एक्स्प्लोर

Operation Sindoor : पाणी आणि रक्त सोबत वाहणार नाही, न्यूक्लिअर ब्लॅकमेल सहन करणार नाही; नरेंद्र मोदींच्या भाषणातील 10 मोठे मुद्दे

Narendra Modi Speech On Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने दहशतवाद्यांची ठिकाणी उद्ध्वस्त केली. यापुढेही भारत कारवाई करण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही असा इशारा मोदींनी दिला.

नवी दिल्ली : यापुढे दहशतवाद आणि व्यापार एकसोबत चालणार नाही, पाणी आणि रक्त एकासोबत वाहणार नाही. यापुढे पाकिस्तानसोबत चर्चा झाली तर फक्त पाकव्याप्त काश्मीरवर आणि दहशतवादावरच होणार असल्याचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. यापुढे पाकिस्तानच्या अणवस्त्रांच्या धमकीला घाबरणार नाही, त्याच्यावर जोरदार कारवाई होणार असल्याचा इशाराही नरेंद्र मोदी यांनी दिला. ऑपरेशन सिंदूर फक्त स्थगित करण्यात आलं आहे, गरज पडल्यास ते पुन्हा सुरू करणार असं मोदी म्हणाले. 

आम्ही भारतीय लष्कराला पूर्ण मोकळीक दिली आणि त्यानंतर लष्कराने कारवाई करत पाकिस्तानचे दहशतवादी तळं उद्ध्वस्त केली. भारताच्या जबरदस्त हल्ल्यानंतर पाकिस्तान जगभर मदतीची याचना करत होता. त्यानंतर 10 मे रोजी दुपारी पाकिस्तानच्या डीजीएमओचा शस्त्रसंधीसाठी फोन आला. तोपर्यंत भारतीय लष्कराने त्याचं काम पूर्ण केलं होतं अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली. 

नरेंद्र मोदींच्या भाषणातील दहा मोठे मुद्दे

1. ऑपरेशन सिंदूरची कारवाई फक्त स्थगित केली आहे, पण थांबवली नाही. यापुढे पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं थांबवलं नाही तर भारत पूर्ण शक्तिने हल्ला करणार. 

2. भारतावर जर यापुढे दहशतवादी हल्ला झाला तर जशास तसं उत्तर दिलं जाणार हे ऑपरेशन सिंदूरमुळे स्पष्ट झालं. ज्या ठिकाणी दहशतवादी तळं आहेत ती उद्ध्वस्त केली जाणार. 

3. यापुढे पाकिस्तानचे न्यूक्लिअर ब्कॅकमेल सहन करणार नाही. त्या धमकीच्या आडून दहशतवाद्यांना पोसणाऱ्यांना सोडणार नाही. 

4. दहशतवादी आणि त्यांना पोसणाऱ्यांना वेगवेगळ्या दृष्टीने पाहणार नाही. दोघांवरही कारवाई करणार. 

5. यापुढे व्यापार आणि दहशतवाद सोबत होणार नाही. यापुढे रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही. 

6. ज्यांनी आमच्या बहिणींचे कुंकू पुसले त्याचा बदला भारताने घेतला. 

7. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे अचूकरित्या उद्ध्वस्त केले. दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नव्हती की भारत इतका मोठा निर्णय घेऊ शकेल. जेव्हा राष्ट्र सर्वोच्च असते तेव्हा असे कठोर निर्णय घेतले जातात.

8. मेड इन इंडिया शस्त्रांनी त्याची ताकद दाखवली. हवाई हल्ले असो वा पर्वतीय प्रदेश, प्रत्येक ठिकाणी भारतीय बनावटीच्या शस्त्रांनी त्याची क्षमता सिद्ध केली. 

9. भारताच्या जोरदार हल्ल्यांमुळे बिथरलेल्या पाकिस्ताननं शस्त्रसंधीची याचना केली. तोपर्यंत भारताने आपलं लक्ष्य साध्य केलं होतं. त्यामुळे आम्ही शस्त्रसंधी केली.

10. यापुढे पाकिस्तानसोबत फक्त दहशतवाद आणि पाकव्याप्त काश्मीरवरच चर्चा होणार. 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
IPL 2026 : पहिल्याच सामन्यापूर्वी RCB ला मोठा धक्का ! अनुभवी गोलंदाज संघाबाहेर, प्रशिक्षक अँडी फ्लॉवर यांनी दिली महत्वाची माहिती 
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
भारतात लॉकडाउन लागू होणार का? पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांसोबत घेतलेल्या बैठकीत नेमकं काय ठरलं?  
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'
मोठी बातमी! पंतप्रधानांनी घेतली बैठक, 15 राज्यांचे मुख्यमंत्री हजर; देवेंद्र फडणवीसांकडून कौतुक, 'गॅस,इंधन पे चर्चा'

व्हिडीओ

Sushma Andhare Pune : महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांकडे एवढा पैसा कसा आला?
Sanjay Raut PC : एकट्या चाकणकर नाही, केसरकर स्वतः म्हणतात मीच का? 40 आमदार जात होते
Rupali Thombre Patil : अजितदादा असते तर Rupali Chakankar यांचा लगेच सुपडा साफ केला असता
Ashok Kharat : महिलांसोबत केलेलं कृत्य विधीचा भाग, अशोक खरातच्या जबाबात काय? Special Report
Kharat Villegers : अशोक खरातचा कारनामा, गावातून पंचनामा, 'माझा'चा स्पेशल रिपोर्ट Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
DGCA VVIP flights Rule: 'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
'तर नेत्यांकडून दबाव टाकता येणार नाही...' अजितदादांचा विमान अपघातात बळी गेला अन् डीजीसीएकडून आता नियमात बदल
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
अजित पवारांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भावुक; म्हणाल्या, तुमची उणीव प्रकर्षणाने जाणवते, शब्दात मांडणे अशक्य
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
BMC Garbage van: मुंबईत कचरा उचलण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज गाड्या
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
Video: स्ट्रेट ऑफ होर्मुझ रोखत इराणनं अवघ्या जगाचं नाकं दाबलं, पण त्याच होर्मुझच्या समुदात हाकेच्या अंतरावर तेल जहाज पेटत असतानाही इराणच्या निर्भिड चिमुकलीचा किनाऱ्यावर उंच माझा झोका!
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
एकनाथ शिंदेंनी संस्कृती दाखवत 'साहेब' म्हटलं, पण उद्धव ठाकरेंनी...; ज्योती वाघमारेंची बोचरी टीका
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
सुषमा अंधारेंकडून अशोक खरातचे फोटो दाखवत गंभीर आरोप; MIDC चेअरमन आवारेंचं स्पष्टीकरण, प्रसंग कथित
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात डबल Eviction! प्रभू शेळकेनंतर कोण घराबाहेर जाणार? काटा अन् टोळी टीम्सना धक्का बसणार!
बिग बॉसच्या घरात डबल Eviction! प्रभू शेळकेनंतर कोण घराबाहेर जाणार? काटा अन् टोळी टीम्सना धक्का बसणार!
Iran War Live Update: हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडला, 5 भारतीय जखमी
हुथी बंडखोर सुद्धा इराणच्या युद्धात सामील; 2 हजार किमी अंतरावरून इस्रायलवर बॅलिस्टिक मिसाईल डागल्या, युएईत मिसाईलचा मलबा पडून 5 भारतीय जखमी
Embed widget