एक्स्प्लोर

Narendra Modi Speech : भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, थांबणार अन् भारताच्याच उपयोगी येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार

Narendra Modi Speech : राष्ट्र प्रथम हा एकमेव निकष समोर असेल तर देशाचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. गेल्या दशकभरापासून हेच लक्ष्य ठेऊन आम्ही काम करत आहोत असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. 

नवी दिल्ली : विकासाच्या मार्गावर जाण्याचं भारताकडे सामर्थ्य असून देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदा पोहोचण्यासाठी आम्ही काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. या आधी व्होट बँकेचा विचार करुन निर्णय घेतले जात नव्हते. पण आम्ही राष्ट्रहितासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या असंही ते म्हणाले. आधी भारताच्या हक्काचे पाणी भारताला मिळत नव्हते. पण आता भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, थांबणार आणि भारताच्याच उपयोगी येणार असा निर्धार व्यक्त करत नरेंद्र मोदींनी भारताच्या धोरणाची दिशा निश्चित केली. एबीपी नेटवर्कच्या India@2047 परिषद कार्यक्रमात ते बोलत होते. 

Narendra Modi Speech India@2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण 

बदलत्या भारताचे सर्वात मोठं स्वप्न आहे आणि ते म्हणजे 2047 सालापर्यंत विकसित होणं. आपल्याकडे सामर्थ्य, संसाधन आणि इच्छाशक्ती आहे. जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असं विवेकानंद यांनी म्हटलं होतं. आज तिच जिद्द प्रत्येक भारतीयात दिसते. 

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. त्यामध्ये इंडिया यूके फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या आधी ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि इतर देशांसोबतही असा करार करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आज जगासोबत चालत एक लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आहे. 

देशाच्या सामर्थ्यावर आपल्याला भरोसा केला पाहिजे. पण अनेक दशकांपासून या गोष्टी न झाल्यामुळे, मोठे निर्णय न झाल्यामुळे नुकसान झालं. या आधी फक्त सत्ता आणि व्होट बँकचा विचार करण्यात आला. त्यामुळे मोठे निर्णय आणि मोठ्या सुधारणांचा निर्णय घेण्यात आलाच नाही. 

राष्ट्र प्रथम हा एकमेव निकष समोर असेल तर देशाचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. गेल्या दशकभरापासून हेच लक्ष्य ठेऊन आम्ही काम करत आहोत. गेल्या अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत, राजकीय परिस्थितीमुळे जे निर्णय होऊ शकले नाहीत त्यावर आम्ही निर्णय घेतला. 

या आधी बँकांना होणाऱ्या तोट्यासंबंधी कुणीही अक्षर काढत नव्हतं. 2014 पूर्वी भारतातील बँकिंग क्षेत्र हे विस्कळीत झालं होतं. पण आम्ही मोठे निर्णय घेतले, त्यामध्ये सुधारणा केल्या. देशहितामध्ये लहान बँकांचे विलिनीकरण केलं आणि त्यांचे सामर्थ्य वाढवलं. त्यामुळे आज भारतीय बँकिंग व्यवस्था ही जगातील एक बळकट व्यवस्था समजली जाते. 

एअर इंडियाच्या उदाहरणावरुन ही गोष्ट स्पष्ट होते. कायम तोट्यात असलेल्या एअर इंडियावर कोणताही निर्णय होत नव्हता. आम्ही निर्णय घेतला आणि त्यामध्ये मोठा बदल झाला.

या आधी एक रुपया दिल्लीवरून निघाला तर त्यातील केवळ 15 पैसे हेच गरिबापर्यंत पोहोचायचे. आमच्या काळात पूर्ण 100 पैसे हे गरिबांपर्यंत पोहोचतात. या याधी 10 कोटी लोक असे होते की ज्यांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी गरिबांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ घेतला. आमच्या सरकारने या बोगस गरिबांना शोधून काढलं आणि खऱ्या गरिबांना सुविधा दिल्या. त्यामुळे देशाचे साडेतीन लाख कोटी रुपये वाचले. वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. 

