोठं नुकसान झालं आहे, त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)