एक्स्प्लोर
पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी

मुंबई : संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या पाच राज्यांचे कल हाती आले आहेत. बहुतेक ठिकाणी एक्झिट पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणेच निकाल लागला. पाच राज्यांचा निकाल प. बंगाल (एकूण 294) : तृणमूल काँग्रेस: 211, डावी आघाडी - (डावे 32 + काँग्रेस 44), भाजप: 3, अन्य: 4 तामिळनाडू (एकूण 234): जयललिता (एआयएडीएमके) +: 134, करुणानिधी + काँग्रेस =97 (डीएमके 89, काँग्रेस 8) भाजप: 0, अन्य: 1 आसाम (एकूण 126) : भाजप 60 + एजीपी 14 +बीपीएफ 12 = 86, काँग्रेस+: 26, AIUDF: 13, अन्य: 1 केरळ (एकूण 140) - डावी आघाडी+: 85, काँग्रेस+: 46, भाजप+: 1, अन्य: 8 पद्दुचेरी (एकूण 30) - काँग्रेस+: 17, AINRC: 8, एआयएडीएमके: 4, अन्य: 1 पश्चिम बंगालमध्ये पुन्हा ममतांची जादू पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने सत्ता टिकवली आहे. 294 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये तृणमूल काँग्रेसने 211 जागांवर विजय मिळवला. तर यावेळीही सत्ता मिळवण्यात डाव्या आघाडीला अपयश आलं आहे. डावी आघाडी आणि काँग्रेसने एकत्र मिळून इथे निवडणूक लढवली. मात्र डाव्यांना 32, तर काँग्रेसला 44 म्हणजे दोघांना मिळून 76 जागांवरच विजय मिळवता आला. प. बंगालमध्ये भाजपपणे पहिल्यांदाच तुलनेने मोठं यश मिळवलं आहे. भाजपला 3 जागांवर विजय मिळवता आला. तामिळनाडूत अम्मांनी इतिहास रचला पश्चिम बंगालमध्ये जसं ममता बॅनर्जींनी सत्ता टिकवली, तसंच तामिळानाडूत जयललितांच्या 'ऑल इंडिया द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात अण्णा द्रमुकने (AIDMK) इतिहास रचला आहे. 234 जागा असलेल्या या विधानसभेमध्ये जयललितांच्या एआयडीएमकेने तब्बल 134 जागांवर विजय मिळवला. बहुमतासाठी आवश्यक 118 हा आकडा त्यांनी पार केला आहे. दुसरीकडे त्यांचा प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या एम करुणानिधी यांच्या 'द्रविड मुन्नेत्रा कळघम' अर्थात DMK ला 89 तर काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळवता आला. या दोन्ही पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली होती. तामिळनाडूत 1984 नंतर कोणत्याही सरकारने सलग दोनवेळा सत्ता स्थापन केली नव्हती. मात्र जयललितांनी हा इतिहास बदलला आहे. केरळमध्ये डाव्यांची काँग्रेसला धोबीपछाड केरळमध्ये मुख्यमंत्री ओमान चांडी यांच्या सत्ताधारी काँग्रेसला डाव्या आघाडीने धोबीपछाड केलं आहे. 140 जागा असलेल्या या विधानसभेत 71 ही मॅजिक फिगर आहे. इथे डाव्या आघाडीने 85 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 46 जागाच जिंकता आल्या. दुसरीकडे भाजपला केवळ 1 , तर अपक्ष व इतर मिळून 8 जण आघाडीवर आहे. आसाममध्ये इतिहास घडला, भाजप सत्तेवर पूर्वेकडील राज्य आसामध्ये भाजपने इतिहास रचला आहे. कारण आसामच्या इतिहासात पहिल्यांदाच भाजपने बहुमत मिळवलं आहे. 126 जागा असलेल्या या विधानसभेत सत्ता स्थापनेसाठी 64 जागांची गरज आहे. मात्र इथे भाजप आणि मित्रपक्षांनी मिळून तब्बल 86 जागा जिंकल्या. भाजप, असाम गणपरिषद आणि बोडो पिपल्स फ्रंट यांनी एकत्र येत निवडणूक लढवली आहे. दुसरीकडे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांच्या सत्ताधारी काँग्रेसला केवळ 26 जागांवरच विजय मिळवता आला. तर 'ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट' अर्थात AIUDFने 13 जागा जिंकल्या. याशिवाय अपक्ष व इतर 1 जागांवर विजय मिळवला. पुद्दुचेरीत कोणाची बाजी? केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी विधानसभेच्या 30 जागांसाठी निवडणूक झाली. यावेळी एआयएनआरसीचे एन रंगासामी यांना मुख्यमंत्रिपद टिकवण्यात अपयश आलं. पुद्दुचेरीत करुणानिधींच्या द्रमुक आणि काँग्रेसने एकत्र येऊन निवडणूक लढवली. या आघाडीला बहुमत मिळवण्यात यश आलं. या आघाडीला 17 जागा मिळाल्या, तर सत्ताधारी एआयएनआरसीला 8, जयललितांच्या एआयडीएमकेला 4 आणि अपक्षाला 1 जागा मिळाली. यंदाच्या निवणुकीत पुन्हा एकदा विजय मिळवून चौथ्यांदा पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री बनण्याचं स्वप्न एन रंगासामी पाहत होते. मात्र त्यांचं हे स्वप्न प्रत्यक्षात उतरलं नाही. 30 जागांच्या पुद्दुचेरी विधानसभेसाठी 16 मे रोजी मतदान झालं होतं. केंद्रशासित प्रदेश असलेल्या पुद्दुचेरीमध्ये 344 उमेदवारंचं भवितव्य मतपेटीत बंद झालं होतं. यामध्ये 96 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. पुद्दुचेरीत 9.41 लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
संबंधित बातम्या
हिमांता बिस्वा सरमा - आसाममध्ये भाजपला सत्तेवर आणणारा वझीर
पाच राज्यांचे सर्व निकाल एकाच ठिकाणी
प. बंगालमध्ये दीदींची जादू, पुन्हा ममता बॅनर्जींची सत्ता
तामिळनाडूत पुन्हा अम्मा, जयललिता यांना बहुमत
एन रंगासामी पुद्दुचेरीचा गड राखणार?
ABP RESULTS: भाजपसाठी आसाम का महत्त्वाचं?
आणखी वाचा





