मुस्लिम महिलांच्या हितासाठी आम्ही तिहेरी तलाकवर कायदा बनवला. त्याची गरज होती. पण व्होट बँकेवर लक्ष ठेवून आधी निर्णय घेतला गेला नव्हता. आता वक्फ बोर्डच्या नव्या कायद्यानुसारही आम्ही खऱ्या मुस्लिम लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 

आम्ही राज्य सरकारांच्या मदतीने देशभरात नदी जोड प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे लाखो परिवार, शेतकरी यांना त्याचा फायदा झाला. पूर्वी भारताचं हक्काचं पाणी बाहेर जात होतं. पण आता भारताचं पाणी भारताच्या हक्कासाठी रोखलं जाईल आणि भारताच्याच उपयोगात येईल.

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
इराण-इस्रायल युद्धाचा अमेरिकेला मोठा फटका! प्रत्येक दिवशी होतोय 1 अब्ज डॉलर्सचा खर्च, आत्तापर्यंत किती नुकसान? 
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
1 एप्रिलपासून RBI चे नवीन नियम लागू होणार, डिजिटल पेमेंट अधिक सुरक्षित, ऑनलाइन फसवणुकीवर चाप
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
देशात खरचं पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा तुटवडा आहे का? सरकारकडून महत्वाची माहिती जारी, घाबरुन न जाण्याचं आवाहन 
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू
Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

व्हिडीओ

Satara SP Tushar Doshi Compulsory Leave : सक्तीची सुट्टी वादाची मुक्ती? Special Report
Mohit Kamboj Aditya Thackeray : राजकीय खुन्नस ते बर्थडे पार्टी,चर्चांना जोर... Special Report
Ashok Kharat Mobile : मोबाईल 'उघडणार' कोण कोण अडकणार? Special Report
Ashok Kharat and Government Officer : मंत्रालयातले अधिकारी खरातच्या दरबारी? Special Report
Amit Thackeray यांनी घेतली सरवदे कुटुंबाची भेट:मुलांच्या शिक्षणाची घेणार जबाबदारी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market Crash : मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
मार्च महिन्यात भारतीय शेअर बाजार घसरणीचे वारे , गुंतवणूकदारांचे तब्बल 44 लाख कोटी बुडाले, पुढं काय?
Fairness Cream Alert : गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
गोरं होण्यासाठी पाकिस्तानी क्रीम वापरली अन् किडनी खराब, छत्रपती संभाजीनगरमध्ये तीन व्यापारी अटकेत
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची वारा आणि पावसामुळं तारांबळ
जालन्यातील एका लग्नाला अवकाळीचा तडाखा; भोकरदनमध्ये मंडप उडाला, वऱ्हाडी मंडळींची तारांबळ
Credit Score : क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, नेमका काय फायदा होणार?   
क्रेडिट स्कोअर प्रत्येक आठवड्यात अपडेट होणार, नव्या नियमाची लवकरच अंमलबजावणी, काय बदल होणार?
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 30 मार्च 2026 | सोमवार
Iran War Live Update: आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
आजवर कोणत्याच देशाला जमलं नाही ते स्पेननं थेट करून दाखवलं; नाटो सदस्य देश असूनही धमक्यांना न घाबरता ट्रम्प यांच्या वाढत्या मनसुब्यांना उधळून लावणारा तगडा निर्णय
Ebrahim Zolfaghari: मुस्लिम देशांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
अरब राष्ट्रांना अरबीतून, ट्रम्पला इंग्रजीतून अन् इस्रायलला हिब्रूमधून डोळ्यात डोळे घालत जशास तसं प्रत्युत्तर देणारा इराणी जनरल आहे तरी कोण?
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार? जाणून घ्या
PPF, सुकन्या समृद्धी योजनेच्या व्याज दरासंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, नव्या आर्थिक वर्षात किती टक्के व्याज मिळणार?
Embed widget