Jammu Kashmir News : गेल्या काही दिवसांत अल्पसंख्यांक असलेल्या काश्मिरी पंडितांवर केल्या जाणाऱ्या  दहशतवादी हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या खोऱ्यातील काश्मिरी पंडितांनी आपल्या कुटुंबासोबत स्थलांतर करण्याला प्राधान्य दिलं आहे. सोमवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात एका काश्मिरी पंडिताच्या दुकानात काम करणाऱ्या सेल्समनची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. 


अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार,  दहशतवाद्यांनी बांदिपुरा जिल्ह्याीतील रहिवासी मोहम्मद इब्राहिम यांना बोहरी कदल येथे रात्री 8 वाजता गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. गोळी मारल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु   डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी या परिसरात नाकाबंदी केली. जम्मू काश्मिर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.


Jammu Kashmir : काश्मिरातील दहशतवादी हल्लाने भीतीचे वातावरण, काश्मिरी पंडितांचे पुन्हा स्थलांतरण सुरु


सेल्समनच्या हत्येनंतर जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री  आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांनी घटनेचा निषेध केला. ते म्हणाले,  "इब्राहिमची हत्या ही निषेधार्य आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो." गेल्या काही आठवड्यात जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेत वाढ झालेली आहे. रविवारी (7 नोव्हेंबर) बटमालू परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कॉन्स्टेबलची हत्या केली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार  रविवारी रात्री 8 वाजता दहशतवाद्यांनी जम्मू काश्मिर पोलिसचे कॉन्स्टेूल तौसीफ अहमद यांच्या बटमालू येथील एसडी कॉलनी परिसरात गोळी झाडली.


ऑक्टोबर महिन्यात दहशतवादी हल्ल्यात तब्बल 12 जवान शहिद झाले तर 13 नागरिकांची हत्या करण्यात आली. यामध्ये व्यावसायिक, कामगार आणि शिक्षकांचा समावेश आहे. तर जवानांनी 20 दहशतवाद्यांची हत्या केली. 


जम्मू काश्मीरच्या पुंछ सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अधिकाऱ्यासह 4 जवान शहीद


नव्वदच्या दशकात दहशतवाद्यांच्या हल्ल्यांमुळे पळून गेलेल्या काश्मिरी पंडितांच्या या भागातील पुर्नवसनासाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या आहेत. त्यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार करुन सरकारी नोकरीही देण्यात आली. पण अलिकडच्या काही घटनांवरुन असं लक्षात येतंय की पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांनी लक्ष्य केलं आहे, त्यांना ठार मारलं जात आहे. जानेवारी महिन्यापासून आतापर्यंत या ठिकाणी 25 काश्मिरी नागरिकांची हत्या करण्यात आली आहे.