एक्स्प्लोर

Defence Minister Rajnath Singh: गरज पडल्यास भारत सीमेपलीकडील दहशतवाद्यांवर हल्ला करण्यास तयार; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

India News: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत तयार आहे आणि गरज पडल्यास सीमेपलीकडील शत्रूवर हल्ला करू शकतो, असं वक्तव्य संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे.

India: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) हे जम्मू आणि काश्मीरच्या (Kashmir) दौऱ्यावर असताना त्यांनी दहशतवादाविरोधात भाष्य केलं आहे. दिवसेंदिवस भारत अधिक बलशाली होत आहे, असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले. तसेच, देशात दहशतवादाविरोधात अनेक कारवाया करण्यात येत आहेत आणि देशातील दहशतवाद्यांना संपवण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. गरज पडल्यास सीमेच्या बाजूला असणाऱ्या आणि सीमेपलीकडील दहशतवाद्यांवर हल्ला करुन त्यांचा खात्मा भारत करू शकतो, असा इशाराही राजनाथ सिंह यांनी बोलताना दिला. 

भारताने संपूर्ण जगाला दहशतवादाविरोधात सहिष्णुतेचा अर्थ सांगितला, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. पुलवामा आणि उरी या दोन्ही ठिकाणी दुर्दैवी घटना घडल्या होत्या, त्यावेळी पंतप्रधानांनी अवघ्या 10 मिनिटांत सर्जिकल स्ट्राईकचा निर्णय घेतला होता, यावरून त्यांची प्रबळ इच्छाशक्ती दिसून येत असल्याचं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. त्यावेळी सैन्याने केवळ आपल्या बाजूच्या दहशतवाद्यांना उद्ध्वस्त केलं नाही, तर त्यांचा खात्मा करण्यासाठी सीमेपलीकडे देखील गेल्याचं राजनाथ सिंह म्हणाले.

मुस्लिम देशांसह संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकत्र : संरक्षणमंत्री 

मुस्लिम देशांसह संपूर्ण जग दहशतवादाविरोधात एकत्र आलं आहे आणि दहशतवाद संपवण्याशी सहमतही आहे. काश्मीरचा पोपट करून पाकिस्तान काहीही साध्य करु शकत नाही, त्याऐवजी त्यांनी आपलं घर व्यवस्थित ठेवावं, असा टोलाही यावेळी बोलताना राजनाथ सिंह यांनी लगावला आहे. सोमवारी जम्मू विद्यापीठात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संबोधित केलं. त्यावेळी ते बोलत होते.

मोदी सरकारच्या काळात दहशतवादाविरुद्ध मोठ्या कारवाया : संरक्षमंत्री 

आपल्या 40 मिनिटांच्या भाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. भारताने मोदी सरकारच्या काळात दहशतवादाविरुद्ध मोठ्या कारवाया केल्या आहेत, 2016 मध्ये केलेला सर्जिकल स्ट्राइक आणि 2019 मध्ये बालाकोट एअर स्ट्राइकचा संदर्भ देत राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारने दहशतवादाविरुद्ध प्रभावी कारवाई सुरू केली आणि पहिल्यांदाच देशासह जगाला दहशतवादाविरुद्ध सहिष्णुतेचा अर्थ सांगितल्याचंही राजनाथ सिंह म्हणाले.

भारताचे सीमावर्ती शहर उरीमधील लष्कराच्या छावणीवर सप्टेंबर 2016 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता, त्यात 19 जवान शहीद झाले होते. त्यानंतर मोदींच्या निर्णयानंतर 15 दिवसांत, भारतीय लष्कराने सीमेपलीकडे सर्जिकल स्ट्राइक केले आणि पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड नष्ट केल्याचं राजनाथ सिंह म्हणाले. फेब्रुवारी 2019 मध्ये, दक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात चाळीस CRPF जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्याच्या 12 दिवसांनंतर, भारतीय हवाई दलाने (IAF) पाकिस्तानमधील बालाकोटमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला. जम्मू-काश्मीरला दीर्घकाळापासून दहशतवादाचा फटका बसला असल्याचंही राजनाथ सिंह यावेळी म्हणाले.

