एक्स्प्लोर

'कधीही युद्ध करण्याची गरज भासली तर...' एनसीसी कॅम्पमध्ये राजनाथ सिंह म्हणाले... 

Rajnath Singh In NCC Camp : प्रजासत्ताक दिनापूर्वी  राजनाथ सिंह यांनी आज दिल्ली कॅंट भागातील एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराला भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, कधीही युद्ध करण्याची गरज भासली तर संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल.

Rajnath Singh In NCC Camp : "कधीही युद्ध करण्याची गरज भासली तर संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल." असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh ) यांनी व्यक्त केले. प्रजासत्ताक दिनापूर्वी  राजनाथ सिंह यांनी आज दिल्ली कॅंट भागातील एनसीसीच्या प्रजासत्ताक दिनाच्या शिबिराला ( NCC Camp ) भेट दिली. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी एनसीसी कॅडेट्सना संरक्षण मंत्री पदक आणि प्रशस्तीपत्र प्रदान केले. यावेळी एनसीसी कॅडेट्सना संबोधित करताना म्हणाले की, युद्धावेळी देशातील जनता सैनिकांच्या पाठिशी असेल.   

राजनाथ सिंह (Rajnath Singh ) म्हणाले, "प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षा परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला तयार करण्यास सरकार कोणतीही कसर सोडत नाही. यापूर्वी भारताने आपल्या शत्रूंना पराभूत केले आणि अनेक युद्धे जिंकली आहेत. हे एकीचे फळ आहे. सशस्त्र दल सर्व प्रकारच्या धोक्यांपासून देशाचे रक्षण करत असताना, शास्त्रज्ञ, अभियंते, नागरी अधिकारी आणि इतर त्यांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. कधीही युद्ध लढण्याची गरज भासल्यास संपूर्ण देश आपल्या सशस्त्र दलांच्या पाठीशी असेल. भारताने यापूर्वी आपल्या शत्रूंना पराभूत केले आहे आणि अनेक युद्धे जिंकली आहेत."

राजनाथ सिंह यांनी तरुणांना ‘वापरा आणि फेका’ या मानसिकतेतून बाहेर पडण्याचे आवाहन केले. "प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे समाज आणि पर्यावरणाला या प्रथेचा सर्वाधिक त्रास होतो. बदलत्या काळानुसार स्वत:ला घडवण्याच्या गरजेवरही संरक्षणमंत्र्यांनी भर दिला. प्रचंड वेगाने बदलणाऱ्या जागतिक सुरक्षेच्या परिस्थितीमुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना करण्यासाठी देशाला तयार करण्यासाठी सरकारकडून कोणतीही कसर सोडली जात नाही."

"कालानुरूप बदल करणे आवश्यक असले तरी देशाच्या गौरवशाली भूतकाळाशी जोडलेले राहणेही तितकेच महत्त्वाचे आहे. आपल्या संस्कृती आणि परंपरांमध्ये रुजलेला सशक्त आणि समृद्ध भारत निर्माण करणे हा यामागील उद्देश आहे. ज्ञान संपादन करण्यावर आणि पैसे कमावण्यावर जितके लक्ष दिले तितकेच चारित्र्य निर्माण करण्यावर लक्ष देली पाहिजे. कठोर परिश्रम, समर्पण आणि मूल्यांच्या जोरावर कॅडेट्स यशाच्या शिखरावर पोहोचतील आणि देशाचा गौरव करतील, असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी एनसीसीचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.  

महत्वाच्या बातम्या

Republic Day: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यंदाच्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे, भारतासोबत संबंध भक्कम करण्यावर भर 

महत्त्वाच्या बातम्या

Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
Election Age Limit 21 : Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
Gen Z साठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लोकसभा-विधानसभा निवडणूक लढवण्याचे वय 21 वर्षे करण्याचा प्रस्ताव आणणार
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  
प्रधान गेले जोशी आले! जाणून घ्या नवीन शिक्षणमंत्री प्रल्हाद जोशींची राजकीय कारकीर्द  

व्हिडीओ

Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report
Devendra Fadnavis Pandharpur : तरुणाईला दिशा देण्यासाठी PM मोदींना आर्शीवाद द्यावा, विठुरायाकडे साकडं
Amruta Fadnavis Pandharpur : मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार, अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Uddhav Thackeray Speech Shivaji Park : तुम्ही काठ्या घेऊन या, आम्ही तिरंगा घेऊन लढू, ठाकरेंचं चँलेज

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asaduddin Owaisi : मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
मोदींना रात्रीच्या अंधारात व्हिडीओ करावा लागला... मी त्यांना सलाम करतो ज्यांनी...; असदुद्दीन ओवैसींचं मोठं वक्तव्य
CJP Future Plan : 'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
'आता आम्ही संपूर्ण देशात...'; आंदोलन संपल्यानंतर काय करणार CJP? प्रवक्त्याने सांगितला पुढचा प्लॅन
Delhi Protest : अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
अण्णा हजारेंनंतर आता अभिजीत दीपके; मराठी माणसाने दुसऱ्यांदा हादरवले 'दिल्लीचे तख्त' 
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
धर्मेंद प्रधानांचा राजीनामा शिक्षणव्यवस्थेची पुनर्बांधणी करण्याच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल, देशाचे संविधान संपवणाऱ्या, संस्थांवर कब्जा करणाऱ्या राजवटीपासून सुटका मिळवूया; राहुल गांधींचा घणाघात
Raj Thackeray : 'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'जेन झी'नी सरकारच्या झिंज्या उपटल्या; राज ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया, हा राग आता प्रधानांवरून पंतप्रधानांवर गेल्याचा दावा
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
'चुकीच्या माणसासोबत पंगा घेतला होता, मराठे मोडतील पण वाकणार नाहीत...' मोदी सरकारला झुकवलेल्या अभिजित दिपकेंची जंतरमंतरवरून विजयी हुंकारात माय मराठीतून गर्जना
Prakash Ambedkar: 22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
22 जणांनी जीवन संपवले याबद्दल खंत नाही; पोलिसांच्या अत्याचारांचा उल्लेख नाही, नुकसान भरपाईवर स्पष्टता....; प्रकाश आंबेडकरांनी धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची केली चिरफाड
Devendra Fadnavis and Amruta Fadnavis: देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
देवेंद्र फडणवीस देशाचे नवे शिक्षणमंत्री होणार? संजय राऊतांच्या दाव्यानंतर अमृता फडणवीसांच्या 'त्या' वक्तव्याची जोरदार चर्चा
Embed widget