एक्स्प्लोर

India Vs Pakistan War Mock Drill : मॉकड्रील म्हणजे काय, 5 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या, सराव कसा करणार? जाणून घ्या A टू Z माहिती

India Vs Pakistan War Mock Drill : केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे.

India Vs Pakistan War Mock Drill : केंद्र सरकारने (Central Government) संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी आणि पाकिस्तान सोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीमध्ये देशाच्या प्रत्येक नागरिकाला एका सैनिकासारखं सावध बनवण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल. यापूर्वी 1971 च्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रील झाली होती. त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही. त्यामुळे भारत खरंच पाकिस्तान (India vs Pakistan) सोबत पूर्ण युद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मॉक ड्रील म्हणजे काय? त्यात नेमके काय होणार? ती कशी होणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन (Abhay Patwardhan) एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. 

संरक्षण तज्ञ कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की, मॉक ड्रिलमध्ये गृह मंत्रालयाने पाच गोष्टी करायला सांगितलेल्या आहेत. त्यात हवाई हल्ला झाल्यास सायरन वाजवून लोकांना अलर्ट करणे. रात्रीच्या वेळी सायरन वाजला तर ब्लॅकआऊट कसे करायचे? हल्ला झाल्यास पडझड झाली आणि काही दुखापती झाल्या तर त्यांना उपचार कसे करायचे किंवा दुखापतग्रस्तांची सेवा कशी करायची? त्यात विद्यार्थी नगरसेवक आणि एनसीसीचे छात्र यांचा सहभाग कसा असला पाहिजे? महत्त्वाच्या स्थापत्यांनाच लपवण्याची प्रक्रिया आणि हल्ला झाल्यास नागरिकांची तातडीने स्थलांतर प्रक्रिया व त्याचा सराव, याप्रमाणे काही निर्देश देण्यात आले असून त्याची मॉक ड्रील करण्यात येणार आहे, असे त्यांनी म्हटले.  

पाकिस्तानच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक राज्यात मॉक ड्रील आवश्यक

देशात अशा पद्धतीचे मॉक ड्रील 1971 च्या युद्धानंतर पहिल्यांदाच होत आहे. याबाबत विचारले असता कर्नल अभय पटवर्धन म्हणाले की, 1984 साली आम्ही अमृतसर येथे मॉक ड्रील केली होती. पण हे जे काही मॉडेल आहे हे आपल्या सुरक्षेसाठी असतं. हे त्या राज्यांसाठी आहे जे सीमावर्ती राज्य आहे.आजच्या युगात बॉम्बिंग हे कुठेही होते. त्यामुळे पाकिस्तानच्या परिघात येणाऱ्या प्रत्येक राज्यात मॉक ड्रील करणे आवश्यक आहे. नागरिकांनी स्वतःला कसे वाचवायचे हे अजून नागरिकांना माहिती नाही. त्यामुळे सरकारने उचललेले हे पाहून अत्यंत स्तुत्य आहे, असे त्यांनी म्हटले.  

सरकारने लोकांना सुरक्षिततेबाबत सांगायला हवं

सरकारने उचललेले पाऊल हे अनेकांना सावध करणारे आहे. मात्र अनेक जणांच्या मनात तणाव देखील निर्माण होऊ शकतो. याबाबत विचारले असता त्याचा उलट प्रभाव देखील होऊ शकतो. तसे झाले नाही तर त्याची खिल्ली देखील उडवली जाऊ शकते किंवा लोक म्हणतील उगीचच आमच्याकडून हे काय करून घेता. काही लोक म्हणतील आम्ही प्रॅक्टिस करत आहे. त्यामुळे आमच्या शहरावर हल्ला होणारच आहे. त्यामुळे नागरिक भीतीत राहतील. पाकिस्तानमधील लोक अन्नधान्याचा साठा करत आहेत, तसं आपल्या येथे सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यावेळेस ही प्रॅक्टिस होईल त्यावेळी सरकारने लोकांना सांगायला हवे की, हे तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे, असे अभय पटवर्धन यांनी सांगितले आहे. 

आणखी वाचा 

Pahalgam Terror Attack: चीनने पुन्हा रंग दाखवला, पाकिस्तानला पाठिंबा दिला; भारताचा जुना मित्र मदतीला धावला, जगातील कोणते देश कोणाच्या बाजूने?

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Maharashtra Live News Updates: संसदेचं पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; गृहमंत्री अमित शाह विरोधकांच्या रडारवर
Supreme Court: आंदोलनातील पोलिसांच्या अत्याचाराचे समर्थन करता येणार नाही, लाठीमाराची चौकशी झाली पाहिजे: सर्वोच्च न्यायालय
आधी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, आता दिल्ली पोलिसांनाही हिशेब द्यावा लागणार, सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Dharmendra Pradhan Education Minister: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, 'या' तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा पडताच वात पेटली, वणवा पसरला, 'या' तीन राज्यांमध्ये शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut On E20 Janta Party: कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
कॉकरोच जनता पार्टीनंतर आता E 20 पार्टीची स्थापना; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Devendra Fadnavis and Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस कितीही नाही म्हणाले तरी मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
देवेंद्र फडणवीस 100 टक्के दिल्लीत जाणार, मोदी-शाहांचा आदेश आल्यावर त्यांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल: संजय राऊत
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
पोरांपोरींना रस्त्यावर पाडून सोलून काढल्यानंतर दिल्ली पोलिस आता पीएम मोदींविरोधातील पोस्ट, व्हिडिओ आणि कमेंट्स काढून टाकण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना नोटीस पाठवणार
High Court: मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
मोठी बातमी! केवळ भाषिक उल्लेखांमुळे आदिवासी ओळख बदलत नाही; मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Sub Classification Maharashtra: महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
महाराष्ट्रात साडेतीन टक्केवाल्यांचे राज्य, सरकारने अनुसचित जातीच्या आरक्षणात ढवळाढवळ करु नये: आनंदराज आंबेडकर
E20 Janta Party: E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
E20 जनता पार्टीची स्थापना कोणी केली, प्रमुख मागण्या कोणत्या?; A टू Z माहिती
Kanpur News : ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
ओळखलंत का मला? मी तुमची पहिली पत्नी.., दुसऱ्या लग्नासाठी बोहल्यावर चढणाऱ्या नवरदेवाच्या लग्नात पहिल्या पत्नीची एन्ट्री; नववधूसह वऱ्हाडी थक्क, नवरदेवानं धूम ठोकली
MPSC FDA Paper Leak Maharashtra: MPSC औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर कसा फुटला? रोहित पवारांनी सगळं खणून काढलं, सगळ्यांदेखत पुरावाच दाखवला
Embed widget