एक्स्प्लोर

Manipur Violence : केंद्राने मनात आणलं असतं तर तीन दिवसात मणिपूरचा प्रश्न सुटला असता.., मणिपूरचा मराठी माणूस सांगतोय ग्राऊंड रिपोर्ट

Manipur Ground Report : मणिपूरचा हिंसाचार हा सुनियोजित असून म्यानमारमधून आलेल्या लोकांमुळे मणिपूर अस्वस्थ असल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं.

Manipur Violence : केंद्राच्या मनात आलं असतं तर मणिपूरचा प्रश्न तीन दिवसात सुटला असता, पण केंद्राने तसं केलं नाही, राज्यानेही केंद्राचीच भूमिका कायम ठेवली... हा आरोप केलाय मणिपूरमधील मराठी माणसाने. मणिपूर हिंसाचार ज्यांनी जवळून पाहिलाय ते जीवन अभिराम लिंगथो उर्फ जीवन सिंह यांनी एपीबी माझाशी बोलताना सांगितलं की, या ठिकाणचा हिंसाचार हा सुनियोजित आहे. 

जीवन सिंह यांनी 20 वर्षे पुण्यामध्ये वास्तव्य केलं. त्यामुळे ते उत्तम मराठी बोलतात. मणिपूरमध्ये हिंसाचार झाल्यानंतर त्यांनी त्या ठिकाणचा ग्राऊंड रिपोर्ट सांगितला. 

कुकी लोकांनी मैतेई लोकांवर अत्याचार केल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. एका खोलीत अनेकांना बंद केलं आणि त्या खोलीत मिर्च्या जाळून त्यांना ठार करण्यात आल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. अनेकांची घरं जाळण्यात आली. घरातून कुठे पळायचं हे अनेक महिलांना सूचलं नाही. त्यामध्ये अनेक गरोदर महिलांचा समावेश होता. 

मणिपूर हिंसाचारानंतर त्यातून वाचलेल्या नागरिकांची रिलिफ कॅंपमध्ये सोय करण्यात आली आहे. त्यामध्ये 32 नवजात बालके आहेत, जी काहीच दिवसांपूर्वी जन्मलेली आहेत. याविषयी बोलताना जीवन सिंह म्हणाले की, या ठिकाणी असलेल्या अनेक जणांची घरं जाळण्यात आली, त्यांनी भीतीने घाबरून घर सोडलं. या ठिकाणी अनेक महिला आणि त्यांची मुलं आश्रयाला आहेत. या ठिकाणी असलेल्या महिलांचे पती एक तर गावीच स्वतःच्या घरांच्या रक्षणासाठी थांबले आहेत किंवा इतर ठिकाणी कँपमध्ये आहेत. 

मणिपूरची लोकं ही सर्वांना सामावून घेणारी आहेत असं सांगत ते म्हणाले की, मणिपूरमध्ये सध्या असलेला तणाव हा म्यानमारमधून आलेल्या लोकांमुळे निर्माण झाला आहे. मणिपूर सरकार आता कमकुवत झालं आहे, आता सर्व काही देवावर असून त्याच्याकडे नजरा लावून बसलो आहे. केंद्र सरकारने मनात आणलं असतं तर तीन दिवसात हा प्रश्न संपवला असता पण त्यांनी तसं केलं नाही आणि राज्य सरकारने केंद्राची भूमिका सुरू ठेवून हा प्रश्न मिटवला नाही. 

मणिपूरची लोकसंख्या ही 28 लाख इतकी आहे. त्यामध्ये 60 टक्के लोकसंख्या ही मैतेई समूदायाची आहे. त्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण हे अधिक आहे. कुकी आणि नागा लोकं ही बहुतांशी ख्रिश्चन आहेत आणि मैतेई लोकं ही हिंदू समूदायाची आहेत. त्यांच्यातील हा वाद असल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. या ठिकाणची भूमी ही जवळपास 91 टक्के पर्वतीय आहे, उर्वरित भाग हा दऱ्यांचा आहे. या 9 टक्के जागेवर जास्तीत जास्त मणिपुरी लोक राहतात. 

मणिपूर दंगलीमुळे या ठिकाणच्या मुलांचं शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्याचं जीवन सिंह यांनी सांगितलं. रिलीफ कँपमध्ये किंवा त्याच्या जवळपास त्यांच्या शिक्षणाची सोय तात्पुरत्या स्वरुपात केली आहे. या ठिकाणी नीटची तयारी करत असलेली मुलगी ही 6 जूनपासून गायब आहे. ती कुठे गेली, तिचं काय झालं हे अद्याप कुणालाही माहिती नाही. 

ही बातमी वाचा: 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर

व्हिडीओ

Special Report Voting And Fighting : व्होटिंग आणि राजकीय फायटींग, अनेक वॉर्डात बाचाबाची प्रसंग
Special Report Orange Guard :ठाकरे बंधू दक्ष,भगवा गार्डचं लक्ष,मतदान केंद्रावर पोलिसांबरोबर बाचाबाची
BMC Election Exit Poll : मुंबईत भाजप आणि शिवसेनेला 138 जागा मिळणार- एक्झिट पोलचा अंदाज
Uddhav Thackeray Full PC : बाईचं नाव रविंद्र असतं का? लोकशाही पुसली जातेय; मतदानानंतर ठाकरेंचा घणाघात
Akola Voting : अकोल्यात बुरखाधारी महिलांची तपासणी न करता सोडलं जातंय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC Bogus Voter : कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
कॅमेऱ्यासमोरच दुबार मतदान? निवडणूक अधिकाऱ्यांची 'चुप्पी', धारावीतील प्रकार एबीपी माझाच्या कॅमेरात कैद
BMC Exit Poll : मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
मनसेला 6 जागा, तर शिंदेंच्या शिवसेनेला 54; मुंबईकरांची झोप उडवणारा एक्झिट पोल समोर
BMC Exit Poll : ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
ठाकरेंच्या 25 वर्षांच्या सत्तेला भाजपचा सुरुंग? मुंबईचा सर्वात धक्कादायक एक्झिट पोल समोर
Team India : टीम इंडियाला आणखी एक धक्का,तिलक वर्मानंतर वॉशिंग्टन सुंदर न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर, T20 वर्ल्ड कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह
टीम इंडियाला धक्का,तिलक वर्मानंतर आणखी एक खेळाडू न्यूझीलंड विरूद्धच्या टी 20 मालिकेतून बाहेर
Pune Exit Poll: पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
पुण्यात अजित पवारांना 'दे धक्का', महापालिकेत भाजपची सत्ता? प्राबच्या एक्झिट पोलनुसार कोणाला किती जागा?
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
समुद्र सीमेवर भारताच्या हद्दीत पाकिस्तानची अल मदीना बोट, 9 जण ताब्यात; सुरक्षा यंत्रणा अलर्ट
Shankar Jagtap : शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
शंकर जगतापांचा अश्विनी जगतापांवर पलट'वार'! गृहकलहाने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
मतदान केंद्रावर कोब्रा सापाचा थरार; पोलीस धावला, मतदारांच्या भुवया उंचावल्या, गर्दीतून सुखरूप पकडला
Embed widget