एक्स्प्लोर

Manipur Violence: मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांकडून गेल्या चार दिवसांत 40 संशयित दहशतवाद्यांचा खात्मा; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

मारले गेलेले कुकी अतिरेकी गटातील संशयित 40 सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी इंफाळमध्ये दिली. कारवाई सुरुच असून मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो.

Manipur Violence: गेल्या अनेक दिवसांपासून हिंसाचाराने होरपळून निघत असलेल्या मणिपूरमध्ये सुरक्षा दल आणि पोलिसांनी गेल्या चार दिवसांपासून केलेल्या कारवाईत 40 जणांचा खात्मा करण्यात आला आहे. मारले गेलेले कुकी अतिरेकी गटातील संशयित 40 सशस्त्र दहशतवादी असल्याची माहिती मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह यांनी इंफाळमध्ये दिली. राज्य सरकारच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार सशस्त्र अतिरेक्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरुच असून मृतांचा आकडा अजूनही वाढू शकतो.

मणिपूरमध्ये नव्याने हिंसाचार 

मणिपूरमध्ये शनिवारी रात्रीपासून अनेक ठिकाणी झालेल्या ताज्या हिंसाचारात चार नागरिक आणि एक निमलष्करी जवान ठार झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

मुख्यमंत्री काय म्हणाले?

मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी सांगितले की, मणिपूर पोलिसांकडून हिंसाचारग्रस्त भागात कारवाई केली जात आहे. नागरिकांविरोधात अत्याधुनिक शस्त्रे वापरणाऱ्या या दहशतवादी गटांविरुद्ध प्रत्युत्तरादाखल कारवाई केली जात आहे.  कारवायांमध्ये, विविध भागात सुमारे 40 दहशतवादी मारले गेले आहेत आणि काहींना सुरक्षा दलांनी अटक केली आहे. नव्याने उफाळून आलेला हिंसाचार दोन समुदायांमधील नसून मणिपूरचे विघटन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सशस्त्र दहशतवाद्यांमधील असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की ही कारवाई कुकी अतिरेकी गटांविरुद्ध आहे ज्यांनी ऑगस्ट 2008 मध्ये केंद्र आणि राज्य सरकारसोबत सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स (एसओओ) करार केला होता.

25 कुकी अतिरेकी गटांसोबत करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. (त्यामधील 17 कुकी नॅशनल ऑर्गनायझेशनच्या अंतर्गत आहेत आणि आठ युनायटेड पीपल्स फ्रंट अंतर्गत आहेत) केलेल्या करारानुसार, या गटांच्या कार्यकर्त्यांना नेमलेल्या परिसरात बंदिस्त करून त्यांची शस्त्र बंदिस्त ठेवण्यात आली होती. 

हिंसाचारावरून आरोप प्रत्यारोप

मणिपूरमध्ये हिंसाचार पसरवण्यात सस्पेंशन ऑफ ऑपरेशन्स गटातील अतिरेकी सहभागी होऊ शकतात, असा आरोप राज्य सरकारने केला आहे. दुसरीकडे, कुकी गटांकडून या हिंसाचारासाठी दोन कट्टरपंथी गट अरामबाई टेंगगोल आणि मेईतेई समुदायाच्या मीतेई लीपुन यांना जबाबदार धरण्यात आले आहे. 

3 मे पासून मणिपुरात हिंसाचाराचा आगडोंब 

दुसरीकडे, 3 मे रोजी कुकी आणि मेईतेई समुदायांमध्ये सुरू झालेल्या जातीय संघर्षाला 53 टक्के लोकसंख्येचा समावेश असलेल्या माजी मणिपूरच्या प्रबळ समुदायाला अनुसूचित जमातीचा (ST) दर्जा देण्यास विरोध केल्यावर सुरू झाला. हिंसक संघर्षात आतापर्यंत 74 जणांचा मृत्यू झाला आहे, जवळपास 300 जखमी झाले आहेत आणि 30,000 हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. राज्याच्या बहुतांश भागात कर्फ्यूला काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली आहे आणि गेल्या 25 दिवसांपासून सर्व इंटरनेट सेवा बंद आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Pawar on Rajesh Mehta Scam: मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
मेहताच्या कंपनीत LIC ने गुंतवणूक केलीच कशी? 15 लाख कोटींचा घोटाळा अन् रोहित पवारांच्या 'त्या' ट्विटने खळबळ
India Natural Gas Discovery: मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
मोठी बातमी! अंदमानच्या समुद्रात सापडला नैसर्गिक वायूचा मोठा साठा; इंधन टंचाईच्या सावटावर भारताला जॅकपॉट 
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
20 जूनपर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचं रखडलेलं काम पूर्ण करणार, गडकरींचं आश्वासन, काँग्रेसच्या माजी खासदारानं घेतली भेट
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम

व्हिडीओ

Rahul Gandhi scuba dives in Nicobar : राहुल गांधी यांचं ग्रेट निकोबार बेटात स्कुबा डायव्हिंग
Maharashtra Politics : शिरसाट-सत्तार आणि पटोले-पटेलांमध्ये कनेक्शन काय? भेटीच्या चर्चा | Special Report
MLC Election Drama: 8 MVA उमेदवारांची माघार; लक्ष्मी दर्शन आरोपांमुळे राजकारण तापलं | Special Report
Konkan Politics : बाळ मानेंच्या माघारीनंतर हकालपट्टी; भाजप प्रवेशाच्या चर्चांना वेग | ABP Majha
Dhairyasheel Mohite Solapur : उत्तमराव जानकर म्हणाले, केसांनी गळा कापला; धैर्यशील मोहितेंचं उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Koyna Dam: उघडे पडलेले डोंगर, मागे सरकलेलं पाणी... कोयना धरणाचे हादरवणारे फोटो
Shivrajyabhishek Din Sohala 2026: धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
धनी छत्रपती जाहले! किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखों शिवभक्तांची मांदियाळी, Photos
Monsoon Update Maharashtra: मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर! राज्याच्या दक्षिण किनारपट्टीकडे वेगाने वाटचाल; येत्या 48 तासांत ...; हवामान विभागाचा अंदाज
Rajya Sabha Election 2026 Chhagan Bhujbal: सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपच्या चरणी विलीन झाल्याचा संदेश जाईल: रोहित पवार
सुनेत्रा पवारांच्या जागी राज्यसभेवर भुजबळांना संधी द्या, अन्यथा राष्ट्रवादी भाजपला शरण गेल्याचा समज होईल: रोहित पवार
Mumbai News : मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
मुंबईतील फेरीवाल्यांच्या QR ओळखपत्रांवरून महायुतीतच जुंपली; भाजपकडून राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत प्रक्रियेवर हरकत, तर शिवसेनेचा ठाम पाठिंबा
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Maharashtra Breaking LIVE: अभिजीत दीपकेंनी भारतात पाऊल ठेवलं, दिल्ली विमानतळावर दाखल
Tamil Nadu BJP Crisis: अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
अण्णामलाईंच्या राजीनाम्यानंतर तमिळनाडू भाजपत भगदाड; उपाध्यक्ष सचिवांसह 15 जणांचा पक्षाला रामराम
Cockroach Janta Party: कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
कॉकरोच पार्टीने आंदोलनासाठी परवानगी मागितली की नाही? किती हजार पोलिस तैनात अन् विमानतळापासून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर काय होणार??
Embed widget