एक्स्प्लोर

India Pakistan War: काश्मीरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन शिरले, भारतीय सैन्याने हवेतच उडवले? आकाशात लाल प्रकाश अन् स्फोट

India Pakistan Ceasefire Violations: भारत आणि पाकिस्तान यांच्यात 10 मे रोजी संध्याकाळपासून शस्त्रसंधी लागू झाली होती. पाकिस्तानने एकही गोळी चालवल्यास त्याला गोळ्याने उत्तर देण्याचे आदेश

India Pakistan War: भारताशी शस्त्रसंधीचा प्रस्ताव मान्य केलेल्या पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती अजूनही सुरुच आहेत. सोमवारी रात्री काही पाकिस्तानी ड्रोन्स काश्मीरमधील सांबा सेक्टरमध्ये घिरट्या घालताना दिसून आले. भारतीय सैन्याच्या एअर डिफेन्स सिस्टीमने (Air Defence System) तात्काळ हे ड्रोन (Drone Attack) हवेतच नष्ट केले. त्यामुळे सांबा सेक्टरमध्ये पुन्हा एकदा ब्लॅकआऊट पाहायला मिळाला. यावेळी पाकिस्तानी ड्रोन्स उद्ध्वस्त करताना आकाशात लाल रंगाच्या पट्ट्या आणि त्यापाठोपाठ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त समोर आले होते. परंतु, त्यानंतर भारतीय सैन्याने कोणतेही पाकिस्तानी (Pakistan) ड्रोन्स शिरले नसल्याची माहिती दिली. तसेच शस्त्रसंधी कायम असल्याचे सांगितले. परंतु, सांबा सेक्टरमध्ये आकाशातील लाल पट्टे आणि स्फोटांच्या आवाजांमुळे याठिकाणी नक्की काय घडले, याबाबत अद्यापही संभ्रम आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरुवातीला ड्रोन्स दिसल्यानंतर आणि ते नष्ट झाल्यानंतर पुढे काहीही घडले नाही.

यानंतर मंगळवारी सकाळपर्यंत सांबा सेक्टरमधील परिस्थिती सामान्य होती. रात्रभरात याठिकाणी कोणताही गोळीबार किंवा क्षेपणास्त्रांचा हल्ला झाला नाही. परंतु, शस्त्रसंधी करार होऊनही पाकिस्तानने भारतीय हद्दीत पुन्हा एकदा ड्रोन्स धाडण्याची आगळीक केली असेल तर आता केंद्र सरकार आणि भारतीय सैन्य पुढे काय पाऊल उचलणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

भारत आणि पाकिस्तानी लष्कराच्या डीजीएमओ दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये मंगळवारी संध्याकाळी चर्चा झाली होती. यावेळी पाकिस्तानने आम्ही शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार नाही, असे आश्वासन दिले होते. परंतु, पुढील काही तासांमध्येच म्हणजे रात्रीच्या सुमारास सांबा, जालंधर सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स घिरट्या घालताना आढळून आले. याशिवाय, कठुआ आणि अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी ड्रोन्स दिसून आल्याची चर्चा होती. मात्र, नंतर हे ड्रोन्स गायब झाल्याचे सांगितले. तर दुसरीकडे काल रात्री अमृतसर हवाई तळावरील वाहतूकही बंद  करण्यात आली होती. अमृतसर आणि होशियारपूर या जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून ब्लॅकआऊट लागू करण्यात आला होता. तसेच जालंधर परिसरातही वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. या सगळ्या गोष्टी अचानक का झाल्या, याबाबत ठोस माहिती नाही. मात्र, आता भारतीय लष्कर, केंद्र सरकार किंवा परराष्ट्र मंत्रालय यासंदर्भात कोणती माहिती देणार का, हे पाहावे लागेल.

आणखी वाचा

'बॉर्डर'वर एकही गोळी सुटणार नाही, भारत-पाकिस्तानमध्ये पुन्हा चर्चा, शस्त्रसंधी कायम; सैन्य दलाने दिली माहिती

 पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

महत्त्वाच्या बातम्या

विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Maharashtra Live News Updates: सर्पदंश झालेल्या विद्यार्थिनींच्या मृत्यूची होणार उच्चस्तरीय चौकशी, नाशिक आणि नागपूरची पथके आश्रमशाळेची पाहणी करणार
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!

व्हिडीओ

Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
विरोधकांच्या एकमुखी एल्गारानंतर अखेर अमित शाह जंतरमंतर आंदोलनावर संसदेत उत्तर देणार, मात्र कधी बोलणार याची माहिती नाही, दिल्ली पोलिसांनी विद्यार्थ्यांना सोलून काढल्यानंतर संसदेत फिरकलेच नाहीत
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
शाळकरी मुलींचं रस्त्यातील खड्ड्यांबाबत रिपोर्टींग; व्हायरल व्हिडिओवर आमदार थोरवेंचं स्पष्टीकरण
Ranchi Student Protest : रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
रांचीत विद्यार्थी अन् पोलिसांमध्ये धुमश्चक्री; पेपरफुटीविरोधात आंदोलन, विद्यार्थ्यांविरोधात अश्रूधुराच्या नळकांड्या अन् लाठीचार्ज
Abhijeet Dipke On Jharkhand Student Protest: झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज, पाण्याचा मारा; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीचार्ज; अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत विषय संपवला!
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
देवेंद्र फडणवीस आजवर मनोज जरांगेंना कधी भेटले का? भास्कर जाधवांचा सवाल, म्हणाले, बदनाम करण्याचा प्रयत्न
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
108 रुग्णवाहिकेसाठी 7 वेळा फोन, 2 तास वाट पाहिली, तरी आलीच नाही; गर्भवतीसह बाळाचा मृत्यू, 5 जणांविरुद्ध गुन्हा
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
मराठवाडा व सोलापूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज ते पीक विम्याची मागणी; पीएम मोदींच्या भेटीत खासदार बजरंग सोनवणेंनी कोणकोणत्या मागण्या केल्या?
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
चार प्रमाणपत्र रद्द झाले तर जरांगे थयथय नाचतोय, महाराष्ट्रात सामाजिक अन्याय सुरुय; हाकेंचा सोलापुरातून पलटवार
Embed widget