एक्स्प्लोर

Maratha Reservation | मराठा आरक्षणाच्या केसमधला निकाल 28 राज्यांना प्रभावित करणार : कपिल सिब्बल

देशातील 28 राज्यांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या केसमधला निकाल या सर्व राज्यांना प्रभावित करणारा असेल, असा युक्तीवाद सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांनी केला आहे.

नवी दिल्ली : 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणारं महाराष्ट्र हे काही एकटं राज्य नाही. देशातल्या 28 राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण पोहचलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या या एका केसचा परिणाम या सर्व राज्यांवर होऊ शकतो असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं आहे. महाराष्ट्रासारख्या राज्यात 85 टक्के लोकसंख्या ही मागास प्रवर्गातली आहे. त्यामुळे 50 टक्के आरक्षण मर्यादेचा इथे अडथळा येण्याचं कारण नाही असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रकरणात 50 टक्क्यांच्या मर्यादेचा अडथळा येतो का, हे प्रकरण केंद्राच्या 10 टक्के आर्थिक आरक्षणाच्या प्रमाणेच विस्तारित खंडपीठाकडे जाणं का गरजेचं आहे? याबाबत आज सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तीवाद झाला. याबाबतची सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता शुक्रवारीही चालू राहणार आहे. आज जवळपास तासभर याबाबत अनेक ज्येष्ठ वकिलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात अनेक घटनात्मक मुद्दे समाविष्ट असल्यानं, 50 टक्के आरक्षणाच्या मर्यादेचे प्रश्न असल्यानं ही सुनावणी घटनात्मक खंडपीठासमोर व्हावी असा युक्तीवाद आज सरकारी बाजूनं करण्यात आला. आधी मुकुल रोहतगी आणि नंतर कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली. आरक्षणाला 50 टक्क्यांची मर्यादा इंद्रा साहनी निकालात देण्यात आली होती. पण हा निकाल देताना त्यात काही अपवादांचाही उल्लेख झाला होता. मराठा आरक्षणाच्या केसमध्ये एका निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल दिला गेला आहे. त्याच्या आधारे हा निर्णय झाला असं मुकुल रोहतगी यांनी कोर्टाला सांगितलं. शिवाय केंद्र सरकारनं 10 टक्के आरक्षणाचा निर्णय मागच्या वर्षी घेतला आहे. त्यामुळेही अनेक राज्यांमध्ये 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेली आहे. महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचे हे निर्णय एकमेकांत गुंतलेले असल्यानं या प्रकरणात घटनात्मक घटनापीठाची गरज असल्याचं रोहतगी म्हणाले. मराठा आरक्षण 11 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे जायला हवं, सिब्बल यांचा युक्तिवाद; पुढील सुनावणी 28 ऑगस्टला तसंच इंद्रा साहनी प्रकरणातला निर्णय 9 न्यायमूर्तींच्या खंडपीठानं दिला होता. त्यामुळे त्यातल्या मुद्यांवर या प्रकरणात चर्चा होणार असल्यानं त्यापेक्षा अधिक म्हणजे 11 न्यायमूर्तींचं खंडपीठ या प्रकरणात असावं अशी मागणी कपिल सिब्बल यांनी केली. 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडणारं महाराष्ट्र हे काही एकटं राज्य नाही. देशातल्या 28 राज्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा आरक्षण पोहचलं आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या या एका केसचा परिणाम या सर्व राज्यांवर होऊ शकतो असंही सिब्बल यांनी कोर्टाला सांगितलं. महाराष्ट्रासारख्या राज्यात 85 टक्के लोकसंख्या ही मागास प्रवर्गातली आहे. त्यामुळे 50 टक्के आरक्षण मर्यादेचा इथे अडथळा येण्याचं कारण नाही असंही त्यांनी कोर्टाला सांगितलं. कुठल्या जातींना आरक्षण द्यायला हवं याची यादी केंद्राकडे राज्यातूनच जाते. आणि जर राज्य एखाद्या घटनात्मक मार्गानं नव्या जातींना आरक्षण देत असेल तर त्याला अवैध का ठरवलं जातं हा सवालही कपिल सिब्बल यांनी कोर्टात उपस्थित केला. हा विरोधाभास असल्याचंही ते म्हणाले. या प्रकरणातले आणखी एक याचिकाकर्ते विनोद पाटील यांच्या वतीनं ज्येष्ठ वकील नरसिंहा यांनीही याच मुद्दयावर युक्तीवाद केला. 50 टक्क्यांची मर्यादा आरक्षण प्रकरणात वारंवार उल्लेखित होते. पण त्याला कुठल्या तत्वाचा आधार आहे, ते केवळ बॅलन्स म्हणून सांगितलं गेलं, अनेक सामाजिक, आर्थिक प्रश्न नव्यानं निर्माण होत असताना त्याची फेररचना करणं गरजेचं असल्याचं नरसिंहा यांनी म्हटलं. या संदर्भातली उर्वरित सुनावणी परवा म्हणजे शुक्रवाारीही होणार आहे. Maratha Reservation | मराठा आरक्षणासंदर्भात 28 ऑगस्टला पुढील सुनावणी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा :16 June 2024 : ABP MajhaIce Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!Kolhapur  Accident CCTV : यू टर्न घेणाऱ्या रिक्षाला दुचाकीची धडक, जीवितहानी नाही मात्र दोघे जखमीTop 50 : टॉप 50 बातम्यांचं अर्धशतक राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा : 16 June 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
T20 World Cup 2024 : बाबर-शाहीनमध्ये दुरावा, एकमेंकाशी बोलतही नाहीत, पाकिस्तान संघाबाबत धक्कादायक खुलासा! 
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
हिंदुत्ववादी संघटनांकडून त्र्यंबकेश्वरमध्ये प्रसाद शुद्धीकरणासाठी 'ओम प्रमाणपत्र', अंनिसचा विरोध, वाद पेटणार?
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
तुम्ही 500 पार जरी गेला असतात, तरी...; टी राजाच्या वक्तव्यावरुन मिटकरींचा पलटवार, राष्ट्रवादी-भाजप आमने सामने
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
राहुल गांधीं जबाबदारीपासून का पळत आहेत?
Lok Sabha Result 2024: रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडील मोबाईल फोन EVM मशीनला कनेक्ट, धक्कादायक दाव्याने एकच खळबळ
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
गुगल मॅपचा भरोसा नाय काय, संभाजीनगरमध्ये UPSC परीक्षेपासून 50 विद्यार्थी वंचित; मुलींच्या डोळ्यात अश्रू
Sangli News : कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
कन्नड शाळेत मराठी माध्यमाच्या शिक्षकांची नियुक्ती; सांगली जिल्हा परिषदेचा अजब कारभार
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
प्रकाश शेंडगे म्हणाले, त्यांचे आमदार 'चुन चुन के गिरायेंगे'; मनोज जरांगे म्हणतात, त्यांना विरोधक मानेल तेव्हा...
Embed widget