एक्स्प्लोर

India Weather : देशात तापमानाचा पारा वाढणार, हवामान विभागाचा इशारा; दिल्लीत 122 वर्षानंतर मे महिन्यात तापमानात घट

India Weather : येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवला आहे.

India Weather : सध्या देशातील तापमानात (temperature) सातत्यानं चढ उतार होत आहे. कुठे अवकाळी पाऊस तर कुठे उन्हाचा चटका जाणवत आहेत. या बदलत्या वातावरणाचा शेती पिकांना मोठा फटका बसत असल्याचं चित्र दिसत आहे. दरम्यान, यावर्षी मे महिन्यात देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी धुक्याची हलकी चादर पसरल्याचे चित्र दिसले. उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळी वातावरण पाहायला मिळत आहे. सध्या देशातील अनेक भागात तापमानात घट नोंदवण्यात आली आहे. दरम्यान, आता येत्या काही दिवसात तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानं (IMD) वर्तवला आहे.

उत्तर पश्चिम भारतात पुढील तीन दिवसांत तापमान 4 ते 6 अंशांनी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या महिन्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी आणि धुक्यासारखी स्थिती दिसून आली आहे. पुढील पाच दिवस भारताच्या बहुतांश भागात तापमानात वाढ होणार असली तरी उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती येण्याची शक्यता नसल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.

डोंगराळ राज्यांमध्ये तापमानात वाढ

देशातील डोंगराळ राज्यांमध्ये तापमानात वाढ झाली असल्याची माहिती भारतीय हवामान खात्यानं दिली आहे.  गुरुवारी हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या तापमानात 4 ते 7 अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. पुढील पाच दिवसांत मध्य भारतात कमाल तापमानात 4 ते 6 अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर पुढील 24 तासांत पूर्व भारतात कमाल तापमानात कोणताही विशेष बदल होणार नाही. त्यानंतर 3 ते 5 अंशांची वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पश्चिम भारतातही पुढील दोन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होण्याची शक्यता नाही, मात्र त्यानंतर तापमानात 2 ते 4 अंशांची वाढ अपेक्षित आहे.

122 वर्षांनंतर दिल्लीत मे महिन्यात वातावरणात एवढा बदल 

तब्बल 122 वर्षानंतर दिल्लीत मे महिन्यात तापमानात एवढी घट झाल्याचे दिसून आले. यापूर्वी 1901 मध्ये मे महिन्यात एवढ्या कमी तापमानाची नोंद झाली होती. गुरुवारी सकाळी दिल्लीतील किमान तापमान 15.8 अंशांवर नोंदवले गेले. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, 1901 नंतर मे महिन्यातील ही तिसरी सर्वात थंड सकाळ होती.

अनेक ठिकाणी धुक्याची चादर 

जास्त आर्द्रता, शांत वारा आणि दिवसा आणि रात्रीच्या तापमानात मोठा फरक यामुळे धुके पडत असल्याचे भारतीय हवामान विभागानं म्हटलं आहे. धुके तयार होण्यासाठी ही अनुकूल परिस्थिती आहे. मे महिन्यातील कडाक्याच्या उन्हाची सवय झालेल्या दिल्लीतील जनतेला हवामानातील बदलामुळे आश्चर्याचा धक्का बसला. हवामानाच्या या बदलाबद्दल लोकांनी सोशल मीडियावर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Monsoon 2026: आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
आनंदवार्ता! येत्या 48 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार; हवामानात मोठे बदल, महाराष्ट्रासह 'या' राज्यात जोर'धार' कोसळणार
Social Media Influencer Found Dead: प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून हुंड्यासाठी छळ? लग्नाच्या दीड वर्षांतच बायकोचा संशयास्पद शेवट, स्कॉर्पिओसाठी छळ केल्याचा आरोप
प्रसिद्ध इन्फ्लुएन्सरकडून हुंड्यासाठी छळ? लग्नाच्या दीड वर्षांतच बायकोचा संशयास्पद शेवट, स्कॉर्पिओसाठी छळ केल्याचा आरोप

व्हिडीओ

Girish Mahajan Jalgaon : राऊत, वडेट्टीवार बोल बच्चन नेते, त्यांनी निवडणूक लढवून दाखवावी
Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार
Dilip Walse Patil Pimpari : विलास लांडेंच्या घरी दिलीप वळसे पाटील, नाराजांची मनधरणी होणार?
Shiv Sena Merger Talks : दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? चर्चांना नवं इंधन | ABP Majha
Vidhan Parishad Election 2026 : अर्जाच्या शेवटच्या दिवशी बंडखोरीचा स्फोट, महायुती-मविआत धुसफूस! | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Surat Bardoli Bus Accident : जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
जोरदार धडकेनंतर बस पलटली अन् आग लागली, सात जणांचा होरपळून मृत्यू, ST महामंडळाच्या दोन बसचा भीषण अपघात
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
महामंडळाच्या दोन बसची गुजरातमध्ये धडक; 7 जणांचा मृत्यू; काळीज पिळवटून टाकणारी घटना, भयानक फोटो
Beed Crime : घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
घरासमोर लघुशंका आणि जुगाराला विरोध, महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण; बीडमध्ये वाल्मिक कराडच्या गुंडांची दहशत कायम
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
ठाकरेंच्या शिवसेना मेळाव्याला खासदार अनुपस्थित; चंद्रकांत खैरेंनी सुनावलं, म्हणाले, त्यांनी कुठेही जाऊ नये, बाकी...
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
धक्कादायक! अमरावतीत युवतीचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला, पोलीस घटनास्थळी दाखल 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जून 2026 | मंगळवार
Ramdas Athawale : सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
सहज उपलब्ध होणारी हातभट्टीची दारू अधिकृत करा, शासनाला महसूल मिळेल : रामदास आठवले
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
1200 एकरवर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारणार, निर्यात व्यवस्था बळकट करणार : जयकुमार रावल
Embed widget