मागील यूपीए सरकारवर निशाणा साधत राजनाथ सिंह म्हणाले,  पाकिस्तान प्रायोजित दहशतवाद्यांनी हजारो निरपराधांचे बळी घेतल्यानंतरही त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात ते अपयशी ठरले आहेत. जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक दशकांपासून दहशतवादाचं नेटवर्क कार्यरत आहे. तर या नेटवर्कला कमकुवत करुन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येत असल्याचं देखील राजनाथ सिंह म्हणाले.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Vande Bharat Express : आता गोव्याला जा सुसाट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Local Body Election:राज्यात नगराध्यक्षपदाच्या 22 निवडणुका लांबणीवर,अनगरचीही निवडणूक प्रक्रिया स्थगित
Shahajibapu Patil Sangola News : सांगोल्याचे माजी आमदार शहाजी बापू पाटलांच्या ऑफिसवर रात्री छापे
Ravindra Chavhan Speech : 2 नंबरला किंमत नसते, रवींद्र चव्हाणांचा एकनाथ शिंदेंना टोला
Indoanesia Special Report : सेन्यार चक्रीवादळामुळे इंडोनेशियात अतिवृष्टी, निसर्गाचा प्रकोप
Shirlanka Special Report :श्रीलंकेत चक्रीवादळ, महाराष्ट्रात परिणाम, दितवांचं थैमानामुळे भारताला धडकी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
शक्तिपीठ महामार्ग चंदगडला वळवून पूर्ण करणारच : सीएम देवेंद्र फडणवीस
Winter Session Of Parliament: संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून; निवडणूक सुधारणा यादीवरून अभुतपूर्व रणकंदन होण्याची चिन्हे, 10 विधेयके सादर केली जाणार
Virat Kohli News : रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
रांचीत शतक, विराट कोहली कसोटी क्रिकेट पुन्हा खेळणार? BCCI नंतर अखेर तो बोलला, वाक्य ऐकताच चाहते स्तब्ध
Buldhana BJP : कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
कुणी कुणाला मतं टाकली हे जर कुणाला बारकाईने समजत असेल तर ते फक्त आणि फक्त मला समजतं; भाजप आमदाराचं धक्कादायक वक्तव्य
Jaya Bachchan On Marriage: 'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
'लग्नसंस्था जुनी झालीये...', जया बच्चन यांचं स्पष्ट मत, नात नव्यानंही लग्न करु नये, व्यक्त केली इच्छा
Elections 2025 : मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
मुंबईतील 7 हजारांहून अधिक मतदारांचे वॉर्ड बदलले; प्रारूप मतदार याद्यांमधील घोळ संपता संपेना, माहितीच्या अधिकारातूनही धक्कादायक बाब समोर
Gunratna Sadavarte : सक्षम ताटेच्या आई-वडील आणि आचलला संरक्षण द्यावं, कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
सक्षम ताटेच्या कुटुंबानं लेखी दिल्यास आरोपींना संविधान दिनापर्यंत फाशी पर्यंत पोहोचवणार : गुणरत्न सदावर्ते
Suraj Chavan Wedding Gift From Jahnavi Killekar: सूरज चव्हाणसोबत संपूर्ण लग्नसोहळ्यात जान्हवी किल्लेकर सावलीसारखी वावरली, लाडक्या भावाला त्याच्या बायकोसमोरच 'ही' खास भेटवस्तू दिली VIDEO
सूरज चव्हाणसोबत संपूर्ण लग्नसोहळ्यात जान्हवी किल्लेकर सावलीसारखी वावरली, लाडक्या भावाला 'ही' खास भेटवस्तू दिली VIDEO
Embed widget