एक्स्प्लोर

ट्रेन उशिरा धावत असल्यानं नवरदेवाचं सुरेश प्रभूंना साकडं

पटना : ट्रेन लेट झाली की, त्याचा फटका कसा बसतो, याची अनेक उदाहरणं आपण ऐकली असतील. पण याच कारणामुळे जर तुम्हाला एका नवरदेवाचं लग्न मोडण्याच्या स्थितीत येऊन ठेपलं होतं, असं कुणी सांगितलं, तर अनेकांचा विश्वास बसणार नाही. पण बिहारच्या भोजपूर जिल्ह्यात असाच प्रकार घडला आहे. बिहारच्या भोजपूर जिल्ह्यातील नवाडीह गावाचा रहिवासी सुशील कुमारचं दिल्लीत लग्न होणार होतं. यासाठी सोमवारी संध्याकाळी 6 वाजताचा निश्चित करण्यात आला होता. सुशीलनं 86 वऱ्हाडींचं 14 मे रोजीचं मगध एक्सप्रेसचं रिझर्व्हेशन केलं होतं. ही ट्रेन सुशीलच्या गावापासून जवळच असलेल्या आरा रेल्वे स्थानकात रविवारी संध्याकाळी 7.04 मिनिटांनी येणार होती. तर सोमवारी सकाळी 11.50 मिनिटांनी ती नवी दिल्लीत पोहचणार होती. पण ही ट्रेन तब्बल 3.30 तास उशीराने आरा स्थानकात दाखल झाली. ही ट्रेन उशीरा धावत असल्याची सूचना वऱ्हाडी मंडळींना आधीच देण्यात आली होती. पण ट्रेन दिल्लीत पोहचणार की नाही, या चिंतनं नवरदेवाची घालमेल सुरु होती. कारण मुहूर्त टळून गेल्यास, त्याला लग्नासाठी पुन्हा वाट पाहावी लागणार होती. त्यामुळे सुशील कुमारने रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करुन आपली कैफियत मांडली. यानंतर रेल्वे मंत्रालयाने ट्विटची दखल घेऊन सुशीलची तक्रार लखनऊ स्टेशन मास्तरांकडे वर्ग केली. त्यानंतर लखनऊ स्टेशन मास्तरांनी ती अलाहबाद स्टेशन मास्तरांकडे वर्ग केली. पण तो पर्यंत ट्रेनला अलाहबादला पोहचण्यास पाच तास उशीर झाला होता. या दरम्यान, नवरदेवाची घालमेल सुरुच होती. नवरदेव सातत्यानं रेल्वे मंत्र्यांना ट्वीट करुन ट्रेनची गती वाढवण्याची मागणी करत होता. त्यानंतर रेल्वे मंत्र्यांच्या आदेशावरुन रेल्वेच्या मोटरमननं गती वाढवून दोन तासाचा वेळ रिकव्हर केला, आणि ही ट्रेन दिल्लीत 4.45 मिनिटांनी दाखल झाली. यानंतर सुशील कुमारनं सुटकेचा निश्वास सोडला. आणि ठरलेल्या मुहुर्तापूर्वी तो लग्न मंडपात दाखल झाला. यानंतर त्याचं धडाक्यात लग्न झालं. रेल्वे मंत्रालयानं वेळीच दखल घेतल्यानं नवरदेवानं रेल्वेमंत्र्यांचे आभार मानले.

महत्त्वाच्या बातम्या

सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी
पोटच्या 18 वर्षाच्या लेकाला आजारपणात गमावलं, पत्नी डिप्रेशनमध्ये गेली, पण पतीनं दत्तक मुलं घेण्यासाठी भलताच मार्ग निवडला अन् आता थेट जेलवारी

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Uday Samant Maratha Reservation: जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
जरांगे-हाकेंना एकच सांगतो, आम्ही कोणा एकाचं आरक्षण कमी करुन दुसऱ्याला देणार नाही: उदय सामंत
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
सोनिया गांधींनी खरंच वंदे मातरम गाणं गाण्यापासून कार्यकर्त्यांना थांबवलं? भाजपच्या आरोपावर काँग्रेसचं उत्तर
Mumbai Azad Maidan Riots: मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
मुंबईच्या आझाद मैदान दंगलीतील आरोपींना 14 वर्षांनंतरही शिक्षा नाहीच! पावणेदोन कोटी रुपयांची वसुलीही रखडली, नेमकं प्रकरण काय?
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
पत्नीची इन्स्टा वापरावरून आणि ऑटो-रिक्षा चालवण्यावरून वाद टोकाला गेला; पती म्हणाला, ये घरी परत मी रिक्षा शिकवतो अन् पुढे घडू नये ते भयावह पद्धतीनं घडलं
Pune Chakan MIDC : चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
चाकण औद्योगिक क्षेत्रातील अडथळे दूर करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय; पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत
Rahul Gandhi: लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना नोटीस धाडली, 28 ऑगस्टपर्यंत उत्तर मागितलं; नेमकं काय घडलं?
Devendra Fadnavis on OBC Census: मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
मोठी बातमी : एका कमांडवर ओबीसींची लोकसंख्या हातात येणार, जातीगत जनगणना स्वागतार्ह : देवेंद्र फडणवीस
Abhijit Dipke and Gulabrao Patil: अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
अभिजीत दिपकेंचा सरकारी शाळांवरुन सरकारवर निशाणा, गुलाबराव पाटील म्हणाले, 'कुठेही राजकारण आणू नका'
Embed widget