एक्स्प्लोर

हिंदू धर्मांतर घडवत नसल्याने त्यांचं प्रमाण कमी: किरेन रिजिजू

नवी दिल्ली: हिंदू लोक धर्मांतर घडवत नाहीत, म्हणून इतर देशांच्या तुलनेत या देशातील अल्पसंख्याकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, असं वादग्रस्त वक्तव्य केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केलं आहे. अरुणाचल प्रदेश काँग्रेसने मोदी सरकारवर अरुणाचल प्रदेश हे राज्य हिंदूबहुल बनवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता. त्याला उत्तर देताना रिजिजू यांनी ट्वीट करुन हे वादग्रस्तव वक्तव्य केलं आहे. काँग्रेसला प्रत्युत्तर देताना त्यांनी आणखीही काही ट्वीट केले असून, या ट्वीटमधून काँग्रेस अशाप्रकारची बेजबाबदार वक्तव्य का देत आहे? असा सवाल विचारला आहे. ''अरुणाचल प्रदेशमधील जनता शांततेत राहात असताना, काँग्रेस चिथवणीखोर वक्तव्य देत आहे. त्यांनी अशी वक्तव्य टाळली पाहिजेत,'' असा सल्लाही त्यांनी या ट्वीटमधून दिला. तसेच भारत एक धर्मनिरपेक्ष देश असून, देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्व धर्माचे लोक इथं गुण्यागोविदानं राहत असल्याचंही त्यांनी सांगितलंय. दरम्यान, रिजिजू यांच्या वक्तव्यावरुन राजकीय पडसादही उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना एमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, ''त्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं, ते केवळ हिंदूंचे मंत्री नव्हेत, तर सर्व भारतीयांचे मंत्री असल्याचं त्यांनी लक्षात ठेवावं. भारतातील अल्पसंख्याकांचं इतर देशातील अल्पसंख्याकांशी काही देणंघेणं नाही. घटनेनं सर्वांना समान अधिकार दिला आहे,'' असं त्यांनी म्हणलंय. 2011 च्या जनगणनेनुसार, भारतातील हिंदूंची लोकसंख्या 79.80 टक्के होती. तर मुस्लिमांची लोकसंख्या 14.23 टक्के होती, तर ख्रिश्चनांची लोकसंख्येचं प्रमाण 2.30, शीख 1.72, बौद्ध 0.70 आणि जैन समुदायाची लोकसंख्येचं प्रमाण 0.37 टक्के होतं. तर 2001 मध्ये हेच प्रमाण हिंदूंमध्ये 80.5 टक्के, मुस्लिमांचे 13.4 टक्के, ख्रिश्चन 2.3 टक्के, शीख 1.9, बौद्ध 0.80 आणि जैन समुदायातील लोकसंख्येचं प्रमाण 0.4 टक्के इतकं होतं.

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
ठाकरेंच्या खासदारांनी घेतली लोकसभा अध्यक्षांची भेट, पावसाळी अधिवेशनापूर्वी 'ऑपरेशन टायगर'वर फैसला होणार? 
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
गावगाडा हाकणाऱ्या सरपंचांना प्रत्येक महिन्याला मिळणार 10 हजार रुपये, 'या' सरकारचा मोठा निर्णय   
Taratala Construction Site Accident: कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
कोलकातामध्ये निर्माणाधीन गोदाम कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50- 55 जण ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!
इथेनॉल इंधन टाकीत मुंग्या लागल्याचा व्हिडिओ व्हायरल, पेट्रोलमध्ये उसाचा रस मिसळल्याचाही दावा, विम्याच्या वैधतेवरही परिणाम? आता सरकारनेच केला स्पष्ट खुलासा!

व्हिडीओ

Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?
Maharashtra Rain News : पुणे, सातारा, लातूर, धाराशिव, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Sanjay Jadhav PC : निधीवरुन राजकारण, संजय जाधव म्हणाले, मीडियाने दाखवलेली सर्व माहिती चुकीची!
Mumbai Waterlogging Special Report: सालाबादप्रमाणे मुंबईची तुंबई; पालिका कर्मचाऱ्यांची रात्रभर धावपळ
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
'एकट्याने किती दिवस पक्षाची पालखी सांभाळायची?' शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवलेंचा तडकाफडकी राजीनामा; कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत खदखद सुरुच
Dharashiv : शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
शिंदेंकडे शेवटी गेलेल्या खासदाराला 95 कोटी दिले, वर्षाला 250 कोटींचं आश्वासन; शरद पवारांच्या आमदाराचा ओमराजे निंबाळकरांकडे रोख? 
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
'जे बोलायचं, लिहायचं ते लिहा, रेकॉर्ड करा आणि सांगा, कमिशनरकडे जाऊन कंप्लेंट करा, पोलीस आहेत सर्व त्यांच्यासमोर सांगतोय..' संजय पाटलांचा आई बहिण काढत मस्तवालपणााचा कळस
Eknath Shinde and Sanjay Dina Patil: ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
ठाकरेंची साथ सोडून दुसऱ्या पक्षात जाताच तावातावात नको ते बोलले, संजय दिना पाटलांना एकनाथ शिंदेंचा ओरडा पडला, नव्या खासदारांना सूचना
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
सत्ताधारी आमदारांमध्येच कलगीतुरा! प्रवीण दरेकर काल म्हणाले, तुमच्यापेक्षा मी 10 पटीने ओरडू शकतो, दादागिरी चालणार नाही; आज बच्चू कडू म्हणाले, 'सरकार बदनाम होत आहे त्यामुळे..'
Nasrapur Case Verdict: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला शिक्षा 29 जूनला सुनावली जाणार, 39 मिनिटे चिमुरडीला ओरबाडत राहिला, अंगावर 18 जखमेच्या खुणा, तरी नराधमाच्या चेहऱ्यावर पश्चातापाची रेष सुद्धा नाही
Nasrapur Case Verdict: भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
भीमराव कांबळेला न्यायाधीश म्हणाले, 'तो प्रसंग आठव अन् तूच सांग तुला काय शिक्षा द्यायची?', नराधम म्हणाला मी....
Sanjay Dina Patil: संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, 'कॅमेरा बंद कर नाहीतर मी विसरुन जाईन मी खासदार आहे, तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन'
संजय दिना पाटलांची पत्रकारांना शिवीगाळ, म्हणाले, 'कॅमेरा बंद कर नाहीतर... तुम्ही उगाच माझ्या गां#% बोटं घालताय, परत आलात तर मारुन पाठवेन'
Embed widget