एक्स्प्लोर

Narendra Modi Speech : भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, थांबणार अन् भारताच्याच उपयोगी येणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा निर्धार

Narendra Modi Speech : राष्ट्र प्रथम हा एकमेव निकष समोर असेल तर देशाचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. गेल्या दशकभरापासून हेच लक्ष्य ठेऊन आम्ही काम करत आहोत असं नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. 

नवी दिल्ली : विकासाच्या मार्गावर जाण्याचं भारताकडे सामर्थ्य असून देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याचा फायदा पोहोचण्यासाठी आम्ही काम करत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) म्हणाले. या आधी व्होट बँकेचा विचार करुन निर्णय घेतले जात नव्हते. पण आम्ही राष्ट्रहितासाठी सर्व आवश्यक गोष्टी केल्या असंही ते म्हणाले. आधी भारताच्या हक्काचे पाणी भारताला मिळत नव्हते. पण आता भारताच्या हक्काचं पाणी हे भारतासाठीच वाहणार, थांबणार आणि भारताच्याच उपयोगी येणार असा निर्धार व्यक्त करत नरेंद्र मोदींनी भारताच्या धोरणाची दिशा निश्चित केली. एबीपी नेटवर्कच्या India@2047 परिषद कार्यक्रमात ते बोलत होते. 

Narendra Modi Speech India@2047 : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भाषण 

बदलत्या भारताचे सर्वात मोठं स्वप्न आहे आणि ते म्हणजे 2047 सालापर्यंत विकसित होणं. आपल्याकडे सामर्थ्य, संसाधन आणि इच्छाशक्ती आहे. जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत थांबू नका असं विवेकानंद यांनी म्हटलं होतं. आज तिच जिद्द प्रत्येक भारतीयात दिसते. 

ब्रिटनच्या पंतप्रधानांसोबत चर्चा झाली. त्यामध्ये इंडिया यूके फ्री ट्रेड अॅग्रीमेंटवर अंतिम निर्णय झाला आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थांसाठी अनेक नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. या आधी ऑस्ट्रेलिया, मॉरिशस आणि इतर देशांसोबतही असा करार करण्यात आला आहे. त्यामुळे भारत आज जगासोबत चालत एक लक्ष्य साध्य करण्याच्या मार्गावर आहे. 

देशाच्या सामर्थ्यावर आपल्याला भरोसा केला पाहिजे. पण अनेक दशकांपासून या गोष्टी न झाल्यामुळे, मोठे निर्णय न झाल्यामुळे नुकसान झालं. या आधी फक्त सत्ता आणि व्होट बँकचा विचार करण्यात आला. त्यामुळे मोठे निर्णय आणि मोठ्या सुधारणांचा निर्णय घेण्यात आलाच नाही. 

राष्ट्र प्रथम हा एकमेव निकष समोर असेल तर देशाचा विकास कुणीही थांबवू शकत नाही. गेल्या दशकभरापासून हेच लक्ष्य ठेऊन आम्ही काम करत आहोत. गेल्या अनेक दशकांपासून ज्या गोष्टी झाल्या नाहीत, राजकीय परिस्थितीमुळे जे निर्णय होऊ शकले नाहीत त्यावर आम्ही निर्णय घेतला. 

या आधी बँकांना होणाऱ्या तोट्यासंबंधी कुणीही अक्षर काढत नव्हतं. 2014 पूर्वी भारतातील बँकिंग क्षेत्र हे विस्कळीत झालं होतं. पण आम्ही मोठे निर्णय घेतले, त्यामध्ये सुधारणा केल्या. देशहितामध्ये लहान बँकांचे विलिनीकरण केलं आणि त्यांचे सामर्थ्य वाढवलं. त्यामुळे आज भारतीय बँकिंग व्यवस्था ही जगातील एक बळकट व्यवस्था समजली जाते. 

एअर इंडियाच्या उदाहरणावरुन ही गोष्ट स्पष्ट होते. कायम तोट्यात असलेल्या एअर इंडियावर कोणताही निर्णय होत नव्हता. आम्ही निर्णय घेतला आणि त्यामध्ये मोठा बदल झाला.

