एक्स्प्लोर
Advertisement
चीनच्या सीमेजवळ भारताचं हेलिकॉप्टर कोसळलं, 7 जणांचा मृत्यू
सकाळी सहाच्या सुमारास Mi-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं. तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे.
इटानगर: अरुणाचलमध्ये वायूदलाचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. यामध्ये सात जवानांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर आहे. अरुणाचल प्रदेशातील तवांगजवळच्या खिरमू परिसरात हा अपघात झाला.
सकाळी सहाच्या सुमारास Mi-17 V5 हे हेलिकॉप्टर कोसळलं.
तांत्रिक बिघाडामुळे हे हेलिकॉप्टर कोसळल्याचं सांगण्यात येत आहे. चीनच्या सीमेपासून अवघ्या 12 किमी अंतरावर ही दुर्घटना घडली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर आहे.
या दुर्घटनेनंतर वायूदलाने तातडीने बचाव पथक घटनास्थळी पाठवलं आहे. हे हेलिकॉप्टर आर्मीसाठी एअर मेंटेनेंस साहित्य घेऊन जात होतं.
‘एमआय १७ व्ही ५’ हे हेलिकॉप्टर हे भारतीय हवाईदलाचा कणा मानलं जातं. रशियन बनावटीच्या या हेलिकॉप्टरचा वापर प्रामुख्यानं लष्करी मोहिमा आणि सैन्याच्या सामानाची ने-आण करण्यासाठी होतो. त्यामुळे आजचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा सध्या तपास सुरू आहे.
Khelo khul ke, sab bhool ke - only on Games Live
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
राजकारण
जळगाव
राजकारण
Advertisement