एक्स्प्लोर

शेतकऱ्यांची दूरवस्था थांबवा नाहीतर... ; राहुल गांधींचा मोदी सरकारला इशारा

'आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत? तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दुरावस्था करत आहात'

नवी दिल्ली : आरएसएस सोडून या देशात सर्वजण दहशतवादी आहेत?, तुम्ही देशाच्या पाठीचा कणा असणाऱ्या शेतकऱ्यांचीच ही दूरवस्था करत आहात, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सत्ताधारी मोदी सरकारवर निशाणा साधला. सोबतच दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी यंदाच्या वर्षी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरही सडकून टीका केली.

'सरकार किल्लाबंदी का करत आहे? सरकार शेतकऱ्यांना घाबरतं का? शेतकरी देशाची ताकद आहेत. त्यांना दाबण, मारणं आणि धमकावणं सरकारचं काम नाही. सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करुन तोडगा काढण्याचं काम करावं. शेतकऱ्यांनी दिल्लीला वेढा दिला आहे. शेतकऱ्यांनी आंदोलन करणं हे देशासाठी योग्य नाही', अशा शब्दांत त्यांनी शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या केंद्राच्या भूमिकेची निंदा केली.

जनतेने तुम्हाला निवडून दिलं आहे. तुमचं काम आहे त्यांच्या हिताचा विचार करणं. या एक टक्के लोकसंख्येसाठी तुम्ही देश विकू शकत नाही. अशा शब्दांत राहुल गांधी यांनी पावलोपावली मोदी सरकारला निशाण्यावर घेतलं. 'मी शेतकऱ्यांना चांगलं ओळखतो ते कुठंही जाणार नाहीत अखेर एक दिवस सरकारलाच मागे हटावं लागेल. त्यापेक्षा आताच माघार घ्या', अशा इशाराच त्यांनी दिला.

गुजराती बांधवांसाठी शिवसेनेकडून रासगरब्याचं आयोजन; उद्योजक- व्यावसायिकांच्या हाती येणार शिवबंधन

शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यांवर टाळाटाळ करण्याची गरज नसून पारदर्शी आणि स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आता आली आहे, असं म्हणत शेतकऱ्यांप्रती सरकारच्या निर्णयांवर त्यांनी निशाणा साधला. पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वीच या आंदोलनाबात त्यांचं मौन सोडत प्रतिक्रिया दिली होती. यावरही त्यांनी निशाणा साधला.

देशाचा अर्थसंकल्प 1 टक्के जनतेलाच आधार देणारा

नुकत्याच सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पाबाबत त्यांनी नाराजीचा सूर आळवला. देशाच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून 99 टक्के जनतेला आधार दिला जाणं अपेक्षित होतं. पण, इथं मात्र 1 टक्के जनतेलाच आधार मिळत आहे. मध्यमवर्गीय जनता, कामगार, शेतकरी यांच्या वाट्याचा पैसा ठराविक अशा 10-15 लोकांच्याच वाट्याला गेला. इथं देशाच्या सरकारकडून जनतेच्या हातात पैसा दिला जाण्याची गरज होती. लघुउद्योजकांना आर्थिक पाठबळ देत अर्थव्यवस्थेला गती दिलं जाण अपेक्षित होतं. पण, इथं मात्र उलट चित्र पाहायला मिळालं असं म्हणत त्यांनी रुतलेल्या अर्थचक्राकडे साऱ्यांचं लक्ष वेधलं.

चीन मुद्द्यावरही प्रतिक्रिया

चीनकडून देशाच्या भूभागात वारंवार घुसखोरी केली जात असताना संरक्षणार्थ तुटपूंज्या रकमेचीच तरतूद केंद्रानं केल्याची बाब अधोरेखित करत राहुल गांधी यांनी जर संरक्षण यंत्रणा देशाप्रती सर्वस्व अर्पण करत असतील तर इथं सरकारकडून 110 टक्के समर्पकता दाखवली गेली पाहिजे असा सूर आळवला. संरक्षण यंत्रणांच्या मागण्या आणि अपेक्षा पूर्ण झाल्याच पाहिजेत यावर ते आग्रही दिसले.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
Bengal Breaking LIVE Updates: शुभेंदू अधिकारींचा पीए, चंद्रनाथ रथ, बंगालमध्ये हत्या; टीएमसीची सीबीआय चौकशीची मागणी
Bengal Breaking LIVE Updates: शुभेंदू अधिकारींचा पीए, चंद्रनाथ रथ, बंगालमध्ये हत्या; टीएमसीची सीबीआय चौकशीची मागणी
Chandranath Rath: हवाई दलात 20 वर्ष सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रातही काम ते बंगालचे भावी सीएम शुभेंदू अधिकाऱ्यांचा राईट हँड होण्यापर्यंतचा प्रवास; चंद्रनाथ रथ कोण होते?
हवाई दलात 20 वर्ष सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रातही काम ते बंगालचे भावी सीएम शुभेंदू अधिकाऱ्यांचा राईट हँड होण्यापर्यंतचा प्रवास; चंद्रनाथ रथ कोण होते?
Tamil Nadu Government Formation: TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?
TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?

