![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Earthquake : देशातील 'या' राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात?
Earthquake Zones In India: भूकंपाच्या संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. भारतातील कोणते क्षेत्र भूकंपाच्या सर्वात धोकादायक झोनमध्ये येतात? जाणून घ्या
![Earthquake : देशातील 'या' राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात? earthquake in nepal and delhi ncr five most dangerous zones in india Marathi news Earthquake : देशातील 'या' राज्यांना भूकंपाचा सर्वाधिक धोका, जाणून घ्या तुम्ही कोणत्या झोनमध्ये आहात?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/11/09/3a63169fd5b20e63342ead10d674f7d5166795893775581_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Earthquake Zones In India : भारताच्या भूकंपीय (Earthquake Zones) क्षेत्र नकाशानुसार, देशातील सुमारे 59 टक्के भूभाग मध्यम किंवा तीव्र भूकंपासाठी असुरक्षित आहे. यावरून हे देखील स्पष्ट होते की, देशातील एकूण 304 दशलक्ष कुटुंबांपैकी सुमारे 95 टक्के कुटुंबे वेगवेगळ्या तीव्रतेच्या भूकंपांना बळी पडू शकतात. आता पुन्हा एकदा भूकंपाच्या संदर्भात विविध प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनात निर्माण होत आहेत. भारतातील (Earthquake Zones In India) कोणते क्षेत्र भूकंपाच्या सर्वात धोकादायक झोनमध्ये येतात? जाणून घ्या
चार भूकंपीय झोनमध्ये 'या' क्षेत्राला सर्वात जास्त धोका
देशाच्या भूकंपाच्या झोनिंग नकाशानुसार, भूकंपाच्या धोक्याचे क्षेत्र चार भूकंपीय झोनमध्ये विभागले गेले आहेत. झोन 5 हे सर्वात भूकंपाच्या दृष्टीने सक्रिय क्षेत्र आहे, तर झोन II सर्वात कमी आहे. देशातील सुमारे 11% क्षेत्र झोन V मध्ये, 18% झोन IV मध्ये, 30% झोन III मध्ये आणि उर्वरित क्षेत्र II मध्ये आहे. भारत सध्या भूकंपाची जोखीम असलेल्या क्षेत्रांसाठी झोन 1 वापरत नाही. झोन 5 मध्ये काश्मीर, पश्चिम आणि मध्य हिमालय, उत्तर आणि मध्य बिहार, उत्तर-पूर्व भारतीय प्रदेश, कच्छ आणि अंदमान आणि निकोबार बेटांचा समावेश आहे. या भागात सतत मोठ्या आणि विनाशकारी भूकंपाचा धोका असतो. तर जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम, गंगेच्या मैदानाचा काही भाग, उत्तर पंजाब, चंदीगड, पश्चिम उत्तर प्रदेश, तराई, बिहारचा मोठा भाग, उत्तर बंगाल, सुंदरबन आणि देशाची राजधानी दिल्ली झोनमध्ये 4. येतो. महाराष्ट्रातील पाटण परिसर (कोयनानगर) देखील झोन 4 मध्ये आहे. या झोनमध्ये भूकंपामुळे जीवित व मालमत्तेची हानी होण्याचा धोकाही जास्त आहे.
'या' झोनमध्ये भूकंपाचा धोका कमी
झोन 3 मध्ये भूकंपाचा धोका मध्यम पातळीचा मानला जातो. चेन्नई, मुंबई, बंगळुरू, कोलकाता आणि भुवनेश्वर यासारख्या अनेक मेगासिटी या झोनमध्ये आहेत. तर झोन 2 मध्ये भूकंपाचा धोका त्यापेक्षा कमी आहे. या भागात भूकंपाचा धोका कमी आहे. त्रिची किंवा तिरुचिरापल्ली, बुलंदशहर, मुरादाबाद, गोरखपूर आणि चंदीगड सारखी शहरे या झोनमध्ये आहेत.
पाच झोनमध्ये विभागणी
भूकंपाच्या संदर्भात संपूर्ण देशाची पाच झोनमध्ये विभागणी करण्यात आली आहे. हे पाच क्षेत्र भूकंपासाठी सर्वात जास्त धोकादायक आहेत हे दर्शवतात. यामध्ये पाचवा झोन हा सर्वात धोकादायक मानला जातो, म्हणजेच या झोनमध्ये नुकसान होण्याचा धोका सर्वाधिक असतो, तसेच त्याची तीव्रताही जास्त असू शकते. देशातील सुमारे 11 टक्के लोक पाचव्या झोनमध्ये, तर 18 टक्के चौथ्या आणि 30 टक्के तिसऱ्या झोनमध्ये येतात. उर्वरित भाग पहिल्या आणि दुसऱ्या झोनमध्ये येतात.
इतर महत्वाच्या बातम्या
Earthquake : दिल्ली-NCR ते उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के, नेपाळमध्ये भूकंपाचं केंद्र; 3 जणांचा मृत्यू
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)