एक्स्प्लोर

Himachal CM  : सुखविंदर सिंह सुक्खू आज घेणार हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ

Himachal CM  : सुखविंदरसिंह सुक्खू आज हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंपदाची शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्याला काँग्रेसचे अनेक नेते राहणार उपस्थित राहणार आहेत.

Himachal CM  : हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसकडून सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या नावाची घोषणा झाली. आज त्यांचा शपथविधी सोहळा होणार आहे.  शनिवारी  सुक्खू  यांच्या नावाची घोषणा होताच सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू झाली. सुखविंदर सिंह सुक्खू आणि इतर काँग्रेस नेत्यांनी हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची काल रात्री भेट घेतली आणि सरकार स्थापनेचा दावा केला. 

सुखविंदर सिंह सुक्खू हे आज हिमाचल प्रदेशचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबज उपमुख्यमंत्री म्हणून मुकेश अग्निहोत्री शपथ घेणार आहेत. याआधी शनिवारी शिमल्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीत हिमाचल काँग्रेसचे प्रभारी राजीव शुक्ला, दोन्ही काँग्रेसचे पर्यवेक्षक भूपेश बघेल, भूपेंद्र सिंह हुडा हेही उपस्थित होते. या बैठकीत सुखविंदर सिंह सुक्खू यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. सुखविंदर सिंह सुक्खू हे हिमाचल प्रदेशचे पुढील मुख्यमंत्री आणि मुकेश अग्निहोत्री हे उपमुख्यमंत्री असतील, अशी घोषणा या बैठकीत करण्यात आली. त्यानंतर सर्व 40 आमदारांनी एकमताने सुखविंदर सिंग सुखू यांची नेता म्हणून निवड केली. 
 
सुखविंदर सिंह सुक्खू यांच्या शपथविधी सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.  

सुखविंदर सिंह सुक्खू यांच्याबद्दल? 

सुखविंदर सिंह सुक्खू हे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांच्या कार्यकाळात एनएसयूआयचे प्रदेशाध्यक्ष होते. त्यानंतर युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले. नंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले.  हिमाचल प्रदेशातील नादौन विधानसभा मतदारसंघातून सुखविंदर सिंह सुक्खू यांनी निवडणूक जिंकली आहे. त्यांनी भाजपच्या विजय कुमार यांचा 3,363 मतांनी पराभव केला. हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सुखू हे आघाडीवर होते. सुखविंदर सिंह सुक्खू  यांना 50.88 टक्क्यांसह 36142 मते मिळवली तर भाजपच्या विजय कुमार यांना 46.14 टक्क्यांसह 32,779 मते मिळाली. तर आम आदमी पक्षाचे उमेदवार शांकी ठुकराल यांना केवळ 1,487 मते मिळाली. 

सुखविंदर सिंह सुक्खू हे हिमाचल प्रदेशच्या सध्याच्या राजकारणातील आघाडीचे नाव आहे.  त्यांचा जन्म 27 मार्च 1964 रोजी हिमाचल प्रदेशातील नादौन येथे झाला. आता ते काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.  सुखविंदर सिंग सुखू यांनी नादौन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. पुढे हिमाचल प्रदेश विद्यापीठातून एलएलबीची पदवी मिळवली. 

2003 मध्ये पहिल्यांदा आमदार 

सुखविंदर सिंह सुक्खू हे राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वीरभद्र सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात. सखू हे 2022 च्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुखही होते. सिंह सुक्खू यांनी आतापर्यंत 5 वेळा विधानसभा निवडणूक लढवली असून त्यापैकी 4 वेळा त्यांनी विजय मिळवला आहे. 2003 मध्ये नौदान विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते. यानंतर  सुक्खू यांनी 2007, 2017 च्या निवडणुकीत विजय मिळवला. 2013 मध्ये ते हिमाचल प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्षही राहिले आहेत.   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
US Iran War: डोनाल्ड ट्रम्प यांचा डबल गेम, पहिल्यांदा म्हणाले इराण युद्ध संपणार आणि लगेचच आखाती देशात 10 हजार जवान पाठवले
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
20 लाख बॅरल तेल घेऊन इराणचं जहाज गुजरातमध्ये दाखल, मात्र भारताने तेल स्वीकारण्यास दिला नकार, नेमकं कारण काय? 
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल

व्हिडीओ

Sandeep Deshpande On Pratap Sarnaik : मंत्रिपद धोक्यात, प्रताप सरनाईक सारखा कुंभकर्ण जागा झालाय
Anjali Damania On Ashok Kharat : अशोक खरातला कॉल, राजकीय बवाल Special Report
Nashik TCS Issue : 'कॉर्पोरेट जिहाद' नाशकात म्होरक्या मलेशियात? Special Report
Amravati Paratwada Case : बुलडोझर घरावर, राजकारण धर्मावर Special Report
Sunetra Pawar Prachar : काकींचा प्रचार, विलिनीकरणाची किनार? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RCB vs LSG :  विराट कोहलीच्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर बंगळुरुचा मोठा विजय, रिषभ पंतच्या लखनौला पराभवाचा धक्का, गुणतालिकेत कोण टॉपवर?
बंगळुरुनं घरच्या मैदानावर लखनौला पराभवाचं पाणी पाजलं, रिषभ पंतच्या टीमचा दारुण पराभव
Mumbai Water Cut : मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
मुंबईकरांना पाण्याचा वापर जपून करावा लागणार, 1 मे पासून 10 टक्के पाणी कपात शक्य, मुंबई महापालिका मोठा निर्णय घेणार?
Gold Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात घसरण, भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
भारतात अक्षय तृतीयेपूर्वी सोने चांदी महागली, चांदीच्या दरात 11000 रुपयांची वाढ, सोन्याचं कायं?
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
केजरीवाल म्हणाले, 'न्यायमूर्तींची मुलं सॉलिसिटर जनरलसोबत काम करतात, न्यायमूर्ती त्यांच्या विरोधात आदेश कसे देऊ शकतात?' तुषार मेहता सीबीआयचे वकील
Rohit Sharma: आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
आयपीएलमध्ये चाचपडत असलेल्या मुंबईला तगडा झटका; रोहित शर्मा पंजाबविरुद्धच्या सामन्यातून बाहेर, उर्वरित स्पर्धेत काय होणार?
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
सरकारच्या प्रस्तावाचा महिला आरक्षणाशी काहीही संबंध नाही; हा तर मतदारसंघांची पुनर्रचना आणि सोयीस्कर मतदारसंघांची फेररचना करून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न; राहुल गांधींचा हल्लाबोल
Raj Thackeray: अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
अशोक खरात प्रकरणावर पहिल्यांदाच बोलले राज ठाकरे; म्हणाले, ही प्रकरणं पण कोणाची तरी वाट लावायची म्हणून..
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
ट्रान्सफर अगेन... राज्यातील पाच आयएएस अधिकाऱ्यांची बदली; पिंपरी चिंचवडला नवे अतिरिक्त आयुक्त
Embed widget