या आधी एक रुपया दिल्लीवरून निघाला तर त्यातील केवळ 15 पैसे हेच गरिबापर्यंत पोहोचायचे. आमच्या काळात पूर्ण 100 पैसे हे गरिबांपर्यंत पोहोचतात. या याधी 10 कोटी लोक असे होते की ज्यांची परिस्थिती चांगली होती, पण त्यांनी गरिबांसाठी असलेल्या सुविधांचा लाभ घेतला. आमच्या सरकारने या बोगस गरिबांना शोधून काढलं आणि खऱ्या गरिबांना सुविधा दिल्या. त्यामुळे देशाचे साडेतीन लाख कोटी रुपये वाचले. वन रँक वन पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्या माध्यमातून सव्वा लाख कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले. 

मुस्लिम महिलांच्या हितासाठी आम्ही तिहेरी तलाकवर कायदा बनवला. त्याची गरज होती. पण व्होट बँकेवर लक्ष ठेवून आधी निर्णय घेतला गेला नव्हता. आता वक्फ बोर्डच्या नव्या कायद्यानुसारही आम्ही खऱ्या मुस्लिम लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. 

आम्ही राज्य सरकारांच्या मदतीने देशभरात नदी जोड प्रकल्प हाती घेतला. त्यामुळे लाखो परिवार, शेतकरी यांना त्याचा फायदा झाला. पूर्वी भारताचं हक्काचं पाणी बाहेर जात होतं. पण आता भारताचं पाणी भारताच्या हक्कासाठी रोखलं जाईल आणि भारताच्याच उपयोगात येईल.

 

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
CJP च्या संसद मोर्चानंतर NEET पेपर लीकवर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले,'युवकांच्या भविष्याशी खेळ खपवून घेणार नाही...'
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Delhi Police Lathicharge: दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
दिल्ली पोलिसांनी मुलीचे कपडे फाडले, छातीवर पाय दिला, गळ्यावर काठ्या मारल्या; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Saamana Article: '....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड
'....तेव्हा 56 इंचवाल्यांची धांदल उडाली', भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचा द्रोह मोदी करतायत, 'सामना'च्या अग्रलेखातून मोदी सरकारवर आगपाखड

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 20 जुलै हा लोकशाहीतील 'डरपोक दिवस' म्हणून साजरा करा; संजय राऊत आक्रमक
Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Crime News: पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
पहिल्या नवऱ्याशी फोनवर बोलल्याचा राग; पतीने थेट पत्नीचं आयुष्य संपवलं, घटनेनं मुंबईत खळबळ
Abhijeet Dipke : जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
जे.पी. नड्डांनी आशुतोष रांका-सौरभ दासला घरी बोलावून घेतलं, मोबाईल काढून हाऊस अरेस्ट, जंतरमंतरवर गोंधळ माजवण्याचा डाव; अभिजीत दिपकेंचा गंभीर आरोप
Maharashtra Rain Updates: पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
पंचगंगेचे पाणी पुन्हा पात्राबाहेर, पुण्यात धरणांचा साठा वाढला, अलमट्टी धरणाबाबत पाटबंधारे विभागाचे कर्नाटक सरकारला तातडीचे पत्र
Maharashtra Government: राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
राज्यातील 6 प्रमुख रुग्णालयांत आता गुजराती संस्थेच्या धर्मशाळा; 1 रुपया भाड्याने कोट्यावधींच्या जमिनी 49 वर्षांसाठी आंदण!
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
Jantar Mantar Delhi Protest LIVE: दिल्लीच्या जंंतरमंतरवर कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाचा 32 वा दिवस, कालच्या लाठीमारानंतर काय घडणार?
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्मच्या आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Chandrashekhar Azad Jantar Mantar Protest CJP: दिल्लीत विद्यार्थ्यांवर पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
दिल्लीत पोलिसांचा बेछूट लाठीमार, चंद्रशेखर आझाद भर पावसात बाबासाहेबांच्या पुतळ्याखाली आंदोलनाला बसले
Embed widget