व्हिडीओ

Punjab Blast : पंजाबमध्ये खलिस्तानी अतिरेकी पुन्हा सक्रीय? Special Report
Bengal Violance : बंगाल, बदला आणि बुलडोझर Special Report
Nasrapur Case : पोलीस इन अॅक्शन, नसरापुरात मध्यरात्री रिक्रिएशन Special Report
Parvati Case Mother Reaction : पुणे पर्वती अत्याचार प्रकरणात आरोपीला फाशी द्या, आईची मागणी
Congress Leaders Meet TVK Vijay Thalapathy : तामिळनाडू काँग्रेस नेत्यांनी घेतली 'विजय' यांची भेट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
तमिळनाडूत राज्यपालांनी टीव्हीके सर्वात मोठा पक्ष असूनही थलापती विजयना बहुमत नसल्याचं सांगितलं; प्रकाश आंबेडकरांनी वाजपेयी, राजीव गांधींचं उदाहरण देत कोणती मागणी केली?
Chandranath Rath: हवाई दलात 20 वर्ष सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रातही काम ते बंगालचे भावी सीएम शुभेंदू अधिकाऱ्यांचा राईट हँड होण्यापर्यंतचा प्रवास; चंद्रनाथ रथ कोण होते?
हवाई दलात 20 वर्ष सेवा, कॉर्पोरेट क्षेत्रातही काम ते बंगालचे भावी सीएम शुभेंदू अधिकाऱ्यांचा राईट हँड होण्यापर्यंतचा प्रवास; चंद्रनाथ रथ कोण होते?
बंगालच्या भावी सीएमच्या पीएलाच मध्यरात्रीच स्कॉर्पिओ थांबवली अन् थेट डोक्यात आणि छातीत तब्बल 10 राऊंड फायरिंग; शुभेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया, आई म्हणाली आरोपींना फाशी नको पण..
बंगालच्या भावी सीएमच्या पीएलाच मध्यरात्रीच स्कॉर्पिओ थांबवली अन् थेट डोक्यात आणि छातीत तब्बल 10 राऊंड फायरिंग; शुभेंदू अधिकारींची पहिली प्रतिक्रिया, आई म्हणाली आरोपींना फाशी नको पण..
Sandeep Deshpande: मुंबईतील मच्छिमारांनी आता जिलेबी-फाफडा विकायचा का? BMC अधिकारी गुजरात्यांची नोकरी करतायत, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका
मुंबईतील मच्छिमारांनी आता जिलेबी-फाफडा विकायचा का? BMC अधिकारी गुजरात्यांची नोकरी करतायत, मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका
Suvendu Adhikari PA Chandranath Rath Murder In Bengal: छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलिसांनी 'ती' गोष्ट पाहताच प्रोफेशनल शुटरचं काम ओळखलं
छातीत गोळ्या घुसल्या अन् सीटवरचा टॉवेल लाल रंगाने माखून गेला, पोलिसांनी 'ती' गोष्ट पाहताच प्रोफेशनल शुटरचं काम ओळखलं
Suvendu Adhikari PA Shot Dead : शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या झाडून संपवलं, ममतादीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर संशयाची सुई, टीएमसीची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी
शुभेंदू अधिकारींच्या पीएला गोळ्या झाडून संपवलं, ममतादीदींचा भाचा अभिषेक बॅनर्जीवर संशयाची सुई, टीएमसीची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी
Kolhapur Crime News: कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
कोल्हापुरात संतापजनक घटना, नराधम पित्यासह मामा अन् अल्पवयीन मामेभावाकडून 5 वर्षांपासून चिमुरडीवर अत्याचार; आईच्या तक्रारीनंतर नराधम गजाआड
Tamil Nadu Government Formation: TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?
TVK सर्वात मोठा पक्ष असूनही राज्यपालांनी अट टाकून तिढा वाढवला, विजय थलपति मोठं पाऊल उचलणार?
Embed widget